शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू
2
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
3
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
4
Mumbai Rain Mithi River: दोरी फेकली, पण अंदाज चुकला; मिठी नदीच्या पुरात तरुण गेला वाहून
5
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
6
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
7
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका
8
कुत्र्याला वाचवण्याच्या प्रयत्नात पोलीस अधिकाऱ्याचा जीव गेला; रस्त्यावर पडताच कारने चिरडले
9
"मी सुरक्षित आहे..." १३ दिवसांनी अर्चना तिवारीचा आईला फोन; बेपत्ता होण्यामागचं रहस्य उलगडणार?
10
निमिषा प्रियासाठी सरकार जनतेकडून ८ कोटी मागत आहे? परराष्ट्र मंत्रालयाने सत्य सांगितले
11
याला म्हणतात शेअर...! 24 तासांत 1 लाखाचे केले 88 लाख, एवढी तेजी आली की ट्रेडिगच थांबवावी लागली! नेमकं काय घडलं?
12
जिओने खिसा कापला...! १ जीबी, २८ दिवसांचा प्लॅन बंद केला; आता २९९ रुपये मोजावे लागणार
13
काँग्रेसने ज्या 'ट्विट'वरून निवडणूक आयोगाची गचांडी धरली, ती पोस्टच डिलीट; संजय कुमारांनी माफी का मागितली?
14
ऑनलाइन बेटिंग आता दंडनीय गुन्हा, केंद्रीय मंत्रिमंडळाचा गेमिंग विधेयकाला हिरवा कंदील
15
India Squad For Asia Cup 2025: संघ ठरला! सूर्याच्या नेतृत्वाखाली गिलकडेही आली मोठी जबाबदारी, कुणाला मिळाली संधी?
16
Viral Video : तरुणीने ट्रक चालकाशी बांधली लग्नगाठ; स्वतः सांगितलं भन्नाट कारण! व्हिडीओ होतोय व्हायरल
17
KBC च्या हॉट सीटवर अमिताभ बच्चन यांच्यासोबत खेळण्याची सुवर्णसंधी! BHIM App वर अशी करा नोंदणी
18
पत्नीचा संशयास्पद मृत्यू, अनेक महिलांशी संबंध...निळ्या ड्रम प्रकरणातील आरोपी प्रियकराचा 'कारनामा'
19
निळ्या ड्रमातील मर्डर मिस्ट्रीचा खुलासा; पहिल्यांदाच प्रियकरासोबत समोर आली आरोपी पत्नी लक्ष्मी
20
Chipi Airport: चिपी विमानतळ सेवा पुन्हा सुरू होणार; राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय

लॉकडाउन हा उपाय नव्हे, ते ‘पॉज बटण’

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2020 06:21 IST

राहुल गांधी यांचे मत; जास्तीत जास्त लोकांच्या कोरोना चाचण्या कराव्यात

शीलेश शर्मा

नवी दिल्ली : कोरोना साथीला आटोक्यात आणण्यासाठी लॉकडाउन हा उपाय असूच शकत नाही. लॉकडाउन उठले की विषाणूू पुन्हा त्याचे काम सुरु करेल, असे मत काँग्रेस नेते, खासदार राहुल गांधी यांनी गुरुवारी येथे व्यक्त केले. यावर मात करण्यासाठी जास्तीत जास्त लोकांच्या लवकरात लवकर चाचण्या करायला हव्यात, असेही त्यांनी सुचविले.

व्हिडिओ पत्रकार परिषदेत बोलताना गांधी असेही म्हणाले की, मी देशातील व परदेशातीलही अनेक तज्ज्ञांशी बोललो. त्यांचेही म्हणणे असेच आहे. ‘लॉकडाउन’मुळे आरोग्य यंत्रणा सज्ज करायला थोडी उसंत मिळते, एवढेच. ते असेही म्हण़ाले की, विषाणूपासून बचाव करण्याच्या नादात आपण देशाची अर्र्थव्यवस्था खड्ड्यात घालू शकत नाही. अशा प्रकारच्या साथीला रोखता येत नसते. ती पद्धतशीरपणे हाताळावी लागते.ते पुढे म्हणाले की, ‘लॉकडाउन’ उठवितानाही विचारपूर्वक धोरण ठरवायला हवे. त्यासाठी तपासण्या हा मार्ग अनुसरावा लागेल. ‘हॉटस्पॉट’ व बिगर ‘हॉटस्पॉट’ असे वर्गीकरण करून चाचण्यांचा वेग वाढवावा लागेल.‘लॉकडाउन’ वाढविल्याने आधीच अडचणीत असलेल्या स्थलांतरित कामगारांचा प्रश्न अधिक गंभीर झाला आहे. उपासमार ही त्यांची सर्वात मोठी समस्या आहे. त्यामुळे त्यांच्यासाठी सरकारने धान्याची कोठारे खुली करायला हवीत, असेही त्यांनी आग्रही प्रतिपादन केले.ही भांडण्याची वेळ नाहीराहुल गांधी असेही म्हणाले की, अनेक बाबतीत माझे पंतप्रधान नरेंद्र मोदींशी मतभेद असू शकतात. पण ही वेळ ते मतभेद उगाळत भांडत बसण्याची नाही. कोरोनाविरुद्ध सर्वांनी एकदिलाने लढा द्यायला हवा. भांडत बसलो तर आपल्याला यश येणार नाही.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीcorona virusकोरोना वायरस बातम्याNarendra Modiनरेंद्र मोदी