शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
2
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
3
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
4
१ वर्षात ₹१ लाखांचे झाले ₹७४ लाख, कोणता आहे जबरदस्त शेअर ज्याला सातत्यानं लागतंय अपर सर्किट?
5
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
6
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
7
जीएसटी कपातीचा फायदा थेट जनतेला! खर्चासाठी वाढणार हातातली रोकड; एमएसएमई उद्योगांना बळ मिळणार
8
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
9
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
10
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
11
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
12
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
13
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
14
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
15
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
16
आयोग नव्हे, मतदारच राजा !
17
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
18
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
19
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
20
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश

महात्मा गांधी, रवींद्रनाथ टागोर यांच्यासह स्वातंत्र्यसैनिकांवर पाश्चिमात्य शिक्षणाचा प्रभाव नव्हता - मोहन भागवत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2017 00:01 IST

महात्मा गांधी, रवींद्रनाथ टागोर यांच्यासह सर्व स्वातंत्र्यसैनिक पाश्चिमात्य शिक्षण पद्धतीमध्येच शिकले. मात्र त्यांनी त्या शिक्षण पद्धतीचा स्वत:वर प्रभाव पडू दिला नाही, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी येथे केले.

नवी दिल्ली : महात्मा गांधी, रवींद्रनाथ टागोर यांच्यासह सर्व स्वातंत्र्यसैनिक पाश्चिमात्य शिक्षण पद्धतीमध्येच शिकले. मात्र त्यांनी त्या शिक्षण पद्धतीचा स्वत:वर प्रभाव पडू दिला नाही, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी येथे केले.अहमदाबाद येथील दीनानाथ बात्रा यांच्या पुनरुत्थान विद्यापीठाने तयार केलेल्या भारतीय शिक्षा ग्रंथमाला (इंडियन एज्युकेशन मॅन्युअल) च्या उद्घाटनप्रसंगी भागवत बोलत होते. दीनानाथ बात्रा हे शिक्षण पद्धतीविषयीच्या वक्तव्यांमुळे बºयाच वेळा वादग्रस्त ठरले आहेत.राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने आग्रा येथे आयोजित केलेल्या संबंधित संघटनांच्या मंथन शिबिरात जवळपास सर्व वक्त्यांनीच शिक्षण पद्धती बदलायला हवी, असे मत व्यक्त केले होते. त्या अनुषंगाने विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना सरसंघचालक म्हणाले की, मेकॉलेची शिक्षण पद्धती पाश्चिमात्य म्हणून ओळखली जाते. मात्र स्वामी विवेकानंद, लोकमान्य टिळक, महात्मा गांधी, रवींद्रनाथ टागोर आणि स्वातंत्र्य लढ्यातील सारेच जण याच शिक्षण पद्धतीतून पुढे आले. पण त्यांनी पाश्चिमात्य पद्धतीचा स्वत:वर परिणाम होऊ दिला नाही.त्यामुळे तुम्ही कोणत्या शिक्षण पद्धतीत शिकता, यावरच सारे संस्कार अवलंबून नसतात. पाल्यांवरील संस्काराची जबाबदारी पालकांचीही असते, असे सांगून भागवत म्हणाले की, सध्याच्या शिक्षण पद्धतीमध्ये बदल व्हायला हवा, याबाबत समाजात सहमती निर्माण होत आहे. मात्र सारे काही त्यावरच अवलंबून असते, असे नव्हे.

टॅग्स :Mohan Bhagwatमोहन भागवत