वजनांच्या हेराफेरीत ग्राहकांची लूट
By admin | Updated: July 19, 2015 21:24 IST
खुलेआम फसवणूक : आठवडी बाजारातील विके्रत्यांवर नियंत्रण कुणाचे?
वजनांच्या हेराफेरीत ग्राहकांची लूट
खुलेआम फसवणूक : आठवडी बाजारातील विके्रत्यांवर नियंत्रण कुणाचे?नागपूर : सर्वाधिक ग्राहकांना फसविले जाणारे ठिकाण म्हणजे आठवडी बाजार. वजनांची हेराफेरी करून खुलेआम येथे ग्राहकांची फसवणूक होते. ग्राहक सर्रास लुटले जात असताना बाजारातील विक्रेत्यांवर कुणाचेही नियंत्रण नाही. ग्राहक पंचायत यासाठी वैधमापन विभागाला जबाबदार धरते, तर वैधमापन विभाग महापालिकेकडे बोट दाखविते. शासकीय संस्थांच्या एकमेकांकडे बोट दाखविण्याच्या भानगडीत ग्राहकांचे उघड्यावर खिसे कापले जातात. आठवडी बाजार सदरचा असो की सोमवारी पेठेतील येथे ग्राहक खुलेआम लुटला जातो आहे. वजनात हेराफेरी, काटा मारणे, प्रमाणित वजनाचा उपयोग न करणे हे प्रकार सर्रास होताना दिसतात. हेराफेरीत किलोभराची भाजी तीन पाव ग्राहकांना मिळत आहे. ग्राहकांनाही याची माहिती आहे. मात्र दाद मागण्यासाठी कुठलीही यंत्रणा नाही, त्यामुळे ग्राहकांची मुस्कटदाबी होत आहे. महापालिकेच्या क्षेत्रात ८ झोनमध्ये २३ अधिकृत बाजार तर २४ अनधिकृत बाजार आहेत. दररोज लाखो ग्राहक बाजारातून भाजी व दैनंदिन लागणाऱ्या वस्तू खरेदी करतात. महापालिका बाजारातील विक्रेत्यांकडून ठराविक रक्कम आकारते. महापालिकेच्या उत्पन्नाचा महत्त्वाचा स्रोत आठवडी बाजार आहे. असे असतानाही महापालिकेकडून ग्राहकांच्या सुरक्षेसंदर्भात कुठलीही उपाययोजना होत नाही. बाजारातील विक्रेत्यांच्या मनमानीला सजग ग्राहकही बळी पडतो. विक्रेत्याला ग्राहकांना विरोध केल्यास तू तू-मै मै करण्याची वेळ येते. खुलेआम लूट होत असली तरी ग्राहकांना कुठलेही संरक्षण नसते. इलेक्ट्रॉनिक काटे उपलब्ध असतानाही हे विक्रेते आजही तराजूचा काटा वापरतात. वजन करताना काट्यात हातचलाखी करतात. त्यामुळे दररोज आठवडी बाजारात ग्राहक लाखो रुपयांनी फसविला जात आहे. :::चौकट:::वैधमापन विभागाची जबाबदारीविक्रेत्यांकडून होत असलेली हातचलाखी रोखण्यासाठी वैधमापन विभागाने बाजारावर धाडी टाकाव्यात. विक्रेत्यांना दंडित करावे. महापालिक ा जेव्हा विक्रेत्याकडून पैसे आकारते तेव्हा ग्राहकांच्या सुरक्षेकडेही लक्ष देण्याची जबाबदारी महापालिकेने घ्यावी. गजानन पांडे, विदर्भ प्रदेश अध्यक्ष, अ.भा. ग्राहक पंचायत