शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
4
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
5
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
6
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
7
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
8
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
9
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
10
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
11
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
12
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
13
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
14
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
15
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
16
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
17
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
18
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
19
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
20
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."

लोकसभा, विधानसभा निवडणुका एकाच वेळी?, नीति आयोगाने दर्शविली अनुकूलता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2017 02:22 IST

देशाच्या हितासाठी २०२४ पासून लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका एकाच वेळी दोन टप्प्यांत घेण्यास नीति आयोग अनुकूल आहे.

नवी दिल्ली : देशाच्या हितासाठी २०२४ पासून लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका एकाच वेळी दोन टप्प्यांत घेण्यास नीति आयोग अनुकूल आहे. देशातील सगळ््या निवडणुका या प्रशासनाला कमीत कमी व्यत्यय आणताना निर्भय वातावरणात झाल्या पाहिजेत, असे नीति आयोगाने नुकत्याच प्रसिद्धीस दिलेल्या अहवालात म्हटले आहे. 2024 पासून आम्ही लोकसभेच्या निवडणुका दोन टप्प्यांत एकाच वेळी घेण्यासाठीचे काम सुरू करू शकतो, त्यासाठी काही राज्यांच्या विधानसभांचा कालावधी किमान एका वेळेस तरी कमी करावा लागेल किंवा वाढवाला लागेल. याची अंमलबजावणी देशाच्या हितासाठी करताना, या निवडणुकीशी संबंधित घटक घटनात्मक आणि निवडणुकांचे तज्ज्ञ, वैचारिक संस्था, सरकारी अधिकारी आणि वेगवेगळ््या राजकीय पक्षांचे प्रतिनिधी यांनी योग्य पद्धतीने अंमलबजावणी व्हावी, यासाठी एकत्र आले पाहिजे, असे हा अहवाल म्हणतो. यात सुयोग्य घटनात्मक आणि वैधानिक दुरुस्त्यांचा आराखडा करणे, एकाच वेळी निवडणुका घेण्यासाठी व्यवहार्य चौकट तयार करणे, संबंधित घटकांशी संवादाची योजना आणि अंमलबजावणीचे वेगवेगळे तपशील असले पाहिजेत, असे ‘थ्री ईअर अ‍ॅक्शन अजेंडा, २०१७-१८ ते २०१९-२०’ या अहवालात म्हटले आहे.या कामासाठी शिफारशींचा विचार करण्यासाठी निवडणूक आयोगाला मध्यस्थ संस्था करण्यात आले असून, मार्च, २०१८ ही मुदत ठरविण्यात आली आहे. माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही लोकसभा आणि विधानसभांच्या निवडणुका एकाच वेळी घेण्यावर भर दिल्यामुळे नीति आयोगाच्या या शिफारशीला खूप महत्त्व आहे. मुखर्जी यांनी या वर्षीच्या प्रजासत्ताक दिन कार्यक्रमातील भाषणात एकाच वेळी निवडणुका घेण्यास अनुकूलता दाखविली होती. ते म्हणाले होते की, ‘निवडणूक सुधारणांवर विधायक चर्चा करण्यास अनुकूल वेळ आलेली आहे.’

टॅग्स :LoksabhaलोकसभाPresidentराष्ट्राध्यक्षNarendra Modiनरेंद्र मोदी