शहरं
Join us  
Trending Stories
1
इसकी टोपी उसके सर और उसकी...; कोकाटे आणि दत्तात्रय भरणे यांच्यातील मंत्रि‍पदाची आदलाबदली!
2
प्रांजल खेवलकरच्या लॅपटॉपमध्ये अनेक महिलांचे पार्टी अन् त्यानंतरचे आक्षेपार्ह व्हिडिओ!
3
IND vs ENG 5th Test Day 1 Stumps: नायर-वॉशिंग्टन जोडी जमली अन् टीम इंडियावरील मोठं संकट टळलं!
4
विधानसभेच्या निकालांमध्ये तफावत नाही; ईव्हीएम तपासणीनंतर निवडणूक आयोगाचे स्पष्टीकरण
5
माल चाहिए क्या? xxx वाला? विचारल्यानंतर खेवलकर म्हणाले होते, 'ठेवून घ्या'! चॅटिंग आलं समोर
6
Karun Nair Fifty : 'त्रिशतकवीर' करुण नायरच्या भात्यातून ३१४६ दिवसांनी आली 'फिफ्टी'!
7
Nashik Crime: भयंकर! पत्नीला गुंगीचे औषध पाजून नग्नावस्थेत बनवले व्हिडिओ, दोन वर्ष डान्स बारमध्ये नाचायला लावले
8
उत्तर प्रदेशमधील मंत्र्यांनी आपल्याच सेक्रेटरीला पाठवलं तुरुंगात, कारण वाचून तुम्ही म्हणाल...
9
सरकारी नोकरी शोधणाऱ्यांसाठी उत्तम संधी, लवकरच ओआयसीएलमध्ये मोठी भरती!
10
IND vs ENG: टीम इंडियासोबत पाचव्या कसोटीत 'चिटींग'? पंच कुमार धर्मसेना यांच्यावर नेटकऱ्यांचा आरोप
11
"भगवा नाही, सनातनी किंवा हिंदुत्ववादी दहशतवाद म्हणा"; अमित शाहांचा उल्लेख करत पृथ्वीराज चव्हाणांचे गंभीर विधान
12
सात वर्षांत ४२ वेळा तिने दिला नकार, अखेर ४३व्यावेळी त्यानं केलं असं काही, नकारच देऊ शकली नाही ती
13
Shubman Gill Run Out : साईला कॉल देत गिलनं उगाच केली घाई! इंग्लंडला फुकटात मिळाली विकेट (VIDEO)
14
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी भाजपची रणनीती! माजी खासदार-आमदारांवर सोपवली मोठी जबाबदारी
15
IND vs ENG : 'ती' साथ देणार अशा परिस्थितीत त्यानं विश्रांती घेतली; सोशल मीडियावर बुमराह झाला ट्रोल
16
आमदाराच्या कारची दुचाकीला धडक, रेल्वे पुलावरून खाली कोसळून तरुणाचा मृत्यू, मृत तरुण भाजपा नेत्याचा भाऊ  
17
बांगलादेशी मॉडेलला भारतात अटक! पोलिसांनी राहत्या घरावर टाकली धाड अन् आत जे सापडलं...
18
Anilkumar Pawar ED Raid: अनिलकुमार पवार यांना त्यांच्या आईने गिफ्ट केलेला नाशिकमधील प्लॉट जप्त
19
कृषीखातं पुन्हा धनंजय मुंडेंकडे? सह्याद्री अतिथीगृहावर भेटीगाठींना वेग!
20
निवडणूक जिंकणं कठीण की पत्नीचं मन? राघव चड्डांनी दिलं असं उत्तर, परिणीतीही झाली अवाक्

चीनची नजर सिक्कीमवर की गोरखालॅंडवर ?

By admin | Updated: July 7, 2017 17:22 IST

सिक्कीम जवळच्या पश्चिम बंगाल राज्यात गोरखांनी गोरखालॅंडसाठी चालवलेल्या आंदोलनाचाही फायदा घेण्याचा चीनचा प्रयत्न नाकारता येत नाही.

 ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. 6- डोकलाम भागात चीनने केलेल्या घुसखोरी आणि रस्त्याच्या बांधणीनंतर चीन आणि भारत यांच्यामध्ये तमावाचे वातावरण निर्माण झाले आहे. तसेच भूटानही चीनच्या या आक्रमक वृत्तीला विरोध करत आहे. चीनने तर भारताचा दावा खोडून काढत भारतानेच येथे हस्तक्षेप केल्याचा दावा केला आहे. त्याचप्रमाणे भारतीय सैन्य पुन्हा भारताच्या सीमेत गेल्याशिवाय कैलास मानस सरोवर यात्रेसाठी भक्तांना परवानगी देणार नाही अशी भूमिका घेतली आहे. तसेच जी-20 परिषदेमध्ये चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबरोबर बैठक घेणार नाहीत असेही परस्पर जाहीर करुन टाकले. आता चीनच्या वृत्तपत्राने आम्ही सिक्कीमच्या स्वातंत्र्याला पाठिंबा देऊ असे सूचक भाष्य करुन, 2003 साली सिक्कीमच्या भारतातील विलिनीकरणाला चीनने दिलेल्या संमतीवर पुन्हा विचार करावा लागेल असेही मत प्रसिद्ध केले आहे. परंतु सिक्कीममध्ये सध्या कोणतीही अशांततेचे वातावरण नाही. सिक्कीम जवळच्या पश्चिम बंगाल राज्यात गोरखांनी गोरखालॅंडसाठी चालवलेल्या आंदोलनाचाही फायदा घेण्याचा चीनचा प्रयत्न नाकारता येत नाही. 
 
 
गेला साधारण एक महिना गोरखालॅंडच्या मागणीमुळे दार्जिलिंग अशांत आहे. चिकन्स नेक म्हणून ओळखला जाणारा सिलिगुडी कॉरिडॉर येथे आहे. एका बाजूला सिक्किम राज्याची सीमा, दुसरीकडे भूटान, नेपाळ आणि एका बाजूस बांगलादेश असल्यामुळे या चिंचोळ्या पट्टीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. संपुर्ण इशान्य भारताला जोडणाऱ्या या पट्टीवर आणि दार्जिलिंगमध्येच अशांतता निर्माण झाल्यामुळे गोरखालॅंडमुळे येथील प्रदेशाची सुरक्षा अधिकच नाजूक झालेली आहे. चीनने कदाचित याच वेळेचा फायदा घेण्यासाठी सिक्कीमच्या आड नवी खेळी करण्याचा प्रयत्न केला असावा.
 
सिक्कीमचे मुख्यमंत्री पवनकुमार चॅमलिंग यांनी या एक वादग्रस्त विधान करुन या वादामध्ये उडी घेतली आहे. सिक्कीम भारतात कधीच विलिन झाला नसून आमचे चीन आणि भारत यांच्यामध्ये सॅंडविच झालेले आहे. सिक्कीमला सर्व वस्तुंचा पुरवठा राष्ट्रीय महामार्ग 10 वरुनच होतो. त्यामुळे या महामार्गाला सिक्कीमची जीवनवाहिनी असे म्हटले जाते. गेल्या तीस वर्षात गोरखा आंदोलनामुळे आमच्या राज्याला नेहमीच झळ बसली, या कालावधीत आमचे 60 हजार कोटींचे नुकसान झाले आहे असेही ते म्हणाले. गोरखालॅंडच्या आंदोलनामुळे जशी दार्जिलिंगमधील हॉटेल्स व पर्यटन व्यवसाय ठप्प झाला आहे त्याप्रमाणे सिक्कीमचा पर्यटन व्यवसाय ठप्प झाला आहे. त्यामुळेच चॅमलिंग यांनी हे मत व्यक्त केले आहे. परंतु चीन आणि भारत यांच्यामध्ये तयार झालेल्या तणावाच्या प्रसंगीच त्यांनी हे वक्तव्य केले आहे. त्यामुळे चीनलाही सिक्कीमच्या नावाखाली भारताच्या अंतर्गत प्रश्नांमध्ये नाक खुपसण्याची संधी मिळाली.
 
सिक्कीमच्या इतिहासातील महत्त्वाचे टप्पे
1890- चीन आणि ब्रिटिशांच्या युद्धानंतर झालेल्या करारानुसार सिक्कीम हा ब्रिटिशांचा प्रोटेक्टोरेट एरिआ या दर्जाखाली भाग बनला. त्यानंतर काही वर्षांनी सिक्कीम हा इंग्रजांच्या वसाहतीत एक संस्थान म्हणून ओळखले गेले.
1947- भारताला स्वातंत्र्य मिळाल्याबरोबर सिक्कीमवरचा दावाही इंग्रजांनी सोडला. सिक्कीममध्ये घेतलेल्या सार्वमतानुसार तेथिल जनतेने भारतात सामिल न होता वेगळे राहण्याच्या बाजूने कौल दिला. त्यामुळे 1950 पर्यंत सिक्कीम स्वतंत्र राष्ट्र म्हणून ओळखले गेले. 
1950- भारताचे पहिले पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरु यांनी सिक्कीमबरोबर करार करुन सिक्कीम भारताचा प्रोटेक्टोरेट एरिआ झाले. यानुसार अंतर्गत व्यवहारांवर सिक्कीमचे नियंत्रण आणि परराष्ट्र व्यवहार, संरक्षण याचे अधिकार भारताकडे आले.
1975- सिक्कीमचे पंतप्रधान चोग्याल यांनी भारताच्या संसदेला सिक्कीमला भारतात विलीन करुन घ्या अशी विनंती केली. त्यानुसार सिक्कीम भारताचे 22 वे राज्य बनले.
2003- 1975 साली सिक्कीम भारताचे राज्य म्हणून समाविष्ट झाले तरी चीनने या घटनेला पाठिंबा दिला नाही. 2003 साली चीनने सिक्कीम हे भारताचे राज्य आहे अशी अधिकृत मान्यता दिली.
 
भांडण फक्त आपल्याशीच नाही...
चीनचे सिमेवरुन केवळ भारताबरोबरच तणावाचे संबंध आहेत असे नाही तर चीनचे अनेक देशांशी वाद सुरु आहेत. ताजिकिस्तान, नेपाळ, किरगिझिस्तान, भूटान, म्यानमार, दक्षिण कोरिया कंबोडिया, लाओस यांच्याशी अनेकदा वाद झालेले आहेत.
 
आणखी वाचा-
चीनच्या धमक्या आणखी वाढल्या
भूतान फार आनंदी देश नाही, चिनी मीडियाचा कांगावा
भूतानच्या सीमेचे आम्ही उल्लंघन केले नाही, चीनचा दावा