शहरं
Join us  
Trending Stories
1
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
2
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
3
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
4
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
5
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
6
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
7
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
8
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
9
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
10
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
11
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
12
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
13
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
14
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
15
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
16
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
17
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
18
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
19
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
20
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...

लोकप्रतिनिधींचा स्तर खालावला !

By admin | Updated: August 3, 2016 05:12 IST

राम नाईक यांनी राजकीय नेते ते राज्यपाल अशा ३७ वर्षांच्या कारकिर्दीत अनेक विक्रम नावावर नोंदविले आहेत.

मीना-कमल,

लखनौ- राम नाईक यांनी राजकीय नेते ते राज्यपाल अशा ३७ वर्षांच्या कारकिर्दीत अनेक विक्रम नावावर नोंदविले आहेत. बॉम्बेचे मुंबई करणे असो, संसदेत गायले जाणारे वंदे मातरम्, खासदार निधी सुरू करणे असो की विदेशी बेबी मिल्कच्या पॅकवर ‘आईचेच दूध मुलांसाठी सर्वश्रेष्ठ असते’ हे वाक्य लिहिणे अनिवार्य करण्यासारख्या उपाययोजना असोत. त्याचे श्रेय या ८२ वर्षीय अनुभवी नेत्यालाच दिले जाते. कधी सरकारने पारित केलेली विधेयके परत पाठविल्याच्या वादामुळे तर कधी आपल्या कामकाजामुळे नाईक हे उत्तर प्रदेशात कायम चर्चेत राहिले आहेत. त्यांच्यावर राजभवनात संघांचा अजेंडा चालवत असल्याचा गंभीर आरोपही झाला, मात्र त्यांनी प्रत्येक वेळी संयम राखत कोणत्याही दबावाखाली न येता आपल्या संवैधानिक जबाबदाऱ्या धडाडीने पार पाडल्या. नाईक यांची मुख्यमंत्री अखिलेश यादव हेही खासगीत प्रशंसा करतात. नाईक यांनी लोकमतला दिलेल्या मुलाखतीत अनुभवाचा पट उलगडला.प्रश्न : उत्तर प्रदेशबाबत तुमचा अनुभव कसा राहिला?उत्तर : आयुष्याच्या ८२ वर्षे उलटली. उत्तर प्रदेशातील दोन वर्षे कशी गेली माहीत नाही. काम करीत राहिलो. १९७८ मध्ये पहिल्यांदा आमदार बनलो. त्यानंतर पाचवेळा खासदार आणि मंत्री राहिलो. पदावर असो किंवा नसो; मात्र गेल्या ३७ वर्षांमध्ये जनहिताचे कार्य करीत राहिलो. जे काम केले त्याचा वर्षभराचा लेखाजोखा जनतेसमोर ठेवत असतो. लोकांनी खूप प्रेम दिले.प्रश्न : उत्तर प्रदेशला पुढे नेण्यासाठी काय करायला हवे?उत्तर : मुंबईत उत्तर भारतीयांची संख्या मोठी आहे. येथील लोक तेथे जाऊन खूप मेहनत करून समोर जात आहेत. कुणी केळी विकतो. कुणी मासे विकतो, तर कुणी बिल्डर आहेत. नोकरीसाठी लोक मोठ्या संख्येने बाहेर पडतात. येथे रोजगार मिळाला तर तसे होणार नाही. येथे राहूनच तेवढे कष्ट घेतले तर निश्चितच राज्य पुढे जाईल.प्रश्न : राजभवन आणि सरकारमध्ये जोरदार संघर्ष निर्माण झाला. विधेयकांना मंजुरी वगैरे?उत्तर : सरकारसोबत माझा कधीही संघर्ष नव्हता मुख्यमंत्री अखिलेश यादव चांगले व्यक्ती आहेत. राज्याला विकासाच्या मार्गावर आणण्याचा विचार त्यांच्याकडे आहे. सरकार आणि माझे संबंध चांगले आहेत. विधेयकांची बाब पाहता संवैधानिक व्यवस्थेचे पूर्णपणे पालन करणे हे राज्यपालांचे उत्तरदायित्व ठरते. याच दायित्वाचे मी पालन केले. प्रश्न: तुम्ही उत्तर प्रदेशातील कायदा व सुव्यवस्थेबाबत?उत्तर : कायदा व सुव्यवस्था ठीक नसण्याची अनेक कारणे आहेत. कायदा व व्यवस्था वाईट आहे असे मी म्हणणार नाही,पण सध्या परिस्थिती सुधारण्याची गरज आहे.प्रश्न: आजपर्यंतच्या कार्यकाळात कोणती बाब खूप वाईट आणि मनाला त्रासदायक वाटली?उत्तर : एमबी क्लब येथील लष्कराच्या कार्यक्रमात धार्मिक वेशामुळे मुस्लिम धर्मगुरूला प्रवेश न दिला जाणे हे खूप वाईट वाटले. ड्रेस कोडचे पालन न केल्याने प्रवेश दिला गेला नाही. त्यावर मी नियम बदलण्याबाबत केंद्र सरकारला पत्र पाठविले आहे. प्रश्न: दयाशंकर सिंग आणि बसपामधील अपशब्दांचा वाद हे ताजे उदाहरण आहे. त्यावर नियंत्रणासाठी कोणता सल्ला द्याल?उत्तर : संसद असो की विधानसभा लोकप्रतिनिधींचा स्तर खालावला आहे. त्याला पिढ्यांचा बदलही म्हणता येईल, मात्र स्तर खालावला हे खरे आहे. >सक्रिय राजकारणात पुन्हा येणार काय?मला पाच वर्षे राज्यपालपदाची जबाबदारी सोपविली आहे. दोन वर्षे संपली आहेत. आणखी तीन वर्षे बाकी आहेत. त्यानंतर विचार करेन. पुढे काय करायचे हे ठरवताना समाजाला काही देण्याचा विचार राहील.संसद असो की विधानसभा लोकप्रतिनिधींचा स्तर खालावला आहे. त्याला पिढ्यांचा बदलही म्हणता येईल, मात्र स्तर खालावला हे खरे आहे. राजकारणाचा स्तरही घसरत आहे. भाषेवर संयम ठेवावा असा माझा सल्ला आहे.