शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

महाराष्ट्रीयन महिलाही रणी ठाकल्या!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 9, 2019 02:29 IST

विज्ञान महोत्सव; महिला परिषदेत दबदबा

सीमा महांगडे 

कोलकाता : ‘महिलाही रणी ठाकल्या’ असे म्हणत पाचव्या भारतीय आंतरराष्ट्रीय विज्ञान परिषदेत महिला वैज्ञानिक व उद्योजिका यांच्यावर आयोजित २ दिवसीय परिषदेत महिला सक्षमीकरणाचे चित्र पाहायला मिळाले. विशेष म्हणजे शुक्रवारी दुसऱ्या दिवशीच्या सत्रात महाराष्ट्रीयन महिलांचा दबदबा चर्चासत्रात आणि कामगिरी सादरीकरणात दिसून आला.

स्वकर्तृत्वावर, मेहनतीच्या व जिद्दीच्या बळावर हळूहळू स्वत:ची व समाजाची प्रगती साधणाºया महिलांच्या या सत्रात महाराष्ट्राच्या मेळघाटात समाजकार्य करणाºया निरुपमा देशपांडे, अकोलेच्या फूड मदर म्हणून ओळखल्या जाणाºया शेतकरी ममताबाई आणि हजारो शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यास हातभार लावणाºया पुण्याच्या स्मिता घैसास यांनी आपल्या कामाचे सादरीकरण केले. त्यामुळे इतर क्षेत्रांप्रमाणे विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रातही महाराष्ट्रीयन महिलांनी आपला जोर दाखवून दिला.महिला वैज्ञानिक व उद्योजिकांच्या दुसºया दिवशीच्या सत्रात साध्या राहणीमानातून प्रसिद्धीस आलेल्या आणि आज जगासाठी प्रेरणा ठरणाºया महिलांना वक्ते म्हणून मार्गदर्शनासाठी बोलावण्यात आले होते. महाराष्ट्रातील अहमदनगरमधील अकोले येथील ममताबार्इंनी तर सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले. नऊवारी साडी आणि नाकात नथ असा पेहराव असलेल्या ममताबार्इंनी वर्मी ब्रीकेडचा (गांडूळ खतांच्या गोळ्या) वापर आणि मुळात त्याचे संशोधन कसे केले याची उकल सादरीकरणाद्वारे केली तेव्हा देशाच्या निरनिराळ्या कोपºयांतून आलेल्या उच्चशिक्षित महिलाही त्यांच्याकडे कुतूहलाने पाहत राहिल्या. साधे नैसर्गिक पण समृद्ध जीवन माणूस कसे जगू शकतो हे ममताबार्इंच्या घरी गेल्यानंतर समजते. विशेष म्हणजे ममताबाई निरक्षर आहेत. पण त्यांचे पारंपरिक ज्ञान एवढे उच्च दर्जाचे आहे की, परसबाग पाहणीसाठी आलेल्या आयआयटीच्या विद्यार्थ्यांनाही त्या मोलाचे धडे देतात.

शेतीचे धडे देऊन ममताबाई महिला शेतकºयांना समृद्ध करत आहेत तर स्मिता घैसासही आपल्या कार्यातून गेल्या ३५ वर्षांपासून शेतकरी / महिलांना आर्थिक सक्षमता व संपन्नता मिळवून देण्याचे कार्य त्यांच्या सुयश चॅरिटेबलद्वारे करत आहेत. महाराष्ट्र, राजस्थान, ओडिशा, छत्तीसगड, मध्य प्रदेश व आसाम या राज्यांतील ३५०० पेक्षा जास्त गावांमध्ये कृषिविकासातून सुयशचे काम पोहोचले आहे. 

टॅग्स :Womenमहिला