शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

पश्चिम बंगालमध्ये महाजंगलराज, ४ मेनंतर होईल प्रत्येकाचा हिशेब- पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2026 12:57 IST

मालदा घेरावाचा उल्लेख करत ममता राजवटीवर टीका

कूचबिहार: मालदामध्ये न्यायालयीन अधिकाऱ्यांना घेराव घालण्याची घटना म्हणजे, पश्चिम बंगालमधील तृणमूलच्या “महा जंगलराज”चे लक्षण असल्याचे टीका पंतप्रधाननरेंद्र मोदी यांनी केली. विधानसभा निवडणुका सत्ताधारी पक्षाने पसरवलेल्या 'भय' आणि भाजपच्या 'भरोसा' यांच्यातील लढत असल्याचेही मोदी यांनी म्हटले आहे. 

कूचबिहार येथे बंगालमधील पहिल्या प्रचारसभेला संबोधित करताना मोदी यांनी ममता बॅनर्जी सरकारवर जोरदार टीका केली. राज्याच्या भविष्यासाठी ही निवडणूक निर्णायक असून, ४ मेनंतर कायद्याचे राज्य प्रस्थापित झाल्यावर टीएमसीच्या गुंडांनी केलेल्या अत्याचारांचा 'चुन चुन के हिसाब होगा' असा इशारा मोदी यांनी दिला. हे सरकार दररोज बंगालच्या पवित्र भूमीवर लोकशाहीला रक्ताने माखत आहे, असेही माेदी म्हणाले.

भाजप घुसखोरी थांबवेल आणि घुसखोरांना बाहेर काढेल

मोदी म्हणाले, एका बाजूला टीएमसीचे ‘भय’ आहे आणि दुसऱ्या बाजूला भाजपचा ‘भरोसा’ आहे. एका बाजूला टीएमसीच्या कट मनी आणि भ्रष्टाचाराचे भय आहे, तर दुसऱ्या बाजूला विकासाला गती देणारा भाजप आहे. एका बाजूला बदलत्या लोकसंख्येमुळे स्वतःच्या भूमीवरील स्वातंत्र्य गमावण्याची भीती आहे. दुसऱ्या बाजूला स्वतःच्या मातीत अभिमानाने आणि उंच मानेने जगण्याचा भाजपचा विश्वास आहे. भाजप घुसखोरी थांबवेल आणि घुसखोरांना बाहेर काढेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

दोन-तीन दिवसांपूर्वी संपूर्ण देशाने पाहिले की मालद्यात न्यायालयीन अधिकाऱ्यांना कसे ओलीस ठेवण्यात आले. हे कसले सरकार आहे? न्यायाधीश आणि घटनात्मक प्रक्रियाही सुरक्षित नाहीत, ही कसली व्यवस्था आहे? असे लोक बंगालच्या सामान्य नागरिकांची सुरक्षा कशी सुनिश्चित करू शकतात?- नरेंद्र मोदी, पंतप्रधान

भाजप केवळ घुसखोरांच्या विरोधात : नितीन गडकरी

भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी रविवारी सांगितले की, भाजप ठरावीक समुदायाच्या नव्हे, घुसखोरांच्या विरोधात आहे. आसाम व पश्चिम बंगालमध्ये पक्षाच्या विजयाबाबत त्यांनी पूर्ण विश्वास व्यक्त केला. वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत गडकरी यांनी सांगितले की, ‘धर्माचा विचार न करता सर्वांना सोबत घेऊन जाणे हे भाजपचे धोरण आहे. घुसखोरांना आमचा विरोध आहे. पायाभूत सुविधांसाठी केलेली मोठी गुंतवणूक आणि प्रशासन - केंद्रित दृष्टिकोन हे भाजपच्या निवडणूक रणनीतीचे आधारस्तंभ आहेत.’ आसाममध्ये ९ एप्रिल रोजी विधानसभा निवडणुका होणार आहे.

टॅग्स :West Bengal Assembly Election 2026पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक २०२६prime ministerपंतप्रधानNarendra Modiनरेंद्र मोदी