शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
2
ट्रम्प, क्लिंटन ते बिल गेट्स; एपस्टीनच्या 'काळ्या' डायरीतील बड्या नेत्यांचे फोटो बाहेर, आक्षेपार्ह वस्तूंचाही समावेश
3
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
4
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
5
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
6
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
7
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
8
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
9
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
10
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
11
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
12
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
13
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
14
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
15
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
16
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
17
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
18
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
19
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
20
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
Daily Top 2Weekly Top 5

लोया प्रकरण नव्या न्यायाधीशांकडे?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2018 02:53 IST

कामकाजाच्या वाटपावरून सरन्यायाधीश न्या. दीपक मिस्रा व चार ज्येष्ठ न्यायाधीशांमधील चव्हाट्यावर आलेले मतभेद दूर करण्याच्या मार्गात अडचण येऊ नये

नवी दिल्ली : कामकाजाच्या वाटपावरून सरन्यायाधीश न्या. दीपक मिस्रा व चार ज्येष्ठ न्यायाधीशांमधील चव्हाट्यावर आलेले मतभेद दूर करण्याच्या मार्गात अडचण येऊ नये, यासाठी न्या. अरुण मिश्रा व न्या. मोहन शांतनगोदूर यांच्या खंडपीठाने न्यायाधीश बी. एच. लोया यांच्या संशयास्पद मृत्यूशी संबंधित दोन याचिकांवरील सुनावणीतून माघार घेण्याचे संकेत दिले आहेत. न्यायाधीशांमधील वादास लोया प्रकरण हेही एक प्रमुख कारण होते.गोरेगाव, मुंबई येथील एक पत्रकार बंधुराज संभाजी लोणे व दिल्लीतील सामाजिक कार्यकर्त्या तेहसीन पूनावाला यांनी लगोलग दाखल केलेल्या या याचिका न्या. अरुण मिश्रा व न्या. मोहन शांतनगोदूर यांच्या खंडपीठापुढे आल्या, तेव्हा न्यायाधीशांनी या प्रकरणाची (तपासाची) कागदपत्रे एक आठवड्यात सादर करण्याचा आदेश महाराष्ट्र सरकारला दिला. त्यासोबतच या याचिका पुढील तारखेला ‘सुयोग्य खंडपीठापुढे’ ठेवाव्यात, असेही नमूद केले.यानुसार, या याचिकांवरील सुनावणीसाठी पुढील तारीख व संभाव्य नवे खंडपीठ अद्याप ठरलेले नाही, असे सर्वोच्च न्यायालायच्या वेबसाइटवरून दिसते.न्या. अरुण मिश्रा व न्या. शांतनगोदूर यांनी, सरन्यायाधीशांनी त्यांच्याकडे सोपविलेले या याचिकांवरील सुनावणीचे काम अन्य कोणाकडे तरी द्यावे, असे अधिकृतपणे नमूद करणे यास महत्त्व आहे व त्यास सर्वोच्च न्यायालयात सध्या सुरू असलेल्या न्यायाधीशांमधील वादाची पार्श्वभूमी आहे. न्या. जस्ती चेलमेश्वर, न्या. तरुण गोगोई, न्या. मदन बी. लोकूर व न्या. कुरियन जोसेफ चार ज्येष्ठतम न्यायाधीशांनी १२ जानेवारी रोजी पत्रकार परिषद घेऊन, सरन्यायाधीश न्या. दीपक मिस्रा कामाचे वाटप करताना पक्षपात करतात व ज्येष्ठांना डावलून महत्त्वाची प्रकरणे ‘निवडक’ कनिष्ठांकडे देतात, असा जाहीर आरोप केला होता. त्यांच्या नाराजीचे एक कारण लोया प्रकरण या खंडपीठाकडे दिले जाणे हेही होते व तसे त्यांनी स्पष्टपणे बोलूनही दाखविले होते.चार न्यायाधीशांनी त्यांची नाराजी उघड करण्याच्या आदल्याच दिवशी म्हणजे, ११ जानेवारी रोजी लोणे यांची याचिका सरन्यायाधीश न्या. मिस्रा, न्या. अजय खानविलकर व न्या. डॉ. धनंजय चंद्रचूड यांच्या खंडपीठापुढे सर्वप्रथम आली. त्या वेळी याचिकेतील त्रुटी दूर केल्या गेल्या, तर ती १२ जानेवारीस ‘सुयोग्य खंडपीठापुढे लावावी, असे निर्देश दिले गेले होते. लगेगच प्रशासकीय आदेशाने सरन्यायाधीशांनी या याचिकेसाठी न्या. मिश्रा व न्या. शांतनगोदूर यांचे खंडपीठ मुक्रर केले होते. या याचिकांवर त्यांनी सुनावणीही घेतली.या पार्श्वभूमीवर न्या. अरुण मिश्रा व न्या. शांतनगोदूर यांनी या सुनावणीतून माघार घेऊन ते काम अन्य कोणाकडे तरी सोपविण्याचे आदेशात लेखी स्वरूपात नमूद करावे, यास महत्त्व आहे.

टॅग्स :CBI judge B.H Loya death caseन्या. लोया मृत्यू प्रकरण