शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

हिंदूंबाबत राहुल गांधींच्या वक्तव्यानं गदारोळ, भाजपाचा निशाणा तर काँग्रेसचाही पलटवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 2, 2024 06:00 IST

राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील चर्चेदरम्यान लाेकसभेत राहुल गांधींच्या वक्तव्याने गदारोळ

नवी दिल्ली - लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी सोमवारी भाजपवर देशात हिंसाचार, द्वेष आणि भीती पसरवल्याचा आरोप करीत ‘भाजपचे हे लोक हिंदू नाहीत’ असे वक्तव्य केले. त्याला सत्ताधारी पक्षाच्या सदस्यांनी जोरदार विरोध केला. संपूर्ण हिंदू समाजाला हिंसक म्हणणे ही अत्यंत गंभीर बाब आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. या मुद्द्यावरून लोकसभेत मोठा गदारोळ झाला.

राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभार प्रस्तावावरील चर्चेत सहभागी होताना राहुल म्हणाले की, हिंदू कधीही हिंसा करू शकत नाही, द्वेष आणि भीती कधीही पसरवू शकत नाही; परंतु भाजपने युवक, विद्यार्थी, शेतकरी, मजूर, मागासवर्गीय, महिला आणि अल्पसंख्याकांमध्ये भीती निर्माण केली; परंतु अल्पसंख्याक या देशाच्या पाठीशी खडकासारखे खंबीरपणे उभे आहेत. हा अहिंसेचा देश आहे, भीतीचा नाही. भगवान शिव म्हणतात- घाबरू नका, घाबरवू नका. ते अहिंसेबद्दल बोलतात. जे स्वतःला हिंदू म्हणवतात ते २४ तास हिंसा आणि द्वेषावर बोलतात. तुम्ही (भाजप) हिंदू असूच शकत नाही,  अशी टीका राहुल गांधी यांनी केली.

पंतप्रधान मोदी आज लोकसभेत राहुल गांधींना उत्तर देणार

राहुल गांधी यांच्या आरोपांना उत्तर देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वत: पुढे सरसावणार आहेत. या आरोपांना ते मंगळवारी लोकसभेत उत्तर देणार आहेत. राहुल गांधी यांनी भारतीय जनता पक्ष आणि एनडीए सरकारवर लोकसभेत जोरदार हल्ला चढविला. त्यानंतर राहुल यांच्यावर हल्ला चढविण्यासाठी सरकारचे ज्येष्ठ कॅबिनेट मंत्री अश्विनी वैष्णव आणि किरेन रिजिजू हे पत्रकार परिषद घेण्यासाठी पुढे आले. सरकारच्या जवळच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पंतप्रधान मोदी स्वतः मंगळवारी लोकसभेत राहुल गांधींच्या प्रत्येक आरोपांना उत्तर देणार आहेत. राजनाथ सिंह, अमित शाह, पीयूष गोयल यांनी राहुल गांधींच्या आरोपांना प्रत्युत्तर देण्यासाठी चर्चा केली आहे.

हिंदूंना ‘हिंसक’ म्हणणे, ही अत्यंत गंभीर बाब : पंतप्रधान राहुल गांधी यांच्या दाव्यांचे खंडन करण्यासाठी पंतप्रधान मोदी दोनदा त्यांच्या जागेवरून उठले. पंतप्रधान मोदी म्हणाले, “संपूर्ण हिंदू समुदायाला हिंसक म्हणणे, ही अत्यंत गंभीर बाब आहे.” अग्निवीरांच्या मृत्यूनंतर त्यांना शहीद दर्जा मिळत नाही, असा आरोपही गांधी यांनी केला. यावर संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी अग्निवीराच्या कुटुंबीयांना एक कोटी रुपयांची मदत देण्याची तरतूद असल्याचे निदर्शनास आणून दिले.

भगवान शंकराची अभय मुद्राराहुल गांधींनी सभागृहात भगवान शंकराचे चित्र दाखवून भगवान यांच्याकडून सत्य, धैर्य आणि अहिंसेची प्रेरणा मिळते, भगवान म्हणतात घाबरू नकोस, घाबरवू नकोस, असे सांगितले. भगवान शिवाच्या ‘अभय मुद्रे’चा उल्लेख करून ते म्हणाले की, ही मुद्रा इस्लाम, शीख, ख्रिश्चन, बौद्ध आणि जैन या सर्व धर्मांमध्ये दिसते.

राहुल गांधींनी माफी मागावी : अमित शाह“विरोधी पक्षनेते म्हणतात की, जे स्वत:ला हिंदू म्हणवतात ते हिंसा करतात. त्यांना माहीत नाही की, कोट्यवधी लोक अभिमानाने स्वतःला हिंदू म्हणवतात, ते सगळे हिंसाचार करतात का? त्यांनी (राहुल) माफी मागितली पाहिजे. आणीबाणीच्या काळात संपूर्ण देश दहशतीत होता. आणीबाणीच्या काळात वैचारिक दहशत होती. त्यांच्या (काँग्रेस) राजवटीत दिल्लीत हजारो शीख बांधवांची हत्या करण्यात आली,” असे अमित शाह म्हणाले. यावर राहुल गांधी म्हणाले, “पंतप्रधान म्हणजे संपूर्ण हिंदू समाज नाही. भाजप हा संपूर्ण हिंदू समाज नाही. आरएसएस हा संपूर्ण हिंदू समाज नाही. हा ठेका भाजपचा नाही.”

भाषणाची पडताळणी करणार : ओम बिर्लाराहुल यांच्या भाषणाच्या शेवटी गृहमंत्री अमित शाह म्हणाले की, राहुल गांधींनी सांगितलेल्या अनेक गोष्टी तथ्यहीन आणि खोट्या आहेत. या गोष्टींची पडताळणी करण्याची विनंती त्यांनी लोकसभा अध्यक्षांना केली. पडताळणी केली जाईल, असे बिर्ला यांनी सांगितले.

टॅग्स :lok sabhaलोकसभाNarendra Modiनरेंद्र मोदीRahul Gandhiराहुल गांधीHinduहिंदू