शहरं
Join us  
Trending Stories
1
Gen Z युवकांना सरकार का घाबरतंय?; उद्धव ठाकरेंचा सवाल, शाखेत उभी राहणार 'मतदार ओळख केंद्र'
2
राज ठाकरेंना दोन लाख मुस्लीम दुबार मतदार का दिसले नाहीत? शेलार म्हणाले, 'अजून वेळ गेलेली नाही'
3
हनिमूनसाठी जोडप्याने बुक केली दुबई ट्रीप, लाखो रुपये दिले; परदेशात पोहोचल्यावर बसला मोठा धक्का!
4
यूपी, बंगाल, तामिळनाडूसह 12 राज्यांमध्ये उद्यापासून SIR प्रक्रिया सुरू; 'या' पक्षांचा तीव्र विरोध...
5
त्रिभाषा धोरणाला राज्यभरात कसा प्रतिसाद? डॉ. नरेंद्र जाधव म्हणाले, “पहिलीपासून हिंदी सक्ती...”
6
'भुल भूलैया ४'मध्ये अक्षय कुमार-कार्तिक आर्यन एकत्र येणार? चर्चा सुरु; दिग्दर्शक म्हणाले...
7
टिंडरवरची गर्लफ्रेंड महागात पडली! तोंडओळखीतच इंजिनियर तरुण लट्टू झाला अन् कंगाल होऊन बसला! 
8
"मी ऐकलंय की मराठी अभिनेत्रीसोबत त्याचं अफेअर...", गोविंदाबद्दल पत्नी सुनीता आहुजाचा खुलासा
9
₹३४,००० पगार असेल तर ८ व्या वेतन आयोगानंतर किती होईल? जाणून घ्या कॅलक्युलेशन
10
Tulsi Vivah 2025: ज्यांना मुलगी नाही त्यांनाही तुळशी विवाह लावल्याने मिळते कन्यादानाचे पुण्य!
11
चीन-पाकिस्तानसह अमेरिकेलाही एकाचवेळी बसेल चाप; 'बगराम एअरबेस' भारतासाठी किती महत्त्वपूर्ण?
12
OPEC+ Oil Output: आणखी एक अग्निपरीक्षा; ८ देशांनी मिळून घेतला असा निर्णय ज्याचा थेट भारतावर होणार परिणाम, का वाढलं टेन्शन?
13
देशातील सर्वात श्रीमंत राजघराणे! अजूनही जगतात राजेशाही जीवन! कमाईचे मुख्य साधन कोणतं?
14
Afghanistan Earthquake : भीषण! भूकंपाने हादरला अफगाणिस्तान; ७ जणांचा मृत्यू, १५० जखमी; मजार-ए-शरीफचं नुकसान
15
क्रिकेट लीगसाठी गेल, गप्टिलसह ७० क्रिकेटपटूंना श्रीनगरला नेले, अन् आयोजकच फरार झाले, नेमकं प्रकरण काय? 
16
IAS Anuradha Pal : स्वप्न होती मोठी! घरची परिस्थिती बिकट, वडील विकायचे दूध; लेक झाली IAS, डोळे पाणावणारी गोष्ट
17
Life Lesson: प्रत्येकाची वेळ येते, पण तयारी असावी लागते शेफाली वर्मासारखी आणि 'या' गोष्टीसारखी!
18
जामताडा बनण्याच्या मार्गावर 'हे' शहर; 615 सायबर ठगांना अटक, 100 कोटींची फसवणूक उघड
19
ICC Women's World Cup Winners : "विजयी विश्व तिरंगा प्यारा..." भारतीय 'रन'रागणींनी रचला इतिहास
20
"मला २० लाख कॅश द्या, तरच वरात घेऊन येईन"; नवरदेवाचा ऐनवेळी लग्नास नकार, मागितला हुंडा

Narendra Modi : "मी तुला आशीर्वाद देतो, तुझा पत्ता दे, मी नक्की पत्र लिहीन"; मुलीला पाहून मोदी म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 3, 2023 11:15 IST

Narendra Modi : जेव्हा पीएम मोदींची नजर स्केच घेऊन उभ्या असलेल्या मुलीवर पडली तेव्हा ते लगेच म्हणाले, "मुली, मी तुझं हे स्केच पाहिलं आहे. तू खूप छान काम केलं आहेस."

पंतप्रधान नरेंद्र मोदी छत्तीसगडमधील कांकेर जिल्ह्यात एका कार्यक्रमाला पोहोचले होते. येथे पंतप्रधान मोदी भाषण करत असताना गर्दीतील एका मुलीने मोदींचं एक स्केच हातात धरलं होतं. जेव्हा पीएम मोदींची नजर स्केच घेऊन उभ्या असलेल्या मुलीवर पडली तेव्हा ते लगेच म्हणाले, "मुली, मी तुझं हे स्केच पाहिलं आहे. तू खूप छान काम केलं आहेस."

नरेंद्र मोदी यांनी मुलीला सांगितलं की, "मी तुला आशीर्वाद देतो, पण मुली तू थकून जाशील, तू बराच वेळ उभी आहेस. मी या पोलिसांना सांगतो की, मुलीला स्केच द्यायचं असेल तर घ्या, माझ्यापर्यंत नक्कीच पोहोचेल. बाळा, त्यावर तुझा पत्ता दे. मी तुला नक्कीच पत्र लिहीन." पंतप्रधानांनी हे सांगताच मुलीच्या चेहऱ्यावर हसू उमटले. मोदींच्या प्रतिक्रियेनंतर मुलगी खूप आनंदी दिसत होती. 

पंतप्रधानांनी लहान मुलीवर दाखवलेल्या दयाळूपणाबद्दल लोक त्यांचं भरभरून कौतुक करत आहेत. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत असून त्याची चर्चा रंगली आहे. मोदींनी गुरुवारी छत्तीसगडमधील कांकेर येथे जनतेला संबोधित केले. राज्यातील सत्ताधारी काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल करताना मोदी म्हणाले की, हा पक्ष जिथे आहे तिथे विकास होऊच शकत नाही. छत्तीसगडमध्ये भाजपाच्या समर्थनार्थ वादळ वाहत असून त्याची झलक कांकेरमध्येही पाहायला मिळत आहे.

"हा पक्ष जिथे आहे तिथे विकास होऊच शकत नाही"

"दिल्लीमध्ये काँग्रेसचे सरकार असताना छत्तीसगड राज्याकडे नेहमीच दुर्लक्ष केले गेले, परंतु आम्ही छत्तीसगडच्या विकासासाठी सर्व पावले उचलली. छत्तीसगडच्या भल्यासाठी भाजपा नेहमीच काम करत आहे. काँग्रेसची गेली पाच वर्षे अपयशी ठरली आहेत. काँग्रेसने छत्तीसगडला फक्त गुन्हेगारी दिली. हे आता खपवून घेतले जाणार नाही, असे आज संपूर्ण छत्तीसगड सांगत आहे. काँग्रेसचे सरकार बदलावे लागेल."

"जेव्हा काँग्रेस भ्रष्टाचार करते, तेव्हा फक्त राज्यच नाही तर प्रत्येक घराचं नुकसान होतं. ती तुमच्या मुलांचं भविष्य उद्ध्वस्त करते. तुमच्याकडे कोळसा आहे पण तुम्हाला पुरेशी वीज मिळत नाही, काँग्रेसचे लोक तुमच्या कोळशावर कमिशन घेत आहेत. गरिबांचा विचार करणे ही भाजपा सरकारची प्राथमिकता आहे. प्रत्येक गरीब आदिवासी आणि मागासलेल्या व्यक्तीला संरक्षण देण्याचा भाजपाचा संकल्प आहे" असं पंतप्रधानांनी म्हटलं आहे.  

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीPoliticsराजकारण