वजनांच्या हेराफेरीत ग्राहकांची लूट - जोड
By admin | Updated: July 19, 2015 21:24 IST
::::चौकट::::
वजनांच्या हेराफेरीत ग्राहकांची लूट - जोड
::::चौकट::::कारवाई केल्यानंतरीही फरक पडत नाहीवैधमापन विभागाने आठवडी बाजारातील विक्रेत्यांवर बरेचदा कारवाई केली आहे. महापालिका विक्रेत्यांकडून व्यवसायासाठी पैसे घेते, मात्र त्यांना ओळखपत्र देत नाही. त्यामुळे विक्रेत्यांवर कारवाई केल्यानंतर विके्रते चुकीचे नाव, पत्ता सांगतात. त्यामुळे कोर्टात विक्रेत्याविरुद्ध केस सबमिट होत नाही. ग्राहकांची लूट थांबविण्यासाठी मनपानेच भाजीबाजारात धरमकाटा लावावा व वजन करण्यासाठी १ रुपया घ्यावा. ज्या ग्राहकांना वजनात संशय आहे, असे ग्राहक तिथे वजन करतील. सोबत ग्राहक चळवळीचे प्रतिनिधी बाजारात असावेत, त्यामुळे ग्राहकाची लूट थांबेल. यासंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयात दर महिन्याला होणाऱ्या ग्राहक संरक्षण मिटिंगमध्ये हा विषय ठेवण्यात आला आहे. यावर कुठलाही निर्णय झाला नाही. सुनील पलिये, निरीक्षक, वैधमापन विभाग