शहरं
Join us  
Trending Stories
1
१ पद, २ विभाग अन् २ आदेश; CM देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्या खात्यांमध्ये नियुक्तीवरून संघर्ष?
2
“जनभावनेचा आदर करणारे हे सरकार, आम्ही...”; ‘महादेवी’ परतण्याबाबत एकनाथ शिंदेचे मोठे विधान
3
एकनाथ शिंदेंची दिल्लीवारी; अमित शाहांशी बैठकीत काय चर्चा झाली? खुद्द उपमुख्यमंत्री म्हणाले...
4
आधार ओटीपी वापरून ITRचं ई-व्हेरिफिकेशन करा, अन्यथा रिटर्न अवैध ठरेल; पाहा संपूर्ण प्रोसेस
5
८० वर्षांपूर्वी उत्खननात सापडलेले शिवमंदिर; आता पुन्हा धराली दुर्घटनेत जमिनीखाली गाडले गेले
6
'कायद्याच्या कचाट्यात महादेवी हत्तीला अडकवू नका, ... तोपर्यंत लढा सुरूच राहणार'; राजू शेट्टींनी स्पष्टच सांगितलं
7
वॉशिंग मशिन वापरताना ‘ही’ किरकोळ चूक जीवावर बेतली; तरुणाचा मृत्यू; करायला गेला एक आणि..
8
बुकिंग करणाऱ्या ग्राहकांवरच शाओमी उलटली; आता म्हणतेय आठवड्यात पूर्ण पैसे द्या नाहीतर...
9
Wasim Jaffer: वसीम जाफरवर मोठी जबाबदारी, आता विदर्भातील खेळाडूंना शिकवतील फलंदाजीचे धडे!
10
ICC Test Ranking : मियाँ 'मॅजिक'नंतर 'मार मुसंडी' शो! सिराजला ICC कडून मिळालं मोठं गिफ्ट
11
ITR आणि टॅक्स डेडलाईनमध्ये काय फरक आहे? शेवटची तारीख कधी? ५,००० दंडापासून वाचण्यासाठी लगेच वाचा!
12
एकनाथ शिंदे-उद्धव ठाकरेंची एकाचवेळी दिल्लीवारी; टायमिंगची चर्चा, नवे समीकरण दिसणार?
13
"आधी माझ्या बायकोला वाचवा...."; पुरात अडकलेल्या नवऱ्याची धडपड, जिंकली लोकांची मनं
14
एकटं बसलं होतं जोडपं, पाठीमागून २ युवक आले; गर्लफ्रेंडला सोडून बॉयफ्रेंड पळाला, त्यानंतर जे घडलं...
15
तो 'सोंगाड्या'! DSP सिराजसंदर्भात नेमकं काय म्हणाला जो रुट?
16
'स्वराज्यरक्षक संभाजी' फेम प्राजक्ता गायकवाडचा उद्या साखरपुडा, मेहंदीचा व्हिडीओ आला समोर
17
दिल्लीसह देशभरातील वीज ग्राहकांना बसणार ‘शॉक’, वीजदरात वाढ करण्यास सुप्रीम कोर्टाची मंजुरी
18
इराणमध्ये मोठे राजकीय फेरबदल; 'सुप्रीम लीडर'ने कट्टरपंथी विरोधी नेत्याला दिली मोठी जबाबदारी
19
एकनाथ शिंदे यांनी केले अमित शाह यांचे तोंडभरून कौतुक; बाळासाहेब ठाकरेंचे नाव घेत म्हणाले...
20
वडिलांना सांगितलं कॉल सेंटरमध्ये नोकरी मिळाली; रोज ८-१० ग्राहकांना खूष...

Mahatma Gandhi Death Anniversary : प्रभावशाली चळवळींपैकी एक मिठाचा सत्याग्रह

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2019 11:37 IST

महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली १९३० साली भारत स्वातंत्र्य लढ्यादरम्यान मिठाचा सत्याग्रह करण्यात आला होता.

ठळक मुद्दे१९३० साली भारत स्वातंत्र्य लढ्यादरम्यान मिठाचा सत्याग्रह मिठाचा सत्याग्रह हा असहकार चळवळीचा एक भाग होता.हजारोंच्या संख्येने लोक महात्मा गांधी यांच्यासोबत यात्रेत सहभागी झाले होते.

मुंबई : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची आज पुण्यतिथी आहे. त्यानिमित्ताने महात्मा गांधी यांनी मिठाचा सत्याग्रह केला होता. त्याविषयी काही माहिती आपण पाहूया. 

महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली १९३० साली भारत स्वातंत्र्य लढ्यादरम्यान मिठाचा सत्याग्रह करण्यात आला होता. त्यावेळी भारतातील ब्रिटिश सरकारने मिठासारख्या जीवनावश्यक गोष्टीवर लावलेल्या कराच्या विरोधात महात्मा गांधी यांनी सत्याग्रहाची घोषणा केली याची सुरूवात दांडी यात्रेने झाली. 

मिठाचा सत्याग्रह हा असहकार चळवळीचा एक भाग होता. प्रत्यक्षात मिठावरचा कर हे केवळ निमित्त होते. महात्मा गांधींना या सत्याग्रहाच्या माध्यमातून लोकसंघटन आणि लोकजागृती करायची होती. यावेळी दांडी यात्रेची सुरुवात साबरमती आश्रमापासून सुरु झाली होती. हजारोंच्या संख्येने लोक महात्मा गांधी यांच्यासोबत यात्रेत सहभागी झाले होते. २४ दिवस आणि ३९० किलोमीटर ही यात्रा चालली होती. १२ मार्चला अहमदाबादहून निघालेली यात्रा, ६ एप्रिलला दांडीला पोहोचली होती.

महात्मा गांधी यांनी काढलेली ही दांडी यात्रा इंग्रजांची भारतातील पाळेमुळे उखडण्याच्या प्रयत्‍नांमधील सर्वांत यशस्वी प्रयत्‍न ठरली. याच घटनेबरोबर देशात अनेक ठिकाणी सविनय कायदेभंग आंदोलनाला सुरुवात झाली. यामध्ये गुजरातमधील धरासना, महाराष्ट्रातील वडाळा(मुंबई), शिरोडा व मालवण (सिंधुदुर्ग) आणि कर्नाटकमधील शनिकट्टा इत्यादी ठिकाणे मिठाच्या सत्याग्रहात विशेष गाजले. महाराष्ट्रातील बिळाशी, कळवण, संगमनेर व चीरनेर इत्यादी ठिकाणे जंगल सत्याग्रहामध्ये खूप प्रसिद्धीला आली होती.  

टॅग्स :Mahatma Gandhiमहात्मा गांधी