शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

मला हिरो व्हायचं नाही, मी तर व्हीलन; असदुद्दीन ओवैसींची Exclusive मुलाखत

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2019 19:18 IST

पूर्वी काँग्रेस आणि आता भाजपही मुस्लिमांकडे कायम राजकीय दृष्टिकोनातून बघत आले आहे.

ठळक मुद्देमाझा लढा फक्त मुस्लीमांसाठी नाही. मी लढतोय देशातील २३ टक्के अल्पसंख्यांकांसाठी - ओवैसीमहाराष्ट्रात सर्व पक्षांनी मुस्लीमांची मते घेतली आणि प्रत्यक्षात 'महाआघाडी'चे सरकार स्थापन झाले.लोकांना नरेंद्र मोदी आणि राहुल गांधी यांच्यातून देशाचा हिरो ठरवायचा आहे. मी तर व्हीलन आहेच.

'मला मुस्लिमांचा नेता व्हायचे नाही आणि माझा लढाही फक्त मुस्लीमांसाठी नाही. मी लढतोय देशातील २३ टक्के अल्पसंख्यांकांसाठी. आपल्या अधिकारांपासून वंचित असलेल्या गरिबांसाठी आणि पदोपदी अन्याय सहन करणाऱ्या दुर्बलांसाठी माझा संघर्ष आहे,' अशी भूमिका एआयएमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांनी 'लोकमत नॅशनल कॉन्क्लेव्ह' मध्ये सीएनएन न्यूज 18 चे व्यवस्थापकीय संपादक किशोर अजवानी यांना दिलेल्या मुलाखतीत मांडली.

जनपथ येथील डॉ. आंबेडकर इंटरनॅशनल सेंटरच्या भीम हॉलमध्ये आयोजित या कार्यक्रमात पत्रकार किशोर अजवानी यांनी त्यांच्याशी संवाद साधला. हिंदू किंवा भाजपच्या मतदारांनी आपल्याला मते का द्यावी, या प्रश्नावर ओवैसी म्हणाले, 'भाजपचे मतदार ठरलेले आहेत. राहिला प्रश्न मतांचा तर आम्हाला सर्व धर्मांतील लोकांनी मते दिली आहेत. औरंगाबाद महानगरपालिकेत आमच्या पक्षाचे २७ नगरसेवक आहेत. त्यातील ६ मुस्लीमेतर आहेत. आमच्या पक्षातील लोकप्रतिनिधींकडे गर्दी करणाऱ्यांमध्ये प्रत्येक समाजातील, धर्मातील आणि सर्व घटकांतील लोक आहेत. माझ्या हैदराबादमधील कार्यालयात कधीतरी येऊन बघा. मी फक्त मुस्लिमांसाठी लढतोय, असे कुणालाही वाटणार नाही.' 'माझ्या निवडणूक लढविण्याचे खरे तर सर्वांनी स्वागत करायला हवे. पण, माझ्यावर आरोप होतो भाजपची 'बी टीम' म्हणून काम करण्याचा. ३० वर्षांपासूनच्या सेनेच्या खासदाराला आमच्या माणसाने पराभूत केले आहे. कुठून आली बी टीम?,' असा उलट सवाल त्यांनी केला. महाराष्ट्रात सर्व पक्षांनी मुस्लीमांची मते घेतली आणि प्रत्यक्षात 'महाआघाडी'चे सरकार स्थापन झाले. दुर्दैवाने पूर्वी काँग्रेस आणि आता भाजपही मुस्लिमांकडे कायम राजकीय दृष्टिकोनातून बघत आले आहे. आणि दुसरीकडे या देशात मुस्लीम समाजाला व्हीलन बनवून ठेवले आहे, अशी खंतही त्यांनी मांडली.

उद्या रजनीकांत म्हणतील

भाजप-सेना म्हणतात मी देशविरोधी आहे आणि काँग्रेसचे लोक म्हणतात मी मतं फोडतोय. उद्या भाजपसोबत गेलो तर रजनीकांत म्हणतील आणि कॉंग्रेससोबत गेलो तर अमिताभ बच्चन म्हणतील, अशी कोटी त्यांनी केली.

युवकांनी राजकारणात यावे

'देशातील तरुणांनी जास्तीत जास्त प्रमाणात सक्रिय राजकारणात येण्याची गरज आहे. पण, उलट युवकांचा मतदानाचा टक्काच कमी होत चालला आहे. हे चित्र दुर्दैवी आहे. तरुणांनी विविध राजकीय पक्षांमध्ये सहभागी होऊन निवडणुका लढवायला पाहिजे,' असे आवाहन त्यांनी उपस्थित तरुणांना केले.

एनआरसी संविधानविरोधी

'भाजप नागरिकत्व सुधारणा विधेयक (कॅब) आणून संविधानविरोधी, आंबेडकरविरोधी, गांधीविरोधी, राजेंद्रप्रसादविरोधी आणि स्वातंत्र्यसेनानीविरोधी काम करीत आहे. संविधानाच्या निर्मितीच्या वेळी ईश्वराचा उल्लेख करण्याचा विचार मांडण्यात आला. पण, राजेंद्र प्रसाद यांनी त्याला विरोध केला आणि नागरिकांना महत्त्व देण्यात आले. आज भाजप धर्माच्याच नावावर नागरिकत्वाला महत्त्व देत आहे,' अशी टीका ओवैसी यांनी केली.

'कॅब'च्या नावावर भाजप देशाचे धार्मिक विभाजन करण्याच्या प्रयत्नात आहे. त्यामुळे त्यांना सत्तेपासून दूर करायला हवे. हा कायदा तयार करून तर जिनांना जिवंत करण्याचाच प्रकार भाजपकडून होत आहे, अशी टीका त्यांनी केली.

किती लोकांना नागरिकत्व देणार?

'कॅब'च्या मुद्यावर मी सभागृहात विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे सरकारने दिली नाहीत. मी म्हणतो किती लोकांना नागरिकत्व देणार आहात, याची आकडेवारी द्या. पण अमित शहा एकाच श्वासात 'हजारो, लाखो' एवढेच सांगतात. पण नेमकी आकडेवारी देत नाहीत, अशी हरकत त्यांनी नोंदवली.

> शांत बसणार नाही

संविधानाने संसदेत आपले मत मांडण्याचा अधिकार दिला आहे. सरकार ऐकत नसेल तर लोकांमध्ये जाण्याचा आणि न्यायालयात जाण्याचाही अधिकार आहे.'कॅब'च्या विरोधात मी शांत बसणार नाही. देशाच्या प्रत्येक कोपऱ्यात जाऊन लोकांना सांगेन आणि गरज पडलीच तर प्रत्येक घराचा दरवाजा ठोठावेन, असेही ओवैसी म्हणाले.

> राममंदिरामुळे भाजप येथवर

'राममंदिर बनविण्याची यात्रा विश्व हिंदू परिषदेने सुरू केली. अयोध्या प्रकरण झाले. पुढे गुजरातची दंगल झाली. २०१० पासून काँग्रेसची भाजपला मदत झाली. भाजप येथवर पोहोचले ते राममंदिरामुळेच,' याचा त्यांनी आवर्जून उल्लेख केला.

> मला हिरो व्हायचे नाही

'लोकांना नरेंद्र मोदी आणि राहुल गांधी यांच्यातून देशाचा हिरो ठरवायचा आहे. मी तर व्हीलन आहेच. कारण मी मोदी आणि गांधी यांच्याविरोधात बोलत असतो. मला ५६ इंचाची छातीही दाखवायची नाही आणि हिरोही व्हायचे नाही,' असे त्यांनी स्पष्ट केले.

मी कट्टर कसा?

मी कधीही फक्त मुस्लीमांसाठी बोलत नाही. उपेक्षितांसाठी बोलतो. तिकडे पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांच्याबाबतीत अशी अडचण आहे की, त्या म्हणतात तुम्ही कोण, आम्हीच इथले नेते. असे आहे तर पश्चिम बंगालच्या मुस्लीमांसाठी ममता बॅनर्जींनी काय केले, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

टीका करण्याचा अधिकार संविधानामुळे

नरेंद्र मोदी, राहुल गांधी, उद्धव ठाकरे सगळेच वाईट आहेत, तर चांगले कोण, असा प्रश्न एका विद्यार्थ्याने विचारला. त्यावर ओवैसी म्हणाले, 'या सर्वांवर टीका करण्याचा अधिकार मला संविधानाने दिला आहे. त्यामुळे यांच्याबद्दल माझी मते मी जाहीरपणे मांडू शकतो.'

शब्दांकन : नितीन नायगांवकर

टॅग्स :lokmat parliamentary awardsलोकमत पार्लिमेंट्री अवॉर्डAsaduddin Owaisiअसदुद्दीन ओवेसीAIMIMऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीनcitizen amendment billनागरिकत्व सुधारणा विधेयकmaharashtra vikas aghadiमहाराष्ट्र विकास आघाडी