शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
2
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
3
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
4
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
5
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
6
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
7
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
8
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
9
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
10
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
11
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
12
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
13
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
14
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
15
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
16
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
17
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
18
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
19
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
20
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव

पत्रकारांच्या सुरक्षिततेसाठी कायदा करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2017 03:09 IST

भारतात पत्रकारांवर राजरोस हल्ले चढवले जात आहेत. गेल्या वर्षभरात १ हजारांहून अधिक पत्रकारांवर हल्ले झाले. उत्तरप्रदेश, मध्यप्रदेश, बिहार, छत्तिसगड, पश्चिम बंगाल, महाराष्ट्रासह अन्य राज्यात काही पत्रकारांना आपले प्राण गमवावे लागले.

सुरेश भटेवरानवी दिल्ली : भारतात पत्रकारांवर राजरोस हल्ले चढवले जात आहेत. गेल्या वर्षभरात १ हजारांहून अधिक पत्रकारांवर हल्ले झाले. उत्तरप्रदेश, मध्यप्रदेश, बिहार, छत्तिसगड, पश्चिम बंगाल, महाराष्ट्रासह अन्य राज्यात काही पत्रकारांना आपले प्राण गमवावे लागले. या घटनांमुळे मीडियामध्ये असुरक्षिततेची भावना आहे.लोकशाहीचे पहारेकरीच सुरक्षित नाहीत तिथे मजबूत लोकशाहीची कल्पना कशी करणार? पत्रकारांच्या सुरक्षिततेसाठी देशात कायदा नाही. सरकारने हे विधेयक लवकर सादर करावे, अशी मागणी, काँग्रेस खासदार राजीव सातव यांनी लोकसभेत विशेष उल्लेखाद्वारे केली.कौशल्य अभ्यासक्रम नि:शुल्क मौलाना आझाद शिक्षण प्रतिष्ठानद्वारा देशात अल्पसंख्यांक समुदायासाठी रोजगार उपलब्ध करून देणाºया अभ्यासक्रमांसाठी गरीब नवाज कौशल्य विकास प्रशिक्षण नामक योजना आहे. जीएसटीसंदर्भात प्रशिक्षण व जागरूकता निर्माण करण्यास काही अभ्यासक्रमांचा समावेश त्यात आहे. या केंद्राचे नुकतेच हैद्राबादला उद्घाटन झाले. अशी केंद्रे लवकरच देशभर स्थापन केली जाणार आहेत. हा अभ्यासक्रम विनामूल्य असेल, असे उत्तर अल्पसंख्यांक कार्य मंत्री मुख्तार अब्बास नकवी यांनी खासदार राजीव सातव यांनी या संदर्भात विचारलेल्या प्रश्नाला दिले.किती काळ भारत मूकदर्शक भारताचे तिबेटियन नागरिकांशी ऐतिहासिक, सांस्कृतिक तथा पुरातन संबंध आहेत. मात्र तिबेटमधे सध्या जे घडते आहे, ते केवळ हिमनगाचे टोक आहे. या पार्श्वभूमीवर भारत सरकार कितीकाळ मूकदर्शकाची भूमिका बाजावणार? असा प्रश्न डॉ. नरेंद्र जाधव यांनी उपस्थित केला. त्याला उत्तर देताना परराष्ट्र व्यवहारमंत्री सुषमा स्वराज म्हणाल्या की, भारत कधीही मूकदर्शकाच्या भूमिकेत नव्हता. आजही नाही. भारताच्या हिताविरूध्द कोणताही विषय असेल तर सरकार प्रत्येक वेळी ठोस प्रतिक्रिया नोंदवते.ज्या राज्यात खासगी क्षेत्रातील लोक सरकारची ‘२0२२ पर्यंत सर्वांसाठी घरे’ ही योजना राबवण्यास उत्सुक आहेत, तिथे राज्य सरकार, महानगरपालिका अथवा स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये समन्वयाचा अभाव असल्याने योजनांचे आराखडे व मंजुºयांना २ वर्षांपेक्षा अधिक काळ लागतो. हा विलंब टाळण्यास सरकार काय करू शकते? असा प्रश्न खा. अजय संचेती यांनी उपस्थित केला. त्यावर सभापती हमीद अन्सारींनी या विषयावर अल्पकालिन चर्चा उपस्थित करणारी नोटीस देण्याबाबत सुचवले.