शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

Mahatma Gandhi Death Anniversary : प्रभावशाली चळवळींपैकी एक मिठाचा सत्याग्रह

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2019 11:37 IST

महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली १९३० साली भारत स्वातंत्र्य लढ्यादरम्यान मिठाचा सत्याग्रह करण्यात आला होता.

ठळक मुद्दे१९३० साली भारत स्वातंत्र्य लढ्यादरम्यान मिठाचा सत्याग्रह मिठाचा सत्याग्रह हा असहकार चळवळीचा एक भाग होता.हजारोंच्या संख्येने लोक महात्मा गांधी यांच्यासोबत यात्रेत सहभागी झाले होते.

मुंबई : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची आज पुण्यतिथी आहे. त्यानिमित्ताने महात्मा गांधी यांनी मिठाचा सत्याग्रह केला होता. त्याविषयी काही माहिती आपण पाहूया. 

महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली १९३० साली भारत स्वातंत्र्य लढ्यादरम्यान मिठाचा सत्याग्रह करण्यात आला होता. त्यावेळी भारतातील ब्रिटिश सरकारने मिठासारख्या जीवनावश्यक गोष्टीवर लावलेल्या कराच्या विरोधात महात्मा गांधी यांनी सत्याग्रहाची घोषणा केली याची सुरूवात दांडी यात्रेने झाली. 

मिठाचा सत्याग्रह हा असहकार चळवळीचा एक भाग होता. प्रत्यक्षात मिठावरचा कर हे केवळ निमित्त होते. महात्मा गांधींना या सत्याग्रहाच्या माध्यमातून लोकसंघटन आणि लोकजागृती करायची होती. यावेळी दांडी यात्रेची सुरुवात साबरमती आश्रमापासून सुरु झाली होती. हजारोंच्या संख्येने लोक महात्मा गांधी यांच्यासोबत यात्रेत सहभागी झाले होते. २४ दिवस आणि ३९० किलोमीटर ही यात्रा चालली होती. १२ मार्चला अहमदाबादहून निघालेली यात्रा, ६ एप्रिलला दांडीला पोहोचली होती.

महात्मा गांधी यांनी काढलेली ही दांडी यात्रा इंग्रजांची भारतातील पाळेमुळे उखडण्याच्या प्रयत्‍नांमधील सर्वांत यशस्वी प्रयत्‍न ठरली. याच घटनेबरोबर देशात अनेक ठिकाणी सविनय कायदेभंग आंदोलनाला सुरुवात झाली. यामध्ये गुजरातमधील धरासना, महाराष्ट्रातील वडाळा(मुंबई), शिरोडा व मालवण (सिंधुदुर्ग) आणि कर्नाटकमधील शनिकट्टा इत्यादी ठिकाणे मिठाच्या सत्याग्रहात विशेष गाजले. महाराष्ट्रातील बिळाशी, कळवण, संगमनेर व चीरनेर इत्यादी ठिकाणे जंगल सत्याग्रहामध्ये खूप प्रसिद्धीला आली होती.  

टॅग्स :Mahatma Gandhiमहात्मा गांधी