शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
3
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
4
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
5
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
6
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
7
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
8
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
9
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
10
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
11
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
12
नगर परिषदा, पंचायत निवडणुकीत भाजपाला भरघोस यश; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले...
13
T20 World Cup 2026: शुभमन गिलला का वगळलं? गंभीरला एअरपोर्टवर प्रश्न; काय मिळालं उत्तर?
14
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
15
वर्षाखेरीस IPO बाजारात 'धुमधडाका'! या आठवड्यात ११ नवीन कंपन्यांचे आगमन; गुंतवणुकीची मोठी संधी
16
चांदेकरवाडीत पाणंद रस्त्यावर लिंबू आणि बाहुली, अंधश्रद्धेचा प्रकार, ग्रामस्थांत भीतीची सावली
17
"मला मारताहेत, जबरदस्तीने काहीतरी खायला..."; विवाहितेचा ढसाढसा रडत आईला शेवटचा कॉल
18
दोन पराभवांनंतर अखेर संजयकाका पाटलांनी मैदान मारले, आर. आर. आबांचा रोहित पाटील पराभूत
19
Siddhi Vastre: अवघ्या २२ वर्षांची तरुणी भाजपवर पडली भारी; मोहोळमध्ये इतिहास घडवणारी सिद्धी वस्त्रे आहे तरी कोण?
20
"दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश दिल्याचा हा परिणाम"; चंद्रपूरातील पराभवानंतर मुनगंटीवारांचा घरचा आहेर
Daily Top 2Weekly Top 5

लोकप्रतिनिधींचा स्तर खालावला !

By admin | Updated: August 3, 2016 05:12 IST

राम नाईक यांनी राजकीय नेते ते राज्यपाल अशा ३७ वर्षांच्या कारकिर्दीत अनेक विक्रम नावावर नोंदविले आहेत.

मीना-कमल,

लखनौ- राम नाईक यांनी राजकीय नेते ते राज्यपाल अशा ३७ वर्षांच्या कारकिर्दीत अनेक विक्रम नावावर नोंदविले आहेत. बॉम्बेचे मुंबई करणे असो, संसदेत गायले जाणारे वंदे मातरम्, खासदार निधी सुरू करणे असो की विदेशी बेबी मिल्कच्या पॅकवर ‘आईचेच दूध मुलांसाठी सर्वश्रेष्ठ असते’ हे वाक्य लिहिणे अनिवार्य करण्यासारख्या उपाययोजना असोत. त्याचे श्रेय या ८२ वर्षीय अनुभवी नेत्यालाच दिले जाते. कधी सरकारने पारित केलेली विधेयके परत पाठविल्याच्या वादामुळे तर कधी आपल्या कामकाजामुळे नाईक हे उत्तर प्रदेशात कायम चर्चेत राहिले आहेत. त्यांच्यावर राजभवनात संघांचा अजेंडा चालवत असल्याचा गंभीर आरोपही झाला, मात्र त्यांनी प्रत्येक वेळी संयम राखत कोणत्याही दबावाखाली न येता आपल्या संवैधानिक जबाबदाऱ्या धडाडीने पार पाडल्या. नाईक यांची मुख्यमंत्री अखिलेश यादव हेही खासगीत प्रशंसा करतात. नाईक यांनी लोकमतला दिलेल्या मुलाखतीत अनुभवाचा पट उलगडला.प्रश्न : उत्तर प्रदेशबाबत तुमचा अनुभव कसा राहिला?उत्तर : आयुष्याच्या ८२ वर्षे उलटली. उत्तर प्रदेशातील दोन वर्षे कशी गेली माहीत नाही. काम करीत राहिलो. १९७८ मध्ये पहिल्यांदा आमदार बनलो. त्यानंतर पाचवेळा खासदार आणि मंत्री राहिलो. पदावर असो किंवा नसो; मात्र गेल्या ३७ वर्षांमध्ये जनहिताचे कार्य करीत राहिलो. जे काम केले त्याचा वर्षभराचा लेखाजोखा जनतेसमोर ठेवत असतो. लोकांनी खूप प्रेम दिले.प्रश्न : उत्तर प्रदेशला पुढे नेण्यासाठी काय करायला हवे?उत्तर : मुंबईत उत्तर भारतीयांची संख्या मोठी आहे. येथील लोक तेथे जाऊन खूप मेहनत करून समोर जात आहेत. कुणी केळी विकतो. कुणी मासे विकतो, तर कुणी बिल्डर आहेत. नोकरीसाठी लोक मोठ्या संख्येने बाहेर पडतात. येथे रोजगार मिळाला तर तसे होणार नाही. येथे राहूनच तेवढे कष्ट घेतले तर निश्चितच राज्य पुढे जाईल.प्रश्न : राजभवन आणि सरकारमध्ये जोरदार संघर्ष निर्माण झाला. विधेयकांना मंजुरी वगैरे?उत्तर : सरकारसोबत माझा कधीही संघर्ष नव्हता मुख्यमंत्री अखिलेश यादव चांगले व्यक्ती आहेत. राज्याला विकासाच्या मार्गावर आणण्याचा विचार त्यांच्याकडे आहे. सरकार आणि माझे संबंध चांगले आहेत. विधेयकांची बाब पाहता संवैधानिक व्यवस्थेचे पूर्णपणे पालन करणे हे राज्यपालांचे उत्तरदायित्व ठरते. याच दायित्वाचे मी पालन केले. प्रश्न: तुम्ही उत्तर प्रदेशातील कायदा व सुव्यवस्थेबाबत?उत्तर : कायदा व सुव्यवस्था ठीक नसण्याची अनेक कारणे आहेत. कायदा व व्यवस्था वाईट आहे असे मी म्हणणार नाही,पण सध्या परिस्थिती सुधारण्याची गरज आहे.प्रश्न: आजपर्यंतच्या कार्यकाळात कोणती बाब खूप वाईट आणि मनाला त्रासदायक वाटली?उत्तर : एमबी क्लब येथील लष्कराच्या कार्यक्रमात धार्मिक वेशामुळे मुस्लिम धर्मगुरूला प्रवेश न दिला जाणे हे खूप वाईट वाटले. ड्रेस कोडचे पालन न केल्याने प्रवेश दिला गेला नाही. त्यावर मी नियम बदलण्याबाबत केंद्र सरकारला पत्र पाठविले आहे. प्रश्न: दयाशंकर सिंग आणि बसपामधील अपशब्दांचा वाद हे ताजे उदाहरण आहे. त्यावर नियंत्रणासाठी कोणता सल्ला द्याल?उत्तर : संसद असो की विधानसभा लोकप्रतिनिधींचा स्तर खालावला आहे. त्याला पिढ्यांचा बदलही म्हणता येईल, मात्र स्तर खालावला हे खरे आहे. >सक्रिय राजकारणात पुन्हा येणार काय?मला पाच वर्षे राज्यपालपदाची जबाबदारी सोपविली आहे. दोन वर्षे संपली आहेत. आणखी तीन वर्षे बाकी आहेत. त्यानंतर विचार करेन. पुढे काय करायचे हे ठरवताना समाजाला काही देण्याचा विचार राहील.संसद असो की विधानसभा लोकप्रतिनिधींचा स्तर खालावला आहे. त्याला पिढ्यांचा बदलही म्हणता येईल, मात्र स्तर खालावला हे खरे आहे. राजकारणाचा स्तरही घसरत आहे. भाषेवर संयम ठेवावा असा माझा सल्ला आहे.