शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
3
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
4
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
5
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
6
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
7
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
8
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
11
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
12
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
13
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
14
Ather IPO GMP Today : Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
15
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
16
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
17
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
18
जखमेवर मीठ! मुंबईविरुद्धच्या पराभवानंतर बीसीसीआयने ऋषभ पंतला ठोठावला लाखोंचा दंड
19
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
20
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी

Maharashtra Government: शिवसेनेचे नेते 'गजनी' बनलेत; सामनातील टीकेवरुन भाजपाचा पलटवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2019 14:10 IST

शिवसेनेला एनडीएमधून काढण्यात आले आहे.

नवी दिल्ली - राज्यातील सत्तास्थापनेवरुन भाजपा आणि शिवसेनेत तणाव वाढलेला आहे. सामना अग्रलेखातून भाजपावर करण्यात आलेल्या टीकेवर भाजपानेही जशास तसं उत्तर दिलं आहे. भाजपाचे राष्ट्रीय प्रवक्ते जीवीएल नरसिम्हा राव यांनी आम्ही सामना वाचत नाही, जे त्यात लिखाण करतात तेच सामना वाचतात, ज्यांना बाहेर जायचं होतं ते स्वत: बाहेर गेले आहेत असा टोला भाजपाने शिवसेनेला लगावला आहे. 

यावेळी बोलताना जीवीएल नरसिम्हा राव यांनी सांगितले की, आम्ही आहे त्याठिकाणीच उभे आहोत, बाहेर गेल्यानंतर तुम्ही कसं बोलू शकता की, तुम्ही घराचा हिस्सा आहात. तसेच शिवसेनेचे प्रवक्ते सध्या गजनी बनले, दोन दिवसांपूर्वी काही वेगळं बोलतात, आज काही वेगळं बोलतात अशा शब्दात शिवसेनेवर पलटवार करण्यात आला आहे. 

त्याचसोबत आम्ही महाराष्ट्राच्या जनतेला चांगले सरकार देण्याचं वचन दिलं होतं. जर कोणी विश्वासघात केला असेल तर तो शिवसेनेने केला आहे. तसेच जो पक्ष राजकारणासाठी सत्तेच्या मागे पळत असतो ते कधी ना कधी पक्ष विखुरता दिसतो असंही भाजपाने सांगितले आहे. 

सामना अग्रलेखातून शिवसेनेने भाजपावर तोंडसुख घेतलं आहे. एनडीएतून बाहेर काढणारे हे कोण?असा सवाल शिवसेनेने भाजपाला विचारला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्राची घेतलेला पंगा भाजपला उखडून टाकणार,असा हल्लाबोल शिवसेनेने सामनातून केला आहे. 

शिवसेनेला एनडीएमधून काढण्यात आले आहे. राज्यात शिवसेना-भाजपमध्ये असलेले मतभेद आणि राज्यात लागू झालेली राष्ट्रपती राजवट यामुळे वाद विकोपाला गेला आहे. शिवसेना सुरुवातीपासूनच एनडीएमध्ये होती. ज्याने ही घोषणा केली, त्याला शिवसेनेचे मर्म आणि कर्म कळले नाहीत. ज्या काळात भारतीय जनता पक्षाच्या जवळही कोण फिरकत नव्हतं. त्यावेळी एनडीएची स्थापना झाली. त्याच एनडीएमधून शिवसेनेला काढण्याची नीच घोषणा केल्याचे म्हटलं आहे. 

शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पुण्यातिथीच्या दिवशीच शिवसेनेला एनडीएमधून काढण्याची घोषणा करण्यात आली. सर्वजण विरोधात गेली असताना मोदींचा बचाव करणाऱ्या संघटनेला एनडीएतून बाहेर काढण्यात आलं आहे. महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांचा आहे. हा महाराष्ट्र मंबाजींना साथ देणार नाही. छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्राशी घेतलेला हा पंगा तुमचा बांबू उखडून टाकल्याशिवाय राहणार नाही, हे वचन आम्ही पंगा घेणाऱ्यांना देत आहोत, असंही आग्रलेखात म्हटलं आहे. 

टॅग्स :BJPभाजपाShiv Senaशिवसेना