शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी अपडेट! सात मृतदेहांची ओळख पटली; विजय रुपाणींच्या मृतदेहाची ओळख पटलेली नाही, मृतांचा आकडा...
2
Ahmedabad Plane Crash: विमानाच्या कॅप्टनकडे थोडाथोडका नाही, ८२०० तास उड्डाणाचा अनुभव होता; पण दुर्दैव हे की...
3
"मी झोपले होते, अचानक जोरदार स्फोट झाला, डोळे उघडले तेव्हा..."; अकोल्याची ऐश्वर्या कशी बचावली?
4
इराणवरील हल्ल्यानंतर इस्रायलचा मोठा निर्णय! जगभरातील दूतावास बंद केले; आता बदल्याची भीती
5
'जे धाडसी होत होते ते मारले गेले'; ट्रम्प यांनी इराणला धमकी दिली; म्हणाले, "करार करा नाहीतर..."
6
Israel Iran Conflict: इस्रायलच्या हवाई हल्ल्यात मारले गेलेले इराणचे 'ते' सहा अणुशास्त्रज्ञ कोण?
7
इराणच्या अण्वस्त्र ठिकानांवर इस्रायलचा पुन्हा हल्ला, केली तुफान बॉम्बिंग; ट्रम्प यांच्या धमकीनंतर, अ‍ॅक्शन मोडवर नेतन्याहू!
8
विमान अपघातावर डीजीसीएचा मोठा निर्णय! सर्व बोईंग ड्रीमलाइनरची प्रत्येक उड्डाणापूर्वी तपासणी होणार
9
WTC Final : मिचेल स्टार्कनं अर्धशतकासह रचला इतिहास; हेजलवूडच्या साथीनं ५० वर्षांचा विक्रमही मोडला
10
"आदमी खिलौना है" शेवटचं स्टेटस; अहमदाबाद विमान दुर्घटनेत हरियाणातील अंजू शर्मा यांचा दुर्दैवी अंत!
11
जन्मदाताच बनला हैवान! पत्नीशी झालेल्या भांडणाच्या रागात लेकरांवर केला वार, मुलीचा जागीच मृत्यू 
12
ज्याची होती चर्चा, तेच कारण समोर आलं...! राजाला का मारलं? सोनमनं सगळंच सांगून टाकलं; खरा मास्टरमाइंड आला समोर
13
मृतांचे क्लेम सेटलमेंट लवकर पूर्ण करणार; अहमदाबाद विमान अपघाताबाबत LIC चा मोठा निर्णय
14
१० जूनला लग्न झालं अन् २ दिवसांत नवऱ्याचा मृत्यू; विमान अपघातात 'ती' ने सर्वस्व गमावले
15
वर्ल्ड बँकेकडून पाकिस्तानला ७०० मिलियन डॉलरची 'खैरात', भारताच्या विरोधानंतरही मिळाले कर्ज
16
इस्त्रायलचे पुढचे टार्गेट पाकिस्तान! इराण तणावादरम्यान शेजारील देश भीतीच्या छायेत
17
कामाची बातमी! जितके किमी प्रवास, आता तितकाच भरा Toll; कसं काम करणार नवीन टोल पॉलिसी?
18
"तुम्ही एक कोटी देताय; मी एअर इंडियाला दोन कोटी देते, माझे वडील परत द्या"; बाप गमावला, मुलीच्या अश्रूंचा फुटला बांध
19
झापुक-झुपुक...! देशी कंपनीने एकाचवेळी दोन स्वस्त ५जी फोन लाँच केले, स्मार्टफोन मार्केटमध्ये अजून काय हवे...
20
"जे स्वतःला सिंहाप्रमाणे...!" इराणवर हल्ला करण्यापूर्वी नेतन्याहू यांनी 'या' पवित्र भिंतीवर सोडली खास 'नोट', काय आहे याचा अर्थ?

Lokmat Parliamentary Awards:"नागरिकत्व सुधारणा विधेयकाच्या माध्यमातून भाजपा जिन्नांना पुन्हा जिवंत करतेय"

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2019 17:19 IST

Lokmat Parliamentary Awards 2019 : नागरिकत्व सुधारणा विधेयक संविधानाच्या विरोधात असल्याचं मत एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांनी व्यक्त केलं आहे.

नवी दिल्लीः नागरिकत्व सुधारणा विधेयक संविधानाच्या विरोधात असल्याचं मत एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांनी व्यक्त केलं आहे. ते लोकमतच्या संसदीय पुरस्कार सोहळ्यात बोलत होते.  राष्ट्राच्या आधारावर आपण नागरिकत्वाचा कायदा बनवत आहोत. मौलाना अब्दुल कलाम आझाद म्हणाले होते की, मी एक हिंदुस्थानी मुसलमान आहे, माझं या राष्ट्राशी 1 हजार वर्षांचं जुनं नातं आहे, याची आठवणही ओवैसी यांनी करून दिली आहे. मुसलमान असल्यानं आमचा त्या विधेयकात समावेश नसल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.  

श्रीलंकेच्या तमीळ, नेपाळमधल्या मधेशी यांचा या विधेयकात समावेश नाही. चीनकडे भारताचा एक तृतीयांश भाग आहे. त्यामुळे या विधेयकात चीनचाही समावेश करा. बांगलादेशालाही तुम्हीच बनवलं. टायगर सिद्दिकी या माणसानं मुक्ती वाहिनी तयार केली. पुढे त्याच मुक्ती वाहिनीनं बांगलादेशाच्या निर्मितीस मदत केली. भारताच्या मुस्लिमांचा पाकिस्तान आणि अफगाणिस्तानच्या मुस्लिमांशी काहीही संबंध नाही. तुम्ही जिनांचे विचार पुन्हा जिवंत करत आहात, असा आरोपही ओवैसींनी केला आहे.  बंगाली हिंदू आता सांगतील आम्ही भारतीय आहोत. एनआरसी करून सीएबी घेऊन याल, पण सीएबी हे आंबेडकर आणि गांधींच्या विरोधात आहे. प्रादेशिक पक्ष हे लोकशाहीसाठी चांगले आहेत. भाजपाला कोणत्याही विषयाचं देणं-घेणं नाही. महाराष्ट्रातही आमचे दोन आमदार आणि एक खासदार निवडून आलेले आहेत. आमचा राष्ट्रीय पक्ष नाही. इम्तियाज जलील शिवसेनेला हरवून खासदार झाले. इम्तियाज जलील यांच्या प्रयत्नांमुळे दिल्ली-औरंगाबाद तीन विमानांची सेवा सुरू झाली. निवडणुकीदरम्यान पावसानं अनेक पिकांची नासधूस झाली, असे मुद्दे इम्तियाज जलील यांनी उचलून धरले. प्रादेशिक मुद्द्यांवर राष्ट्रीय पक्ष जास्त लक्ष देत नसल्याचंही ओवैसींनी अधोरेखित केलं आहे.लोकसभा व राज्यसभेतील प्रत्येकी चार सर्वोत्कृष्ट खासदारांना लोकमत संसदीय पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीने या विजेत्यांची निवड केली. जीवनगौरव पुरस्कार, सर्वोत्कृष्ट खासदार, सर्वोत्कृष्ट महिला खासदार, संसदेत पहिल्यांदा निवडून आलेली सर्वोत्कृष्ट महिला खासदार अशा चार श्रेणीत हे पुरस्कार दिले जातात. सोहळ्याआधी आंबेडकर इंटरनॅशनल सेंटरच्या भीम सभागृहात ‘राजकारणात प्रादेशिक पक्षांची भूमिका’ या विषयावरील परिसंवादात काँग्रेसचे खासदार शशी थरूर, असदुद्दीन ओवैसी, केंद्रीय मंत्री पीयूष गोयल सहभागी झाले असून, त्यांनी मतप्रदर्शन केलं आहे. 2017पासून या पुरस्कारांची सुरुवात झाली असून, 2018मध्ये लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी, एन. के. प्रेमचंद्रन, निशिकांत दुबे, सुष्मिता देव, रमादेवी, मीनाक्षी लेखी, हेमामालिनी यांना पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले होते. पहिल्या वर्षी शरद पवार, सीताराम येचुरी, गुलाम नबी आझाद, जया बच्चन, कनिमोळी, रजनी पाटील, छाया वर्मा या मान्यवरांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला होता. राज्यात ग्रामपंचायत, विधिमंडळात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या लोकप्रतिनिधींनाही आता पुरस्काराने गौरविले जाते.

टॅग्स :lokmat parliamentary awardsलोकमत पार्लिमेंट्री अवॉर्डAsaduddin Owaisiअसदुद्दीन ओवेसीcitizen amendment billनागरिकत्व सुधारणा विधेयक