शहरं
Join us  
Trending Stories
1
"युद्ध थांबवलं नाही तर…’’, भारत-पाकिस्तानमधील संघर्षाचा उल्लेख करत डोनाल्ड ट्रम्प यांचा थायलंड कंबोडियाला इशारा
2
"...मग आम्हाला जगभर कशाला पाठवलं?"; IND vs PAK क्रिकेट शेड्युलवर संतापल्या प्रियंका चतुर्वेदी
3
मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात! कंटेनरचे ब्रेक फेल, अनेक वाहने एकमेकांवर धडकली...
4
IND vs ENG 4th Test Day 4 Stumps : साडे चार तासांत ३७३ चेंडूंचा सामना; KL राहुल-गिल जोडी जमली; पण लढाई अजून नाही संपली!
5
"जर 6 महिन्यांत मर्सिडीज अथवा बीएमडब्ल्यू हवी असेल तर..." सरन्यायाधीश गवई यांचा नव्या वकीलांना सल्ला
6
Asia Cup 2025: 'असं' झालं तर तब्बल तीन वेळा रंगणार IND vs PAK क्रिकेट सामना, जाणून घ्या
7
Shubman Gill Record : गिलनं साधला मोठा डाव! इंग्लंडच्या मैदानात पाक दिग्गजाला 'धोबीपछाड'
8
तेव्हा लोक म्हणाले होते जणू दुसरी ऐश्वर्याच, सलमान खानची ही हिरोईन आता दिसते अशी 
9
एलियन्सचं रहस्यमय अंतराळ यान नोव्हेंबरमध्ये करणार पृथ्वीवर हल्ला, शास्त्रज्ञांना धक्कादायक दावा
10
नवरा बायकोमध्ये तुफान भांडण, पतीच्या डोक्यात घातला हातोडा, हत्येनंतर दार लावलं अन्...
11
Video: बंगळुरूच्या महिला प्रोफेसरचा मराठमोळ्या 'वाजले की बारा' लावणीवर भन्नाट डान्स
12
"आम्ही खूप दुःखी..."; दिराने वहिनीला कुंकू लावलं अन् धबधब्यात घेतली उडी, प्रेमाचा भयंकर शेवट
13
IND vs ENG : जसप्रीत बुमराहचं 'शतक'; मँचेस्टर कसोटीतील न पटण्याजोगी गोष्ट
14
Asia Cup 2025 चे वेळापत्रक जाहीर! भारत पाकिस्तान पुन्हा एकाच गटात, 'या' दिवशी सामना
15
१४,२९८ पुरुषांना 'लाडकी बहीण'चा लाभ; अजित पवार म्हणाले, 'वसूल करणार, नाही दिले तर...'
16
"सरकार ही निरुपयोगी यंत्रणा, चालत्या गाडीला पंक्चर करण्याचं काम..."; नितीन गडकरींनी सुनावलं
17
बिहार निवडणुकीसाठी काँग्रेसची मोर्चेबांधणी, महाराष्ट्रातील या महिला खासदाराकडे सोपवली मोठी जबाबदारी
18
"बंदुकीच्या धाकाने बांगलादेशात ढकलले जातेय...!" बांगली भाषिक मुस्लिमांवरील कारवाईवरून ओवेसी भडकले
19
IND vs ENG : यशस्वीच्या पदरी लाजिरवाणा 'भोपळा'! साई आला अन् तोही फक्त 'दर्शन' देऊन गेला
20
"राहुल गांधींच्या नशिबात कायम माफी मागणे लिहीले आहे"; केंद्रीय कृषीमंत्र्यांनी काँग्रेसला घेरलं, "१० वर्षांनी पुन्हा..."

हिंदूंबाबत राहुल गांधींच्या वक्तव्यानं गदारोळ, भाजपाचा निशाणा तर काँग्रेसचाही पलटवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 2, 2024 06:00 IST

राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील चर्चेदरम्यान लाेकसभेत राहुल गांधींच्या वक्तव्याने गदारोळ

नवी दिल्ली - लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी सोमवारी भाजपवर देशात हिंसाचार, द्वेष आणि भीती पसरवल्याचा आरोप करीत ‘भाजपचे हे लोक हिंदू नाहीत’ असे वक्तव्य केले. त्याला सत्ताधारी पक्षाच्या सदस्यांनी जोरदार विरोध केला. संपूर्ण हिंदू समाजाला हिंसक म्हणणे ही अत्यंत गंभीर बाब आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. या मुद्द्यावरून लोकसभेत मोठा गदारोळ झाला.

राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभार प्रस्तावावरील चर्चेत सहभागी होताना राहुल म्हणाले की, हिंदू कधीही हिंसा करू शकत नाही, द्वेष आणि भीती कधीही पसरवू शकत नाही; परंतु भाजपने युवक, विद्यार्थी, शेतकरी, मजूर, मागासवर्गीय, महिला आणि अल्पसंख्याकांमध्ये भीती निर्माण केली; परंतु अल्पसंख्याक या देशाच्या पाठीशी खडकासारखे खंबीरपणे उभे आहेत. हा अहिंसेचा देश आहे, भीतीचा नाही. भगवान शिव म्हणतात- घाबरू नका, घाबरवू नका. ते अहिंसेबद्दल बोलतात. जे स्वतःला हिंदू म्हणवतात ते २४ तास हिंसा आणि द्वेषावर बोलतात. तुम्ही (भाजप) हिंदू असूच शकत नाही,  अशी टीका राहुल गांधी यांनी केली.

पंतप्रधान मोदी आज लोकसभेत राहुल गांधींना उत्तर देणार

राहुल गांधी यांच्या आरोपांना उत्तर देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वत: पुढे सरसावणार आहेत. या आरोपांना ते मंगळवारी लोकसभेत उत्तर देणार आहेत. राहुल गांधी यांनी भारतीय जनता पक्ष आणि एनडीए सरकारवर लोकसभेत जोरदार हल्ला चढविला. त्यानंतर राहुल यांच्यावर हल्ला चढविण्यासाठी सरकारचे ज्येष्ठ कॅबिनेट मंत्री अश्विनी वैष्णव आणि किरेन रिजिजू हे पत्रकार परिषद घेण्यासाठी पुढे आले. सरकारच्या जवळच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पंतप्रधान मोदी स्वतः मंगळवारी लोकसभेत राहुल गांधींच्या प्रत्येक आरोपांना उत्तर देणार आहेत. राजनाथ सिंह, अमित शाह, पीयूष गोयल यांनी राहुल गांधींच्या आरोपांना प्रत्युत्तर देण्यासाठी चर्चा केली आहे.

हिंदूंना ‘हिंसक’ म्हणणे, ही अत्यंत गंभीर बाब : पंतप्रधान राहुल गांधी यांच्या दाव्यांचे खंडन करण्यासाठी पंतप्रधान मोदी दोनदा त्यांच्या जागेवरून उठले. पंतप्रधान मोदी म्हणाले, “संपूर्ण हिंदू समुदायाला हिंसक म्हणणे, ही अत्यंत गंभीर बाब आहे.” अग्निवीरांच्या मृत्यूनंतर त्यांना शहीद दर्जा मिळत नाही, असा आरोपही गांधी यांनी केला. यावर संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी अग्निवीराच्या कुटुंबीयांना एक कोटी रुपयांची मदत देण्याची तरतूद असल्याचे निदर्शनास आणून दिले.

भगवान शंकराची अभय मुद्राराहुल गांधींनी सभागृहात भगवान शंकराचे चित्र दाखवून भगवान यांच्याकडून सत्य, धैर्य आणि अहिंसेची प्रेरणा मिळते, भगवान म्हणतात घाबरू नकोस, घाबरवू नकोस, असे सांगितले. भगवान शिवाच्या ‘अभय मुद्रे’चा उल्लेख करून ते म्हणाले की, ही मुद्रा इस्लाम, शीख, ख्रिश्चन, बौद्ध आणि जैन या सर्व धर्मांमध्ये दिसते.

राहुल गांधींनी माफी मागावी : अमित शाह“विरोधी पक्षनेते म्हणतात की, जे स्वत:ला हिंदू म्हणवतात ते हिंसा करतात. त्यांना माहीत नाही की, कोट्यवधी लोक अभिमानाने स्वतःला हिंदू म्हणवतात, ते सगळे हिंसाचार करतात का? त्यांनी (राहुल) माफी मागितली पाहिजे. आणीबाणीच्या काळात संपूर्ण देश दहशतीत होता. आणीबाणीच्या काळात वैचारिक दहशत होती. त्यांच्या (काँग्रेस) राजवटीत दिल्लीत हजारो शीख बांधवांची हत्या करण्यात आली,” असे अमित शाह म्हणाले. यावर राहुल गांधी म्हणाले, “पंतप्रधान म्हणजे संपूर्ण हिंदू समाज नाही. भाजप हा संपूर्ण हिंदू समाज नाही. आरएसएस हा संपूर्ण हिंदू समाज नाही. हा ठेका भाजपचा नाही.”

भाषणाची पडताळणी करणार : ओम बिर्लाराहुल यांच्या भाषणाच्या शेवटी गृहमंत्री अमित शाह म्हणाले की, राहुल गांधींनी सांगितलेल्या अनेक गोष्टी तथ्यहीन आणि खोट्या आहेत. या गोष्टींची पडताळणी करण्याची विनंती त्यांनी लोकसभा अध्यक्षांना केली. पडताळणी केली जाईल, असे बिर्ला यांनी सांगितले.

टॅग्स :lok sabhaलोकसभाNarendra Modiनरेंद्र मोदीRahul Gandhiराहुल गांधीHinduहिंदू