शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs WI: भारताचा कसोटी संघ जाहीर! पडीक्कलला संधी; श्रेयस अय्यर, करूण नायरला वगळले
2
पंतप्रधान मोदी आणि नेतन्याहू यांच्या मैत्रीवरून सोनिया गांधींनी उपस्थित केला सवाल, म्हणाल्या...
3
कोळशांच्या खाणीतून काय बाहेर पडले? भारतीय शास्त्रज्ञही चकीत झाले...! युरेनियमचा अजस्त्र साठा सापडला
4
डोनाल्ड ट्रम्प यांना नोबेल पुरस्कार हवा, पण अर्धी अमेरिकाच नाखूश! सर्वेक्षणात झाला धक्कादायक खुलासा 
5
IND vs PAK: 'इतका राग होता तर खेळलाच कशाला?' हस्तांदोलन न करण्यावर शशी थरूर संतापले!
6
शेतकऱ्यांना त्यांच्या पिकांना योग्य भाव का मिळत नाही? नितीन गडकरी यांनी कारण सांगितले
7
वाढीव मदतीचा प्रस्ताव कॅबिनेटसमोर मांडू; मंत्री मकरंद पाटील यांचे शेतकऱ्यांना आश्वासन
8
भाजपाच्या अध्यक्षपदासाठी नाव आघाडीवर, कशी असेल पुढची वाटचाल? फडणवीस यांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
9
भगवा कुर्ता, कपाळी भस्म; संजय दत्तने घेतलं महाकालेश्वरचं दर्शन, भक्तीत तल्लीन झाला अभिनेता
10
'रशियाचे लष्कर कागदी वाघासारखेच'; डोनाल्ड ट्रम्प यांनी पुतीन यांना डिवचले, रशियानेही केला पलटवार
11
कारगिल युद्धावेळीही आपण पाकिस्तानसोबत..., हस्तांदोलन वादावरून शशी थरूर यांनी दिला टीम इंडियाला सल्ला
12
Pune Crime: विजयने ११व्या मजल्यावरून मारली उडी, ससून रुग्णालयातील धक्कादायक घटना
13
अखेर बीएसएनएल नेटवर्क बदलणार, देशभरात या तारखेला 4G सेवा सुरु करण्याची घोषणा
14
महाराष्ट्रातल्या मनगटात इतका दम आहे म्हणून.., प्रणित मोरेची खिल्ली उडवणाऱ्यांवर भडकला डीपी
15
"मला स्वातंत्र्य हवंय"; बॉयफ्रेंडच्या मदतीने बायकोने काढला नवऱ्याचा काटा, लोकेशन सांगितलं अन्...
16
TATA Motors ला ₹२,३८,६१,६६,००,००० चं मोठं नुकसान! JLR वर सायबर हल्ला; उत्पादन थांबलं, शेअर्समध्ये मोठी घसरण
17
हृदयद्रावक! नवरात्रीत मोठी दुर्घटना; देवीच्या मंडपात अचानक पसरला करंट; २ मुलांचा मृत्यू
18
मूलबाळ नसलेल्या हिंदू महिलेच्या मृत्यूनंतर तिची संपत्ती कुणाला मिळणार?; सुप्रीम कोर्टाची टिप्पणी
19
३०० पानांमध्ये लिहिलेत बाबाचे काळे कारनामे; इंस्टिट्यूटमध्ये होता टॉर्चर चेंबर! दिल्लीत खळबळ
20
GST मध्ये आणखी कपातीचे पंतप्रधान मोदींचे संकेत; म्हणाले, "आम्ही इकडेच थांबवणार नाही..."

ऐक्य जपण्यास ‘एक भारत, श्रेष्ठ भारत’

By admin | Updated: November 30, 2015 03:18 IST

वाढत्या असहिष्णुतेवर वाद-विवाद झडत असतानाच, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी ‘एक भारत श्रेष्ठ भारत’ योजनेचा प्रस्ताव ठेवला. ‘मन की बात’ या आकाशवाणीवरील मासिक कार्यक्रमात

नवी दिल्ली : वाढत्या असहिष्णुतेवर वाद-विवाद झडत असतानाच, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी ‘एक भारत श्रेष्ठ भारत’ योजनेचा प्रस्ताव ठेवला. ‘मन की बात’ या आकाशवाणीवरील मासिक कार्यक्रमात, त्यांनी देशाचे ऐक्य आणि सलोखा वृद्धिंगत करण्यासाठी सूचना मागवल्या आहेत. ‘अंतर्गत दक्षता हेच स्वातंत्र्याचे बक्षीस आहे. देशाच्या ऐक्याची संस्कृती कायम राहायला हवी. सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंती कार्यक्रमात मी याविषयी बोललो होतो. या संकल्पनेला योजनेचा आकार दिला जावा, असे मला वाटते. या योजनेची रचना कशी असावी, लोगो आणि जनसहभाग कसा वाढवावा, यावर ट८ॠङ्म५.ूङ्मे या पोर्टलवर सूचना- शिफारशी सादर कराव्या. तुमची सर्जनशीलता कामी आणून ऐक्य आणि सलोख्याचा मंत्र देत, ‘एक भारत श्रेष्ठ भारत’ ही योजना साकारू या,’ असे आवाहन मोदींनी केले. ही योजना कशी असावी, त्यात कोणते कार्यक्रम समाविष्ट असावेत, सरकार, समाज आणि नागरी समुदायाने काय करावे, यावर ‘ही प्रतिष्ठित अशी तहहयात चालणारी योजना असावी. त्यात प्रत्येक जण सहजरीत्या जोडला जावा,’ असे त्यांनी स्पष्ट केले. वाढत्या असहिष्णुतेबद्दल चिंता व्यक्त करीत, सरकार काहीही करीत नसल्याचे आरोप होत असताना, मोदींनी केलेल्या आवाहनाला महत्त्व प्राप्त झाले आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)‘अवयवदानामुळे कुणाला नवे आयुष्य लाभू शकते. एखाद्याचे मौल्यवान आयुष्य वाचविता येते. ३ डिसेंबर हा दिवस ‘जागतिक अशक्तता दिवस’ म्हणून पाळला जातो. संयुक्त राष्ट्राकडे अवयवदान करू इच्छिणाऱ्यांच्या फोनकॉल्सची संख्या सात पटीने वाढली आहे. अवयवदानामुळे एखाद्याला नवे जीवन लाभत असल्यामुळे, सर्वोत्तम दान दुसरे कोणते असू शकणार?’ असे मोदी म्हणाले. २७ नोव्हेंबर रोजी भारतात अवयवदान दिवस पाळण्यात आला. या क्षेत्रात आणखी जागरूकता वाढेल, असा मला विश्वास आहे. काश्मीरच्या जावेद अहमद यांना अतिरेक्यांनी गोळ्या घातल्या, पण ते वाचले. दहशतवादाची जखम त्यांची उमेद घालवू शकली नाही. त्यांनी जीवन समाजसेवेला समर्पित केले. शरीर साथ देत नसतानाही, ते गेल्या २० वर्षांपासून मुलांना शिकविण्याच्या कामात मग्न झाले आहेत,’ असा उल्लेखही त्यांनी केला.