शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

महात्मा गांधी, रवींद्रनाथ टागोर यांच्यासह स्वातंत्र्यसैनिकांवर पाश्चिमात्य शिक्षणाचा प्रभाव नव्हता - मोहन भागवत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2017 00:01 IST

महात्मा गांधी, रवींद्रनाथ टागोर यांच्यासह सर्व स्वातंत्र्यसैनिक पाश्चिमात्य शिक्षण पद्धतीमध्येच शिकले. मात्र त्यांनी त्या शिक्षण पद्धतीचा स्वत:वर प्रभाव पडू दिला नाही, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी येथे केले.

नवी दिल्ली : महात्मा गांधी, रवींद्रनाथ टागोर यांच्यासह सर्व स्वातंत्र्यसैनिक पाश्चिमात्य शिक्षण पद्धतीमध्येच शिकले. मात्र त्यांनी त्या शिक्षण पद्धतीचा स्वत:वर प्रभाव पडू दिला नाही, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी येथे केले.अहमदाबाद येथील दीनानाथ बात्रा यांच्या पुनरुत्थान विद्यापीठाने तयार केलेल्या भारतीय शिक्षा ग्रंथमाला (इंडियन एज्युकेशन मॅन्युअल) च्या उद्घाटनप्रसंगी भागवत बोलत होते. दीनानाथ बात्रा हे शिक्षण पद्धतीविषयीच्या वक्तव्यांमुळे बºयाच वेळा वादग्रस्त ठरले आहेत.राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने आग्रा येथे आयोजित केलेल्या संबंधित संघटनांच्या मंथन शिबिरात जवळपास सर्व वक्त्यांनीच शिक्षण पद्धती बदलायला हवी, असे मत व्यक्त केले होते. त्या अनुषंगाने विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना सरसंघचालक म्हणाले की, मेकॉलेची शिक्षण पद्धती पाश्चिमात्य म्हणून ओळखली जाते. मात्र स्वामी विवेकानंद, लोकमान्य टिळक, महात्मा गांधी, रवींद्रनाथ टागोर आणि स्वातंत्र्य लढ्यातील सारेच जण याच शिक्षण पद्धतीतून पुढे आले. पण त्यांनी पाश्चिमात्य पद्धतीचा स्वत:वर परिणाम होऊ दिला नाही.त्यामुळे तुम्ही कोणत्या शिक्षण पद्धतीत शिकता, यावरच सारे संस्कार अवलंबून नसतात. पाल्यांवरील संस्काराची जबाबदारी पालकांचीही असते, असे सांगून भागवत म्हणाले की, सध्याच्या शिक्षण पद्धतीमध्ये बदल व्हायला हवा, याबाबत समाजात सहमती निर्माण होत आहे. मात्र सारे काही त्यावरच अवलंबून असते, असे नव्हे.

टॅग्स :Mohan Bhagwatमोहन भागवत