शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटी नंतर MRP वर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; सामान्यांच्या थेट खिशावर परिणाम होणार...
2
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
3
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
4
हायव्होल्टेज ड्रामा! २० रुपयांत ६ ऐवजी दिल्या ४ पाणीपुरी; 'ती' ढसाढसा रडली, रस्त्यामध्येच बसली अन्...
5
लवकरच नवी Thar लाँच करण्याच्या तयारीत महिंद्रा, आधीच्या तुलनेत मोठे बदल होणार; जाणून घ्या, किती असणार किंमत?
6
फिटनेस मंत्र! सरळ तर सर्वच चालतात, कधीतरी उलटं चालून पाहा; फक्त ५ मिनिटंही पुरेशी
7
Navratri 2025: प्रतापगडावर नवरात्रीत का बसवले जातात दोन घट? जाणून घ्या शिवकालीन परंपरा
8
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
9
"तरीही त्याला कुत्रा चावतो.."; पाकिस्तानी सलामीवीर सॅम अयुबबाबत नेमकं काय बोलला माजी खेळाडू?
10
वसईत ट्रॅफिकमुळे गेला २ वर्षाच्या मुलाचा बळी; मुंबई अहमदाबाद महामार्गावर पाच तास अडकून होती रुग्णवाहिका
11
पितृपक्ष २०२५: चतुर्दशी श्राद्धाला असते विशेष महत्त्व, पण असे का? पाहा, काही मान्यता
12
टॉस पूर्वीची ती चार मिनिटे...! भारत सरकारची मंजुरी अन् BCCIचा मॅच रेफरींना संदेश पोहोचला...
13
'या अली' गाण्यामागचा आवाज हरपला, प्रसिद्ध गायक जुबीनचा स्कुबा डायव्हिंग करताना मृत्यू
14
Garud Puran: मृत्यूनंतर मोक्ष मिळेल का माहीत नाही, पण जिवंतपणी 'या' उपायांनी मिळू शकेल!
15
परप्रांतीयांना भाड्याने घरं देऊ नका, पंजाबमध्ये ठिकठिकाणी आवाहन; यूपी-बिहारींना हाकलण्याची मागणी
16
तीन सख्ख्या बहिणींवर नातेवाईकच २०२० पासून करत होता बलात्कार; अहिल्यानगरमधील संतापजनक घटना
17
विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्या नियुक्तीला 'खासदारकी'मुळे आव्हान, न्यायालयाने काय दिला निकाल?
18
स्कँडल, कर्ज आणि घसरते शेअर्स... जगातील सर्वात मोठ्या फूड कंपनीला वाचवू शकतील का नवे बॉस?
19
VIDEO: अरे देवा! 'मोटूलाल'ने प्यायली ७२ लाखांची दारू, जमीनही विकली; मुलाखत झाली व्हायरल
20
इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत संघात स्थान का मिळालं नाही? कुलदीपचं गंभीरबाबत मोठं विधान, म्हणाला...

धक्कादायक! जमिनीचा वाद, दोन महिलांना जिवंत गाडण्याचा प्रयत्न; व्हिडीओ व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2024 09:26 IST

मध्य प्रदेशातील रीवा येथे दोन महिलांना जमिनीत जिवंत गाडण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

शेतजमिनीचे वाद आपल्याकडे मोठ्या प्रमाणात असतात, अनेक ठिकाणी जमिनीसाठी हत्येसारखी प्रकरण समोर आली आहेत. मध्य प्रदेशातून आता अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मध्य प्रदेशातील रीवा येथे दोन महिलांना जमिनीत जिवंत गाडण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रमाणात व्हायरल होत आहे. याप्रकरणी पोलिसांनी तीन जणांविरुद्ध एफआयआर नोंदवला असून एका आरोपीला अटक केली आहे.

RSS च्या कार्यक्रमात सहभागी होऊ शकतात सरकारी कर्मचारी; ५८ वर्षांपूर्वीचे निर्बंध हटवले

मध्य प्रदेशातील रेवा येथे एका रस्त्याचे काम सुरू आहे.या रस्त्याच्या कामाला विरोध सुरू आहे. विरोध करणाऱ्या दोन महिलांवर ट्रकमधून खडी टाकल्याने ते अर्धवट गाडले. ही घटना मंगवा पोलीस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या हिनोटा जोरोट गावात शनिवारी घडली. पोलिसांनी दिलेली माहिती अशी,  याप्रकरणी एकाला अटक करण्यात आली आहे. या घटनेसंदर्भात तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी या घटनेमागे कौटुंबिक वादाचे कारण सांगितले आहे. या घटनेचे सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल झाला आहे. 

अतिरिक्त पोलिस अधीक्षक विवेक लाल यांनी सांगितले की, ममता पांडे आणि आशा पांडे नावाच्या महिला रस्त्याच्या बांधकामाला विरोध करत होत्या आणि त्या खड्याखाली अर्धवट गाडल्या. पोलीस या प्रकरणाचा तपास करत असून पुराव्याच्या आधारे कारवाई केली जाईल.

एडीजी जयदीप प्रसाद यांनी सांगितले की, कुटुंबातील वादातून ही घटना घडली आहे. तक्रारदार आशा पांडे यांनी सांगितले की, हा वाद त्यांचे नातेवाईक गोकरण पांडे यांच्या संयुक्त मालकीच्या जमिनीच्या तुकड्याशी संबंधित होता आणि त्या जमिनीवर रस्ता बनवला जात असताना त्यांनी त्यांच्या एका नातेवाईकासह त्याला विरोध केला.

आशा पांडे यांनी पोलिसांना सांगितले की, ट्रक चालकाने त्यांच्यावर खडी फेकली आणि नंतर गावकऱ्यांनी त्यांना बाहेर काढले.

पोलिस अधीक्षक विवेक सिंह यांनी सांगितले की, ट्रक जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी तीन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. त्यापैकी एकाला अटक करण्यात आली आहे, तर अन्य दोघांचा शोध सुरू आहे.

काँग्रेसची टीका

या घटनेनंतर मध्य प्रदेशातील कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्न उपस्थित करत विरोधी पक्ष काँग्रेसने भाजपावर निशाणा साधला, तर मुख्यमंत्री मोहन यादव म्हणाले की, महिलांच्या सुरक्षेला त्यांच्या सरकारचे सर्वोच्च प्राधान्य आहे. पोलिसांनी तत्परतेने कारवाई करत तीन आरोपींपैकी एकाला अटक केल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

मुख्यमंत्री यादव यांनी सोशल मिडिया प्लॅटफॉर्म एक्सवर सांगितले की, "रीवा जिल्ह्यातील महिलांवरील अत्याचाराचे प्रकरण सोशल मीडियावर प्रसारित झालेल्या व्हिडिओद्वारे माझ्या निदर्शनास आले, यामध्ये मी जिल्हा प्रशासन आणि पोलिसांना त्वरित कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत.

टॅग्स :Madhya Pradeshमध्य प्रदेशSocial Viralसोशल व्हायरलCrime Newsगुन्हेगारी