शहरं
Join us  
Trending Stories
1
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
2
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
3
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
4
काश्मीरच्या बडगाममध्ये CRPF च्या वाहनाचा अपघात; अनेक जवान जखमी
5
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन
6
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
7
रेल्वे कर्मचाऱ्यांनी निवृत्त सहकाऱ्याला दिला 'असा' निरोप; ये- जा करणारे बघतंच राहिले!
8
INDW vs RSAW : प्रतिकाच्या विक्रमी खेळीनंतर स्नेह राणाचा 'पंजा'; टीम इंडियाचा सलग दुसरा विजय
9
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
10
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
11
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
12
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
13
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
14
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
15
१ लाखांपेक्षा अधिक गुंतवणूकदार कंगाल झाले; ९२% आपटला हा शेअर, आता विकणंही झालं कठीण
16
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
17
बाजार सपाट पातळीवर बंद; रिलायन्सचा शेअर पुन्हा आला धावून, 'या' सेक्टरवर दबाव
18
ATM मधून वारंवार पैसे काढायची सवय असेल तर ती बदला, नाहीतर १ मे पासून होईल नुकसान
19
अण्वस्त्रांची धमकी देणाऱ्या पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांचे तोंड भारताने केले बंद; एक्स अकाउंटवर घातली बंदी
20
Viral Video: बिबट्या थेट पोलीस ठाण्यातच आला! पोलिसाने पाहिलं, पण नंतर काय घडलं?

आकर्षक, चटपटीत घोषणांनी गाजवल्या लोकसभेच्या निवडणुका

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2019 05:41 IST

‘घोषवाक्य’ हे एक असे हत्यार आहे, जे अगदी अल्पकाळात सर्वसामान्यांवर प्रभाव पाडू शकते. याचा प्रत्यय स्वातंत्र्यपूर्व काळापासून आपण घेत आलो आहोत.

नवी दिल्ली : ‘घोषवाक्य’ हे एक असे हत्यार आहे, जे अगदी अल्पकाळात सर्वसामान्यांवर प्रभाव पाडू शकते. याचा प्रत्यय स्वातंत्र्यपूर्व काळापासून आपण घेत आलो आहोत. त्यामुळे या आयुधाचा वापर राजकारण्यांनी केला नसेल, तर नवलच! स्वातंत्र्यप्राप्तीनंतरच्या पहिल्या निवडणुकीपासून ते आत्तापर्यंत प्रत्येक निवडणुकीत घोषवाक्यांनी आपला दबदबा निर्माण केला. काही पक्षांनी तर घोषवाक्यांच्या जोरावर निवडणुकाही जिंकल्या आहेत. ‘नया भारत’, ‘गरिबी हटाव’, ‘अबकी बार...’ अशा काही घोषवाक्यांचा बोलबाला आजही कायम आहे. सध्या लोकसभा निवडणुकीचे बिगूल वाजले असून, आघाडीचे सर्वच पक्ष मतदारांना भुरळ पाडतील, अशी घोषवाक्ये तयार करण्यात गुंतले आहेत.१९५० च्या दशकात भारतात साक्षरतेचे प्रमाण केवळ १८ टक्के इतके होते. त्यामुळे छापील शब्दांपेक्षा उच्चारित शब्दांच्या साहाय्याने सामान्य मतदारांपर्यंत अधिक प्रभावीपणे पोहोचता येऊ शकते, हे तत्कालीन पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरू यांनी ओळखले होते. १९५१-५२ च्या निवडणुकीत त्यांनी ‘नया भारत बनाऐंगे’ अशी घोषणा देत मतदारांना भावनिक आवाहन केले होते.शिवाय जनसंघावर टीका करताना ‘स्थायी, असांप्रदायिक प्रगतीशील राष्ट्र के लिए’ असे म्हटले होते. या घोषणा त्या वेळी अगदी जनतेच्या ओठांवर रुळल्याचे विश्लेषक सांगतात.१९७१ साली इंदिरा गांधी यांनी ‘गरिबी हटाव’चा नारा देत बहुमत खेचले होते. ‘वो कहते हैं इंदिरा हटाव, मै कहती हूँ गरिबी हटाव’ अशा घोषवाक्याचा त्यांनी वापर केला होता. आणीबाणीनंतर झालेल्या निवडणुकीत जनसंघाने ‘इंदिरा हटाव, देश बचाव’ अशी घोषणा दिली होती. मात्र, हे सरकार अल्पावधीतच कोसळले. त्या वेळी इंदिरा गांधींनी जनसंघावर प्रखर हल्ला चढवत ‘सरकार वो चुने, जो चल सकें’ अशी खोचक टिपणी केली होती.१९९० च्या निवडणुकीत राजीव गांधी यांनी ‘ना जात पर, ना पात पर, स्थिरता की बात पर, मोहर लगेगी हात पर’ अशी घोषणा दिली होती. तर भाजपाने या निवडणुकांना सामोरे जाताना ‘सबको परखा, हमको परखो’ हे घोषवाक्य निवडले होते.२०१४ च्या निवडणुकीत तर भाजपाने घोषवाक्यांचा मतदारांवर माराच केला होता. ‘अबकी बार मोदी सरकार’, ‘अच्छे दिन आयेंगे’, ‘सबका साथ, सबका विकास’ अशा बहुसंख्य घोषणा त्यांनी दिल्या होत्या. सध्या देशात निवडणुकीचा माहौल आहे. त्यामुळे सर्व पक्ष मतदारांना भावतील अशा घोषवाक्यांच्या शोधात आहेत. भाजपाने तर ‘मोदी है, तो मुमकीन है’, ‘फिर एक बार मोदी सरकार’ अशा घोषणा निवडणूक जाहीर होण्याआधीपासूनच देण्यास सुरुवात केली होती. काँग्रेसकडेही देशभरातील कार्यकर्त्यांनी सुमारे १५ लाख घोषवाक्ये पाठविली आहेत. मात्र, राजकारण्यांच्या या क्लृप्त्या हल्लीच्या तरुण, सुशिक्षित मतदारांना कितपत प्रभावी करू शकतील, याचे उत्तर मतदानानंतरच मिळेल.काही लोकप्रिय घोषवाक्ये१) नया भारत बनाऐंगे - पं. जवाहरलाल नेहरू, १९५१२) वाह रे नेहरू तेरी मौज, घर मे हमला बाहर फौज - जनसंघ - १९६२३) वो कहते है इंदिरा हटाव, मै कहती हूँ गरिबी हटाव - इंदिरा गांधी, १९७१४) इंदिरा हटाव, देश बचाव - जनसंघ (आणीबाणीच्या काळात)५) सबको परखा, हमको परखो - भाजपा, १९९१६) अबकी बारी, अटल बिहारी - भाजपा, १९९८७) वो कहते है मोदी हटाव, मै कहता हुँ भ्रष्टाचार, काला धन, आतंकवाद हटाव - नरेंद्र मोदी, २०१९

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकcongressकाँग्रेसBJPभाजपा