शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील ३ तासांसाठी मुंबईला 'रेड अलर्ट'; विजांच्या कडकडाट अन् जोरदार वाऱ्यासह पावसाचा इशारा
2
Monorail Mumbai: मोनो रेल्वे पुन्हा बंद पडली, भर पावसात प्रवाशांना काढले बाहेर
3
युद्ध स्फोटक वळणावर, रशियन ड्रोन्स रोमानियात; युक्रेनचा रशियातील सर्वात मोठ्या तेल प्रकल्पावर भीषण हल्ला
4
राहुल गांधींवर आरोप करण्याऐवजी त्यांनी केलेल्या आरोपांची चौकशी करा
5
Maharashtra Rain: आजचा दिवस पावसाचा, संपूर्ण महाराष्ट्राला झोडपणार; चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
6
PPF Investment: पती पत्नीसाठी डबल नफ्याची ट्रिक! टॅक्सही शून्य, व्याजही जास्त; कसा घ्याल फायदा?
7
४० हजार एन्ट्री फी, अख्खी रात्र 'Nude Party'; विना कपडे येणार होते २१ मुले-मुली, आयोजकांना अटक
8
ट्रम्प अन् निर्बंधांमुळे रशियन तेल मिळवण्यात भारताला अडचणी; जहाज कंपन्यांनी दिला नकार
9
पाकिस्तानवर ‘फिरकी बाॅम्ब’; इंडियाचा मैदानावरही 'बदला'; हायव्होल्टेज सामन्यात पाकचा दणदणीत पराभव
10
सकाळपासून ते रात्री झोपेपर्यंतच्या सर्व उत्पादनांवर जीएसटी सवलत मिळणार; निर्मला सीतारामण यांचा दावा
11
आजचे राशीभविष्य- १५ सप्टेंबर २०२५: रागावर नियंत्रण ठेवा, कुटुंबियांशी वादविवाद टाळावेत!
12
‘जिल्हा परिषदां’ना बळ मिळेल? पूर्वी जिल्हा परिषद अध्यक्षांना राज्यमंत्री पदाचा दर्जा होता
13
सायबर भामट्यांनी साेडले खात्यात केवळ ८६ रुपये; बोलण्यात गुंतवून पाठवली लिंक
14
मी शिवभक्त, विष गिळून टाकतो, पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; काँग्रेसने घुसखोरांना प्रोत्साहन दिले, गरिबांना नाकारले
15
महाराष्ट्रात एका वर्षात ‘आयुष्मान’चे लाभार्थी तिप्पट; ग्रामीण भागापर्यंत विस्तार करण्याचे राज्यासमोर आव्हान
16
पूजा खेडकरांच्या घरातून अपहृत चालकाची सुटका; ऐरोलीत अपघात, कारमध्ये कोंबून नेले पुण्याला
17
मोबाइलमध्ये अडकलेली तरुणाई सरस्वतीच्या दरबारात नेणार : विश्वास पाटील
18
प्रभादेवी तिकीट कार्यालयाचे स्थलांतर कुठे? २ ते ३ दिवसांमध्ये जागा निश्चित करणार
19
बांधकामातील बदल, कराने वाढला कोस्टल रोडचा खर्च; महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या शेवटच्या टप्प्यात २ हजार कोटींची वाढ

लोकसभा, विधानसभा निवडणुका एकाच वेळी?, नीति आयोगाने दर्शविली अनुकूलता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2017 02:22 IST

देशाच्या हितासाठी २०२४ पासून लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका एकाच वेळी दोन टप्प्यांत घेण्यास नीति आयोग अनुकूल आहे.

नवी दिल्ली : देशाच्या हितासाठी २०२४ पासून लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका एकाच वेळी दोन टप्प्यांत घेण्यास नीति आयोग अनुकूल आहे. देशातील सगळ््या निवडणुका या प्रशासनाला कमीत कमी व्यत्यय आणताना निर्भय वातावरणात झाल्या पाहिजेत, असे नीति आयोगाने नुकत्याच प्रसिद्धीस दिलेल्या अहवालात म्हटले आहे. 2024 पासून आम्ही लोकसभेच्या निवडणुका दोन टप्प्यांत एकाच वेळी घेण्यासाठीचे काम सुरू करू शकतो, त्यासाठी काही राज्यांच्या विधानसभांचा कालावधी किमान एका वेळेस तरी कमी करावा लागेल किंवा वाढवाला लागेल. याची अंमलबजावणी देशाच्या हितासाठी करताना, या निवडणुकीशी संबंधित घटक घटनात्मक आणि निवडणुकांचे तज्ज्ञ, वैचारिक संस्था, सरकारी अधिकारी आणि वेगवेगळ््या राजकीय पक्षांचे प्रतिनिधी यांनी योग्य पद्धतीने अंमलबजावणी व्हावी, यासाठी एकत्र आले पाहिजे, असे हा अहवाल म्हणतो. यात सुयोग्य घटनात्मक आणि वैधानिक दुरुस्त्यांचा आराखडा करणे, एकाच वेळी निवडणुका घेण्यासाठी व्यवहार्य चौकट तयार करणे, संबंधित घटकांशी संवादाची योजना आणि अंमलबजावणीचे वेगवेगळे तपशील असले पाहिजेत, असे ‘थ्री ईअर अ‍ॅक्शन अजेंडा, २०१७-१८ ते २०१९-२०’ या अहवालात म्हटले आहे.या कामासाठी शिफारशींचा विचार करण्यासाठी निवडणूक आयोगाला मध्यस्थ संस्था करण्यात आले असून, मार्च, २०१८ ही मुदत ठरविण्यात आली आहे. माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही लोकसभा आणि विधानसभांच्या निवडणुका एकाच वेळी घेण्यावर भर दिल्यामुळे नीति आयोगाच्या या शिफारशीला खूप महत्त्व आहे. मुखर्जी यांनी या वर्षीच्या प्रजासत्ताक दिन कार्यक्रमातील भाषणात एकाच वेळी निवडणुका घेण्यास अनुकूलता दाखविली होती. ते म्हणाले होते की, ‘निवडणूक सुधारणांवर विधायक चर्चा करण्यास अनुकूल वेळ आलेली आहे.’

टॅग्स :LoksabhaलोकसभाPresidentराष्ट्राध्यक्षNarendra Modiनरेंद्र मोदी