शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
3
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
4
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
5
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
6
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
7
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
8
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
9
नगर परिषदा, पंचायत निवडणुकीत भाजपाला भरघोस यश; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले...
10
T20 World Cup 2026: शुभमन गिलला का वगळलं? गंभीरला एअरपोर्टवर प्रश्न; काय मिळालं उत्तर?
11
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
12
वर्षाखेरीस IPO बाजारात 'धुमधडाका'! या आठवड्यात ११ नवीन कंपन्यांचे आगमन; गुंतवणुकीची मोठी संधी
13
चांदेकरवाडीत पाणंद रस्त्यावर लिंबू आणि बाहुली, अंधश्रद्धेचा प्रकार, ग्रामस्थांत भीतीची सावली
14
"मला मारताहेत, जबरदस्तीने काहीतरी खायला..."; विवाहितेचा ढसाढसा रडत आईला शेवटचा कॉल
15
दोन पराभवांनंतर अखेर संजयकाका पाटलांनी मैदान मारले, आर. आर. आबांचा रोहित पाटील पराभूत
16
Siddhi Vastre: अवघ्या २२ वर्षांची तरुणी भाजपवर पडली भारी; मोहोळमध्ये इतिहास घडवणारी सिद्धी वस्त्रे आहे तरी कोण?
17
"दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश दिल्याचा हा परिणाम"; चंद्रपूरातील पराभवानंतर मुनगंटीवारांचा घरचा आहेर
18
Maharashtra Local Body Election Results 2025 : अख्खं मंत्रिमंडळ ईश्वरपुरात, तरीही जयंत पाटलांनी महायुतीला दिला धक्का; सांगली जिल्ह्यातील नगराध्यक्षांची यादी एका क्लिकवर
19
विमा घेताय? केवळ जाहिरातींवर जाऊ नका; 'या' ४ तांत्रिक गोष्टी तपासा, अन्यथा क्लेमवेळी होईल पश्चात्ताप!
20
उद्धवसेना-मनसे युतीची बोलणी संपली, संजय राऊतांनी दिली महत्त्वाची माहिती; "अजूनही ७२ तास..."
Daily Top 2Weekly Top 5

आकर्षक, चटपटीत घोषणांनी गाजवल्या लोकसभेच्या निवडणुका

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2019 05:41 IST

‘घोषवाक्य’ हे एक असे हत्यार आहे, जे अगदी अल्पकाळात सर्वसामान्यांवर प्रभाव पाडू शकते. याचा प्रत्यय स्वातंत्र्यपूर्व काळापासून आपण घेत आलो आहोत.

नवी दिल्ली : ‘घोषवाक्य’ हे एक असे हत्यार आहे, जे अगदी अल्पकाळात सर्वसामान्यांवर प्रभाव पाडू शकते. याचा प्रत्यय स्वातंत्र्यपूर्व काळापासून आपण घेत आलो आहोत. त्यामुळे या आयुधाचा वापर राजकारण्यांनी केला नसेल, तर नवलच! स्वातंत्र्यप्राप्तीनंतरच्या पहिल्या निवडणुकीपासून ते आत्तापर्यंत प्रत्येक निवडणुकीत घोषवाक्यांनी आपला दबदबा निर्माण केला. काही पक्षांनी तर घोषवाक्यांच्या जोरावर निवडणुकाही जिंकल्या आहेत. ‘नया भारत’, ‘गरिबी हटाव’, ‘अबकी बार...’ अशा काही घोषवाक्यांचा बोलबाला आजही कायम आहे. सध्या लोकसभा निवडणुकीचे बिगूल वाजले असून, आघाडीचे सर्वच पक्ष मतदारांना भुरळ पाडतील, अशी घोषवाक्ये तयार करण्यात गुंतले आहेत.१९५० च्या दशकात भारतात साक्षरतेचे प्रमाण केवळ १८ टक्के इतके होते. त्यामुळे छापील शब्दांपेक्षा उच्चारित शब्दांच्या साहाय्याने सामान्य मतदारांपर्यंत अधिक प्रभावीपणे पोहोचता येऊ शकते, हे तत्कालीन पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरू यांनी ओळखले होते. १९५१-५२ च्या निवडणुकीत त्यांनी ‘नया भारत बनाऐंगे’ अशी घोषणा देत मतदारांना भावनिक आवाहन केले होते.शिवाय जनसंघावर टीका करताना ‘स्थायी, असांप्रदायिक प्रगतीशील राष्ट्र के लिए’ असे म्हटले होते. या घोषणा त्या वेळी अगदी जनतेच्या ओठांवर रुळल्याचे विश्लेषक सांगतात.१९७१ साली इंदिरा गांधी यांनी ‘गरिबी हटाव’चा नारा देत बहुमत खेचले होते. ‘वो कहते हैं इंदिरा हटाव, मै कहती हूँ गरिबी हटाव’ अशा घोषवाक्याचा त्यांनी वापर केला होता. आणीबाणीनंतर झालेल्या निवडणुकीत जनसंघाने ‘इंदिरा हटाव, देश बचाव’ अशी घोषणा दिली होती. मात्र, हे सरकार अल्पावधीतच कोसळले. त्या वेळी इंदिरा गांधींनी जनसंघावर प्रखर हल्ला चढवत ‘सरकार वो चुने, जो चल सकें’ अशी खोचक टिपणी केली होती.१९९० च्या निवडणुकीत राजीव गांधी यांनी ‘ना जात पर, ना पात पर, स्थिरता की बात पर, मोहर लगेगी हात पर’ अशी घोषणा दिली होती. तर भाजपाने या निवडणुकांना सामोरे जाताना ‘सबको परखा, हमको परखो’ हे घोषवाक्य निवडले होते.२०१४ च्या निवडणुकीत तर भाजपाने घोषवाक्यांचा मतदारांवर माराच केला होता. ‘अबकी बार मोदी सरकार’, ‘अच्छे दिन आयेंगे’, ‘सबका साथ, सबका विकास’ अशा बहुसंख्य घोषणा त्यांनी दिल्या होत्या. सध्या देशात निवडणुकीचा माहौल आहे. त्यामुळे सर्व पक्ष मतदारांना भावतील अशा घोषवाक्यांच्या शोधात आहेत. भाजपाने तर ‘मोदी है, तो मुमकीन है’, ‘फिर एक बार मोदी सरकार’ अशा घोषणा निवडणूक जाहीर होण्याआधीपासूनच देण्यास सुरुवात केली होती. काँग्रेसकडेही देशभरातील कार्यकर्त्यांनी सुमारे १५ लाख घोषवाक्ये पाठविली आहेत. मात्र, राजकारण्यांच्या या क्लृप्त्या हल्लीच्या तरुण, सुशिक्षित मतदारांना कितपत प्रभावी करू शकतील, याचे उत्तर मतदानानंतरच मिळेल.काही लोकप्रिय घोषवाक्ये१) नया भारत बनाऐंगे - पं. जवाहरलाल नेहरू, १९५१२) वाह रे नेहरू तेरी मौज, घर मे हमला बाहर फौज - जनसंघ - १९६२३) वो कहते है इंदिरा हटाव, मै कहती हूँ गरिबी हटाव - इंदिरा गांधी, १९७१४) इंदिरा हटाव, देश बचाव - जनसंघ (आणीबाणीच्या काळात)५) सबको परखा, हमको परखो - भाजपा, १९९१६) अबकी बारी, अटल बिहारी - भाजपा, १९९८७) वो कहते है मोदी हटाव, मै कहता हुँ भ्रष्टाचार, काला धन, आतंकवाद हटाव - नरेंद्र मोदी, २०१९

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकcongressकाँग्रेसBJPभाजपा