शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

लोया प्रकरण नव्या न्यायाधीशांकडे?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2018 02:53 IST

कामकाजाच्या वाटपावरून सरन्यायाधीश न्या. दीपक मिस्रा व चार ज्येष्ठ न्यायाधीशांमधील चव्हाट्यावर आलेले मतभेद दूर करण्याच्या मार्गात अडचण येऊ नये

नवी दिल्ली : कामकाजाच्या वाटपावरून सरन्यायाधीश न्या. दीपक मिस्रा व चार ज्येष्ठ न्यायाधीशांमधील चव्हाट्यावर आलेले मतभेद दूर करण्याच्या मार्गात अडचण येऊ नये, यासाठी न्या. अरुण मिश्रा व न्या. मोहन शांतनगोदूर यांच्या खंडपीठाने न्यायाधीश बी. एच. लोया यांच्या संशयास्पद मृत्यूशी संबंधित दोन याचिकांवरील सुनावणीतून माघार घेण्याचे संकेत दिले आहेत. न्यायाधीशांमधील वादास लोया प्रकरण हेही एक प्रमुख कारण होते.गोरेगाव, मुंबई येथील एक पत्रकार बंधुराज संभाजी लोणे व दिल्लीतील सामाजिक कार्यकर्त्या तेहसीन पूनावाला यांनी लगोलग दाखल केलेल्या या याचिका न्या. अरुण मिश्रा व न्या. मोहन शांतनगोदूर यांच्या खंडपीठापुढे आल्या, तेव्हा न्यायाधीशांनी या प्रकरणाची (तपासाची) कागदपत्रे एक आठवड्यात सादर करण्याचा आदेश महाराष्ट्र सरकारला दिला. त्यासोबतच या याचिका पुढील तारखेला ‘सुयोग्य खंडपीठापुढे’ ठेवाव्यात, असेही नमूद केले.यानुसार, या याचिकांवरील सुनावणीसाठी पुढील तारीख व संभाव्य नवे खंडपीठ अद्याप ठरलेले नाही, असे सर्वोच्च न्यायालायच्या वेबसाइटवरून दिसते.न्या. अरुण मिश्रा व न्या. शांतनगोदूर यांनी, सरन्यायाधीशांनी त्यांच्याकडे सोपविलेले या याचिकांवरील सुनावणीचे काम अन्य कोणाकडे तरी द्यावे, असे अधिकृतपणे नमूद करणे यास महत्त्व आहे व त्यास सर्वोच्च न्यायालयात सध्या सुरू असलेल्या न्यायाधीशांमधील वादाची पार्श्वभूमी आहे. न्या. जस्ती चेलमेश्वर, न्या. तरुण गोगोई, न्या. मदन बी. लोकूर व न्या. कुरियन जोसेफ चार ज्येष्ठतम न्यायाधीशांनी १२ जानेवारी रोजी पत्रकार परिषद घेऊन, सरन्यायाधीश न्या. दीपक मिस्रा कामाचे वाटप करताना पक्षपात करतात व ज्येष्ठांना डावलून महत्त्वाची प्रकरणे ‘निवडक’ कनिष्ठांकडे देतात, असा जाहीर आरोप केला होता. त्यांच्या नाराजीचे एक कारण लोया प्रकरण या खंडपीठाकडे दिले जाणे हेही होते व तसे त्यांनी स्पष्टपणे बोलूनही दाखविले होते.चार न्यायाधीशांनी त्यांची नाराजी उघड करण्याच्या आदल्याच दिवशी म्हणजे, ११ जानेवारी रोजी लोणे यांची याचिका सरन्यायाधीश न्या. मिस्रा, न्या. अजय खानविलकर व न्या. डॉ. धनंजय चंद्रचूड यांच्या खंडपीठापुढे सर्वप्रथम आली. त्या वेळी याचिकेतील त्रुटी दूर केल्या गेल्या, तर ती १२ जानेवारीस ‘सुयोग्य खंडपीठापुढे लावावी, असे निर्देश दिले गेले होते. लगेगच प्रशासकीय आदेशाने सरन्यायाधीशांनी या याचिकेसाठी न्या. मिश्रा व न्या. शांतनगोदूर यांचे खंडपीठ मुक्रर केले होते. या याचिकांवर त्यांनी सुनावणीही घेतली.या पार्श्वभूमीवर न्या. अरुण मिश्रा व न्या. शांतनगोदूर यांनी या सुनावणीतून माघार घेऊन ते काम अन्य कोणाकडे तरी सोपविण्याचे आदेशात लेखी स्वरूपात नमूद करावे, यास महत्त्व आहे.

टॅग्स :CBI judge B.H Loya death caseन्या. लोया मृत्यू प्रकरण