शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 
3
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
4
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
5
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
6
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
7
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
8
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
9
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
10
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
11
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
12
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
13
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
14
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
15
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
16
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
17
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
18
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
19
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
20
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO

गांधी हत्या गोडसेकडूनच; अन्य गूढ कोणीही नव्हते! सुप्रीम कोर्टात अहवाल, चौथ्या गोळीची शक्यता फेटाळली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2018 12:01 IST

महात्मा गांधी यांची हत्या नथुराम गोडसे यानेच केल्याचे सबळ पुराव्यांनी निर्विवाद सिद्ध झाले आहे. राष्ट्रपित्याच्या हत्येच्या या कटात अन्य कोणी गूढ खुनी सामील होता व त्याने झाडलेल्या चौथ्या गोळीने गांधीजींचे प्राणोत्क्रमण झाले, असा संशय घेण्यास बिलकूल जागा नाही.

नवी दिल्ली : महात्मा गांधी यांची हत्या नथुराम गोडसे यानेच केल्याचे सबळ पुराव्यांनी निर्विवाद सिद्ध झाले आहे. राष्ट्रपित्याच्या हत्येच्या या कटात अन्य कोणी गूढ खुनी सामील होता व त्याने झाडलेल्या चौथ्या गोळीने गांधीजींचे प्राणोत्क्रमण झाले, असा संशय घेण्यास बिलकूल जागा नाही, असा नि:संदिग्ध अहवाल माजी सॉलिसिटर जनरल व ज्येष्ठ वकील अमरेंद्र शरण यांनी सोमवारी सर्वोच्च न्यायालयात दाखल केला.ब्रिटिशांनी रचलेल्या कारस्थानामुळे गांधीजींची हत्या झाली. त्यातील खरा खुनी न्यायालयापुढे आणून या कटावर पांघरुण घातले गेले, असा आरोप करणारी आणि या प्रकरणाचा तपास नव्या आयोगामार्फत करण्याची मागणी करणारी जनहित याचिका ‘अभिनव भारत’चे संस्थापक पंकज फडणीस यांनी केली आहे.पंकज फडणीस हे कट्टर सावरकरवादी आहेत. गेल्या वर्षी आॅक्टोबरमध्ये सर्वोच्च न्यायालयाने फडणीस यांच्या या दाव्याच्या अनुषंगाने सर्व उपलब्ध तथ्ये व सामग्रीचा अभ्यास करण्यासाठी माजी सॉलिसिटर जनरल व ज्येष्ठ वकील अमरेंद्र शरणयांची ‘अ‍ॅमायकेस क्युरी’ म्हणूननेमणूक केली होती. त्यांनी सर्वोच्च न्यायालयातील दोन ज्येष्ठ वकिलांच्या मदतीने महात्मा गांधी यांच्या हत्येशी संबंधित सर्व कागदपत्रांचा तपास करून अहवाल आज सादर केला.दोन वकिलांच्या मदतीने तपासला संपूर्ण रेकॉर्डअ‍ॅड. संचित गुरू व अ‍ॅड. समर्थ खन्ना यांच्या मदतीने शरण यांनी गांधी खून खटल्याचे सर्व रेकॉर्ड तसेच सरकारने सन १९६९ मध्ये नेमलेल्या जीवनलाल खन्ना चौकशी आयोगाचा अहवाल यासह चार हजारांहून अधिक दस्तावेजांचा अभ्यास करून हा अहवाल सादर केला.आधीचा खटला व चौकशीतील निष्कर्षांविषयी संशय घेण्यास कोणताही आधार नसल्याने नव्याने तपास करण्याची बिलकूल गरज नाही, असे शरण यांनी न्यायालयास कळविले. आता फडणीस यांच्या याचिकेचे काय करायचे याचा निर्णय १२ जानेवारीस अपेक्षित आहे.सर्व बाबी नि:संशयगांधीजींच्या शरीरात घुसलेल्या गोळ्या, त्या ज्यातून झाडल्या गेल्या ते पिस्तूल, ते ज्याने चालविले तो खुनी व ज्यातून ही हत्या झाली ती विचारसरणी या सर्वांची विधिसंमत मार्गाने पूर्ण ओळख पटलेली आहे.त्यामुळे अंतिमत: ज्यांना खुनी म्हणून दोषी ठरविले गेले, त्यांच्याखेरीज अन्य कोणी ही हत्या केली असण्याची शक्यता दिसत नाही, असेही या अहवालात म्हटले गेले.मुंबई हायकोर्टाने फेटाळला होता अर्जजगाला हादरवणाºया या हत्येची ७० वर्षांनंतर नव्याने चौकशी केली जावी यासाठी फडणीस यांनी आधी मुंबई उच्च न्यायालयात याचिका केली होती. ती फेटाळल्यानंतर ते सर्वोच्च न्यायालयात आले.गांधी हत्येचा खटला हे सत्य दडपण्याचे मोठे कारस्थान आहे, असा गंभीर आरोप करणाºया फडणीस यांचे असे म्हणणे आहे की, या हत्येने मराठी लोकांना व सावरकर यांना बदनाम केले गेले. हे किटाळ दूर करण्यासाठी नव्याने तपास करणे गरजेचे आहे.

टॅग्स :Mahatma Gandhiमहात्मा गांधीNathuram Godseनथुराम गोडसेCourtन्यायालय