शहरं
Join us  
Trending Stories
1
अमृतसरचं सुवर्ण मंदिर RDX नं उडवण्याची धमकी, ईमेलनंतर एकच खळबळ
2
"रशिया पुढील ५० दिवसांत युक्रेन युद्ध थांबवण्यास तयार झाला नाही, तर...!" डोनाल्ड ट्रम्प यांची रशियाला थेट धमकी
3
जड्डूची लढवय्या इनिंग व्यर्थ! बुमराहनंही बॅटिंग वेळी धैर्य दाखवलं, सिराजची अनलकी विकेट अन् इंग्लंडनं मारली बाजी
4
सर्व विमानांचे फ्युएल कंट्रोल स्विच तपासा; एअर इंडिया अपघातानंतर डीजीसीआयने कंपन्यांना दिले महत्त्वाचे आदेश
5
'त्या' तरुणींची छांगूरच्या तावडीतून सुटका करून, त्यांना पुन्हा हिंदू बनवणाऱ्या गोपाल राय यांना जीवे मारण्याची धमकी; केली सुरक्षेची मागणी
6
"दोन हाणा पण मला नेता म्हणा' अशी त्यांची अवस्था"; भाजपा आमदार शिवाजी पाटलांचा खोचक टोला
7
कॅनडात इस्कॉनच्या रथयात्रेवर फेकली अंडी; परराष्ट्र मंत्रालयाने केली कॅनेडियन सरकारकडे कारवाईची मागणी
8
राज्यात धरणग्रस्तांच्या जमीन वाटपात मोठा भ्रष्टाचार; जयंत पाटलांचा विधानसभेत घणाघाती आरोप
9
IND vs ENG : बुमराहनं ७ महिन्यांनी उघडलं खातं! १ तास ४० मिनिटे केली बॅटिंग
10
नितीन गडकरींनी दुसऱ्या सर्वात लांब केबल ब्रिजचं केलं उद्घाटन, CM सिद्धरामय्या मात्र नाराज
11
"मी प्रदेशाध्यक्ष आहे, भाजपमध्ये जाण्यासाठी मला..."; भाजप प्रवेशावर जयंत पाटलांनी सोडलं मौन
12
7 रुपयांच्या शेअरची कमाल, 480% नं वाढलाय भाव; 19 दिवसांपासून लागतंय अप्पर सर्किट, करतोय मालामाल
13
"तुला पक्षात यावं लागेल"; उद्धव ठाकरेंच्या ऑफरवर प्रवीण दरेकर म्हणाले, "मी बाळासाहेबांचा शिवसैनिक"
14
IND vs ENG : जड्डू -ब्रायडन कार्स यांच्यात टक्कर! मग वातावरण चांगलेच तापलं! नेमकं काय घडलं?
15
अस्तित्वातच नसलेला माणूस बनला जगातील बारावी सर्वात श्रीमंत व्यक्ती, कोण आहे तो? एवढी आहे एकूण संपत्ती
16
विमानांच्या इंजिन फ्यूल स्विचची तात्काळ तपासणी करावी; DGCA चा सर्व कंपन्यांना आदेश
17
याला म्हणतात ढासू शेअर...! 1 लाखाचे केले 3.7 कोटी, 5 वर्षांत दिला 36900% चा बंपर परतावा; करतोय मालामाल
18
IND vs ENG: लॉर्ड्सवर अक्षय कुमारसोबत मॅच बघायला आली 'ही' अभिनेत्री, एकेकाळी गाजवलंय बॉलिवूड
19
जिममध्ये चोरी करणं महागात पडलं, ट्रेनरनं अशी शिक्षा दिली की...; आता चोर कधी मनात चोरीचा विचारही आणणार नाही!
20
हिंदी-मराठी वादामुळे वाढलेला तणाव कमी करण्यासाठी काँग्रेसकडून आम्ही मराठी, आम्ही भारतीय भाषा, कार्यक्रमाचं मिरारोड येथे आयोजन

लोकप्रतिनिधींचा स्तर खालावला !

By admin | Updated: August 3, 2016 05:12 IST

राम नाईक यांनी राजकीय नेते ते राज्यपाल अशा ३७ वर्षांच्या कारकिर्दीत अनेक विक्रम नावावर नोंदविले आहेत.

मीना-कमल,

लखनौ- राम नाईक यांनी राजकीय नेते ते राज्यपाल अशा ३७ वर्षांच्या कारकिर्दीत अनेक विक्रम नावावर नोंदविले आहेत. बॉम्बेचे मुंबई करणे असो, संसदेत गायले जाणारे वंदे मातरम्, खासदार निधी सुरू करणे असो की विदेशी बेबी मिल्कच्या पॅकवर ‘आईचेच दूध मुलांसाठी सर्वश्रेष्ठ असते’ हे वाक्य लिहिणे अनिवार्य करण्यासारख्या उपाययोजना असोत. त्याचे श्रेय या ८२ वर्षीय अनुभवी नेत्यालाच दिले जाते. कधी सरकारने पारित केलेली विधेयके परत पाठविल्याच्या वादामुळे तर कधी आपल्या कामकाजामुळे नाईक हे उत्तर प्रदेशात कायम चर्चेत राहिले आहेत. त्यांच्यावर राजभवनात संघांचा अजेंडा चालवत असल्याचा गंभीर आरोपही झाला, मात्र त्यांनी प्रत्येक वेळी संयम राखत कोणत्याही दबावाखाली न येता आपल्या संवैधानिक जबाबदाऱ्या धडाडीने पार पाडल्या. नाईक यांची मुख्यमंत्री अखिलेश यादव हेही खासगीत प्रशंसा करतात. नाईक यांनी लोकमतला दिलेल्या मुलाखतीत अनुभवाचा पट उलगडला.प्रश्न : उत्तर प्रदेशबाबत तुमचा अनुभव कसा राहिला?उत्तर : आयुष्याच्या ८२ वर्षे उलटली. उत्तर प्रदेशातील दोन वर्षे कशी गेली माहीत नाही. काम करीत राहिलो. १९७८ मध्ये पहिल्यांदा आमदार बनलो. त्यानंतर पाचवेळा खासदार आणि मंत्री राहिलो. पदावर असो किंवा नसो; मात्र गेल्या ३७ वर्षांमध्ये जनहिताचे कार्य करीत राहिलो. जे काम केले त्याचा वर्षभराचा लेखाजोखा जनतेसमोर ठेवत असतो. लोकांनी खूप प्रेम दिले.प्रश्न : उत्तर प्रदेशला पुढे नेण्यासाठी काय करायला हवे?उत्तर : मुंबईत उत्तर भारतीयांची संख्या मोठी आहे. येथील लोक तेथे जाऊन खूप मेहनत करून समोर जात आहेत. कुणी केळी विकतो. कुणी मासे विकतो, तर कुणी बिल्डर आहेत. नोकरीसाठी लोक मोठ्या संख्येने बाहेर पडतात. येथे रोजगार मिळाला तर तसे होणार नाही. येथे राहूनच तेवढे कष्ट घेतले तर निश्चितच राज्य पुढे जाईल.प्रश्न : राजभवन आणि सरकारमध्ये जोरदार संघर्ष निर्माण झाला. विधेयकांना मंजुरी वगैरे?उत्तर : सरकारसोबत माझा कधीही संघर्ष नव्हता मुख्यमंत्री अखिलेश यादव चांगले व्यक्ती आहेत. राज्याला विकासाच्या मार्गावर आणण्याचा विचार त्यांच्याकडे आहे. सरकार आणि माझे संबंध चांगले आहेत. विधेयकांची बाब पाहता संवैधानिक व्यवस्थेचे पूर्णपणे पालन करणे हे राज्यपालांचे उत्तरदायित्व ठरते. याच दायित्वाचे मी पालन केले. प्रश्न: तुम्ही उत्तर प्रदेशातील कायदा व सुव्यवस्थेबाबत?उत्तर : कायदा व सुव्यवस्था ठीक नसण्याची अनेक कारणे आहेत. कायदा व व्यवस्था वाईट आहे असे मी म्हणणार नाही,पण सध्या परिस्थिती सुधारण्याची गरज आहे.प्रश्न: आजपर्यंतच्या कार्यकाळात कोणती बाब खूप वाईट आणि मनाला त्रासदायक वाटली?उत्तर : एमबी क्लब येथील लष्कराच्या कार्यक्रमात धार्मिक वेशामुळे मुस्लिम धर्मगुरूला प्रवेश न दिला जाणे हे खूप वाईट वाटले. ड्रेस कोडचे पालन न केल्याने प्रवेश दिला गेला नाही. त्यावर मी नियम बदलण्याबाबत केंद्र सरकारला पत्र पाठविले आहे. प्रश्न: दयाशंकर सिंग आणि बसपामधील अपशब्दांचा वाद हे ताजे उदाहरण आहे. त्यावर नियंत्रणासाठी कोणता सल्ला द्याल?उत्तर : संसद असो की विधानसभा लोकप्रतिनिधींचा स्तर खालावला आहे. त्याला पिढ्यांचा बदलही म्हणता येईल, मात्र स्तर खालावला हे खरे आहे. >सक्रिय राजकारणात पुन्हा येणार काय?मला पाच वर्षे राज्यपालपदाची जबाबदारी सोपविली आहे. दोन वर्षे संपली आहेत. आणखी तीन वर्षे बाकी आहेत. त्यानंतर विचार करेन. पुढे काय करायचे हे ठरवताना समाजाला काही देण्याचा विचार राहील.संसद असो की विधानसभा लोकप्रतिनिधींचा स्तर खालावला आहे. त्याला पिढ्यांचा बदलही म्हणता येईल, मात्र स्तर खालावला हे खरे आहे. राजकारणाचा स्तरही घसरत आहे. भाषेवर संयम ठेवावा असा माझा सल्ला आहे.