शहरं
Join us  
Trending Stories
1
"मराठी माझी माय, उत्तर भारत मावशी..; एक वेळ आई मेली तरी चालेल, पण मावशी जगली पाहिजे"
2
चिनी एअरलाइन्समध्ये विवाहित एअर होस्टेस आता 'एअर आंटी' झाली, मोठा वाद सुरू झाला
3
Travel : भारतापासून अवघ्या ४ तासांवर आहे 'हा' देश; शिमला-मनालीच्या बजेटमध्ये करू शकता परदेशवारी!
4
Amol Majumdar : भारतीय महिला संघाच्या यशामागचा हिरो अन् त्याचं ‘सेम टू सेम’ हिटमॅन स्टाईल सेलिब्रेशन
5
"मी म्हणालो हॉटेलवरून उडी मारेन अन् स्वतःला संपवून टाकेन", बालाजी कल्याणकरांच्या डोक्यात काय सुरू होतं?
6
तुम्हालाही 'हा' मेसेज आलाय? ताबडतोब डिलीट करा, अन्यथा रिकामी होऊ शकतं तुमचं बँक अकाऊंट!
7
३ वर्षाची असताना वडिलांचं निधन, आई रोजंदारीवर १५०० रुपये कमवायची; रेणुका ठाकूरचा संघर्षमय प्रवास
8
सहा महिन्यात एक लाखाचे ९ लाख! १० रुपयांचा शेअर आता 'शतका'च्या उंबरठ्यावर; कंपनीचं नावही आहे खास!
9
देशभरात भीषण अपघातांची मालिका; आंध्र प्रदेश, तेलंगणा, राजस्थानात 60 जणांचा बळी, अनेक जखमी
10
डोनाल्ड ट्रम्प यांनी न्युक्लिअर टेस्टिंगमध्ये घेतलं चीनचं नाव; आता ड्रॅगनने दिलं थेट उत्तर! म्हणाले...
11
Daya Dongre Death: पडद्यावरील खाष्ट सासू हरपली! ज्येष्ठ अभिनेत्री दया डोंगरे यांचं निधन
12
भीषण! भरधाव डंपरची बाईकला धडक, लोकांना चिरडलं; १९ जणांचा मृत्यू, धडकी भरवणारा Video
13
मोबाईल फोन रिस्टार्ट करण्याचे भन्नाट फायदे; वर्षानुवर्षे फोन वापरणाऱ्यांनाही नसतील माहीत!
14
Video: "मी कॅमेऱ्यावर कसं सांगू, ते वैयक्तिक..."; ब्ल्यू प्रिंटवर भाजपा उमेदवाराचं उत्तर व्हायरल
15
'त्यांनी अपमानाचे मंत्रालय निर्माण करावे...' प्रियांका गांधी यांचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल
16
उल्हासनगर महापालिका कलानी मुक्त करणार; भाजपा जिल्हाध्यक्ष राजेश वधारियांचा इशारा
17
स्वतःच्याच वडिलांचे नाव घ्यायला लाज वाटते का?, 'जंगलराज'चा उल्लेख करत PM मोदींचा घणाघात
18
"आशिष शेलारांची बुद्धी चांगली होती, आता गंज लागलाय कारण..."; संदीप देशपांडेंचे दुबार मतदारांवरून उलट सवाल
19
फक्त लग्न करण्यास नकार देणे म्हणजे आत्महत्येस प्रवृत्त करणे नाही: सर्वोच्च न्यायालय
20
शेरवानी घातली, फेटा बांधला, नवरदेव तयार झाला; तितक्यात एक फोन आला अन् सगळ्यांनाच धक्का बसला!

महाराष्ट्र, पश्चिम बंगाल मतदार यादी घोळ; निवडणूक आयोग मतदान ओळखपत्र, आधार लिंक करणार; १८ मार्चला बैठक

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2025 10:30 IST

महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीवरून विरोधकांनी केलेल्या जादाच्या मतदारांचा दाव्यानंतर निवडणूक आयोगाने मोठा निर्णय घेण्याची तयारी सुरु केली आहे.

महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीवरून विरोधकांनी केलेल्या जादाच्या मतदारांचा दाव्यानंतर निवडणूक आयोगाने मोठा निर्णय घेण्याची तयारी सुरु केली आहे. निवडणूक ओळखपत्र लवकरच आधारला जोडले जाण्याची शक्यता आहे. असे केल्यास बोगस मतदार आपोआप बाद होणार आहेत. यामुळे भविष्यातील निवडणुकांत बोगस मतदान होण्याची शक्यता कमी आहे. 

१८ मार्चला केंद्रीय गृह सचिव, विधिमंडळ विभागाचे सचिव आणि UIDAI चे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यात बैठक होणार आहे. या बैठकीत बराच काळ प्रलंबित असलेला व्होटिंग कार्ड आणि आधार कार्ड जोडण्याचा मुद्दा चर्चिला जाणार आहे. पश्चिम बंगालमध्ये व्होटर आयडीच्या डुप्लिकेट एन्ट्रीमुळे तृणमुलने चिंता व्यक्त केली होती. 

यावरून राजकीय घमासान सुरु असताना निवडणूक आयोगाने डुप्लिकेट मतदार एन्ट्री हटविण्याचा शब्द दिला आहे. महाराष्ट्रातही शिर्डी मतदारसंघात एकाच इमारतीत लाखभर मतदार नोंद झाल्याचे आरोप काँग्रेसने केले होते. 

निवडणूक कायदे (सुधारणा) विधेयक, २०२१ निवडणूक अधिकाऱ्यांना मतदारांचे आधार क्रमांक मागण्याची परवानगी देते. पण ते ऐच्छिक आहे. निवडणूक आयोगाने स्वेच्छेने त्यांच्या डेटाबेसमध्ये मोठ्या प्रमाणात आधार क्रमांक प्रविष्ट केले आहेत. परंतू गोपनियतेच्या भीतीने दोन्ही डेटा एकत्र केलेले नाहीत. आयकर विभागाने जसे पॅन कार्ड आणि आधार कार्ड जोडले तसेच निवडणूक आयोगही निवडणूक ओळखपत्र आणि आधार कार्ड एकमेकांना लिंक करणार आहे. 

 निवडणूक आयोगाने २०१७ मध्येच सर्वोच्च न्यायालयाता याबाबतचा प्रस्ताव मांडला होता. परंतू त्यावर  विचार केला नाही. मतदान यादीतील डुप्लिकेशन यामुळे रोखता येऊ शकते, असा दावा निवडणूक आयोगाचा आहे. यावर आता येत्या १८ तारखेला काय चर्चा होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

टॅग्स :Election Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोगAdhar Cardआधार कार्ड