शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

मैतेईंना मिळणार नाही ‘एसटी’ समुदायाचा दर्जा; वाद मिटणार? मणिपूर उच्च न्यायालयाने आपल्याच निर्णयातील उतारा हटवला

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2024 06:20 IST

सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठाच्या भूमिकेशी विसंगत असणाऱ्या या उल्लेखाचा परिच्छेद संबंधित आदेशातून वगळण्याचा निर्णय मणिपूर उच्च न्यायालयाने घेतला आहे.

इम्फाळ : मैतेई समुदायाचा अनुसूचित जमातीच्या (एसटी) यादीमध्ये समावेश करण्याचा राज्य सरकारने विचार करावा, असे मणिपूर उच्च न्यायालयाने मार्च २०२३ मध्ये दिलेल्या आदेशात म्हटले होते. मात्र सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठाच्या भूमिकेशी विसंगत असणाऱ्या या उल्लेखाचा परिच्छेद संबंधित आदेशातून वगळण्याचा निर्णय मणिपूर उच्च न्यायालयाने घेतला आहे.

मैतेई समुदायाला अनुसूचित जमातीचा दर्जा मिळण्याच्या मागणीच्या निषेधार्थ ऑल ट्रायबल स्टुडंट्स युनियनने मणिपूरमध्ये ३ मे रोजी निषेध मोर्चे काढले होते. त्यानंतर चुराचंदपूर व विष्णूपूर जिल्ह्याच्या सीमेजवळ मैतेई व कुकी समुदाय संघर्ष झाला. त्यानंतर या वांशिक संघर्षाचा वणवा सर्वत्र पसरला. त्यात आजवर २००हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. या सर्व पार्श्वभूमीवर मणिपूर उच्च न्यायालयाचे न्या. गोलमेई गैफुलशिल्लू यांनी २७ मार्च २०२३ च्या आदेशातील मैतेई समुदायाला अनुसूचित जमातीचा दर्जा देण्याबाबतचा परिच्छेद काढून टाकण्याचा निर्णय घेतला.

आधीचा दाखला अन्

अनुसूचित जमातीच्या यादीतील दुरुस्तीसाठी केंद्र सरकारच्या विहित प्रक्रियेकडे न्या. गोलमेई गैफुलशिल्लू यांनी २१ फेब्रुवारी रोजी दिलेल्या १९ पानी निकालपत्रात लक्ष वेधले. तसेच मैतेई समुदायाला अनुसूचित जमातीचा दर्जा देण्याबाबत उच्च न्यायालयाने गेल्या वर्षी मार्चमध्ये दिलेल्या आदेशातील १७ (३) क्रमांकाच्या परिच्छेदमध्ये केलेले उल्लेख काढून टाकण्याच्या आवश्यकतेवर न्या. गोलमेई गैफुलशिल्लू यांनी जोर दिला.

वगळलेल्या ‘त्या’ परिच्छेदा काय होते?

मणिपूर उच्च न्यायालयाने गेल्या वर्षी मार्चमध्ये दिलेल्या आदेशातील परिच्छेदात म्हटले होते की, राज्य सरकारने हा आदेश प्राप्त झाल्यापासून चार आठवड्यांच्या आत मैतेई समुदायाचा अनुसूचित जमातीच्या यादीत समावेश करण्याचा विचार करावा. हा परिच्छेद वगळण्याचे आदेश दिले.

सुप्रीम कोर्टाची भूमिका काय होती?

राष्ट्रपतींनी राज्यघटनेच्या कलम ३४१ आणि ३४२ अन्वये जारी केलेल्या आदेशामध्ये अधिसूचित यादीत एखादी जाती, उपजाती, जमाती किंवा उपजमातीचा समावेश करण्याबाबत न्यायालयांनी आपली हद्द ओलांडू नये.

संसदेने कायदा मंजूर केल्याशिवाय या आदेशामध्ये बदल करता येत नाही, असे सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठाने नोव्हेंबर २०००मध्ये दिलेल्या आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.

निकालाशी विसंगत असा परिच्छेद मणिपूर उच्च न्यायालयाच्या गेल्या वर्षीच्या निकालपत्रामध्ये देण्यात आला होता. त्यामुळे संबंधित आदेशातून तो परिच्छेद वगळण्याचा निर्णय घेतला आहे.