शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताने एकामागोमाग एक १५ गोल डागले; समोरचे '0'वरच पाहत राहिले
2
मुंबईकडे जाण्यासाठी रेल्वे स्थानकांवर गर्दीच-गर्दी; मराठा आंदोलकांवर रेल्वे पोलिसांचे लक्ष...
3
मोदी चीनमध्ये असताना डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा; म्हणे, भारताने टेरिफवर ऑफर दिली...
4
डोनाल्ड ट्रम्प यांची भगवा पार्टीने अंत्ययात्रा काढली, लोकांना तेराव्यालाही बोलावले
5
शक्य तितक्या लवकर मुंबईचे रस्ते सोडा...; मनोज जरांगे यांची मराठा आंदोलकांना सूचना
6
...तर आम्हीही लाखोंच्या संख्येने मुंबईत येऊ; OBC समाजाचा इशारा, मंत्री छगन भुजबळ जरांगेंवर संतापले
7
जगदीप धनखड कुठे आहेत? एका बड्या नेत्याच्या फार्महाऊसवर...; माजी आमदारांच्या पेन्शनसाठीही अर्ज...
8
अफगाणिस्तानात भूकंपामुळे हाहाकार, भारताने पुढे केला मदतीचा हात!१ हजार तंबूंसह काय काय पाठवलं?
9
PNB आणि बँक ऑफ इंडियाच्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी...; आजपासून स्वस्त झालं कर्ज!
10
WhatsApp हॅकर्सच्या निशाण्यावर? 'ही' चूक केल्यास तुमचा फोन होऊ शकतो हॅक!
11
"...तर यातून लवकर मार्ग निघू शकतो"; CM देवेंद्र फडणवीसांचा मराठा आंदोलकांना प्रामाणिक सल्ला
12
जीममध्ये पुरुष ट्रेनर महिलांना देतायेत ट्रेनिंग...! अलाहाबाद उच्च न्यायालयाने व्यक्त केली चिंता; म्हणाले...
13
"आता प्रशासन कोर्टाच्या निर्णयाचे उचित पालन करेल..."; CM देवेंद्र फडणवीसांचं रोखठोक मत
14
हॉटेलला पोहचूनही ५० मिनिटे कारमध्येच थांबले; मोदी-पुतिन यांची खास भेट, जाणून घ्या भेटीमागे काय?
15
५ वर्ष बेस्ट फ्रेंडच्या पतीसोबत अफेअर; पत्नीला भनक लागली, तिनं 'असा' बदला घेतला अख्खं शहर बघत राहिलं
16
लग्नाला २२ वर्षे झाली तरी 'तो' देतोय त्रास; पत्नीने थेट मुख्यमंत्र्याकडे मागितली इच्छामृत्यूची परवानगी
17
१४५ कोटींची लोकसंख्या मोजण्यासाठी खर्च किती? जनगणनेसाठी मागितले गेले एवढे पैसे...
18
रोहित शर्माची फिटनेस टेस्ट झाली; निकालही आला! किंग कोहलीचं काय?
19
मराठा आंदोलनात नियमांचे उल्लंघन, हायकोर्टाची नाराजी; राज्य सरकारला निर्देश, सुनावणीत काय घडले?
20
फक्त कारच नाहीत, १७५ वस्तू स्वस्त होणार, पण या वस्तू महागणार...

निराधार, गरिबांना घरे देण्यात महाराष्ट्र पुढे

By admin | Updated: March 2, 2017 05:50 IST

निराधार आणि गरिबांना निवारा उपलब्ध करून देण्यात महाराष्ट्र राज्य देशात चार राज्यांत पहिल्या स्थानावर आहे.

हरिश गुप्ता,नवी दिल्ली- निराधार आणि गरिबांना निवारा उपलब्ध करून देण्यात महाराष्ट्र राज्य देशात चार राज्यांत पहिल्या स्थानावर आहे. पश्चिम बंगालने जास्तीतजास्त गरिबांना घरांचा प्रत्यक्ष ताबा देण्यात आघाडी घेतली असून, महाराष्ट्र, गुजरात आणि तमिळनाडूनेही यात चांगले काम केले आहे.प्रत्येक राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात शहरी निराधारांसाठी किती निवारे उपलब्ध आहेत याची प्रत्यक्ष खातरजमा करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने समिती स्थापन करण्याचे आदेश दिले होते. या समितीचे अध्यक्ष दिल्ली उच्च न्यायालयाचे निवृत्त न्या. कैलाश गंभीर असून, समिती आपला अहवाल पुढील महिन्यात सादर करील. हे निवारे नॅशनल अर्बन लाईव्हलीहुड मिशनअंतर्गत (एनयूएलएम) मार्गदर्शक निकषांनुसार असल्याची खातरजमा ही समिती करील. तसेच निवारा घरे बांधण्याचा वेग कमी का, याची कारणे विचारणार आहे. या योजनेसाठी मंजूर झालेल्या निधीचा वापर न होणे, तो दुसऱ्या कामाकडे वळवणे किंवा त्याचा चुकीचा वापर करणे याचाही जाब समिती विचारेल.पश्चिम बंगाल अव्वल स्थानी जवाहरलाल नेहरू नॅशनल अर्बन रिनिव्हल मिशन आणि प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत (नागरी) महाराष्ट्राला जवळपास तीन लाख घरे मंजूर झाली आहेत. एक लाख ३७ हजार २७५ घरांचे बांधकाम आधीच झालेले असून, गरीब कुटुंबांना ९८ हजार ६२ घरांचा ताबा दिला गेला आहे. तथापि, पश्चिम बंगालने त्याला मंजूर झालेल्या कोट्यापैकी ५० टक्के घरे बांधून पूर्ण केली आहेत आणि त्या सर्वांचा लाभार्थी गरिबांना दिला गेला आहे. पश्चिम बंगाल चार राज्यांत पहिल्या क्रमांकावर आहे.>137275 घरांचे बांधकाम पूर्ण झालेले आहे.- 98062 कुटुंबांना घरांचा ताबा दिला- 62514 घरांचे बांधकाम अद्याप बाकी- 297851 घरे महाराष्ट्रासाठी मंजूर झालेली आहेत