शहरं
Join us  
Trending Stories
1
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
2
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
3
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
4
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
5
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
6
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

हरयाणा, ओदिशातही आता लॉकडाऊन

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2021 06:08 IST

रुग्ण वाढताहेत : आरोग्य सेवेवर कमालाची ताण

चंदीगड : हरयाणात कोरोना विषाणूच्या रुग्णांमध्ये वेगाने वाढ होत असल्यामुळे रविवारी राज्य सरकारने संपूर्ण राज्यात तीन मेपासून एक आठवड्याचा लॉकडाऊन लागू केल्याची घोषणा केली. तत्पूर्वी, गुरुग्राम, फरिदाबाद, पंचकुला, सोनिपत, रोहटक, करनाल, हिसार आणि फतेहाबाद जिल्ह्यांत रात्री दहापासून सकाळी पाच वाजेपर्यंत शुक्रवारपर्यंत वीकेंड संचारबंदी सोमवारी लागू केली होती. तीन मेपासून संपूर्ण राज्यात  सात दिवसांचा लॉकडाऊन लागू करण्यात आल्याची माहिती गृह आणि आरोग्यमंत्री अनिल विज यांनी ट्विटरवर दिली.

हरयाणात शनिवारी कोविडमुळे १२५ जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे राज्यात एकूण मृतांची संख्या ४३४१ झाली, तर १३,५८८ नवे रुग्ण नोंद झाल्यामुळे एकूण रुग्णांची संख्या ५ लाख १ हजार ५६६ झाली. रुग्णांत मोठी वाढ होत असल्यामुळे आरोग्य यंत्रणेवर कमालीचा ताण आला आहे. कोरोना विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी १४४ कलम लागू करण्यात आले असून रात्रीची संचारबंदीही लागू करण्यात आली होती. कोरोनाची सध्याची परिस्थिती ही काळजी करण्यासारखी असल्याचे विरोधी पक्षांनीही म्हटले. परिस्थिती हाताळण्यासाठी पावले उचलण्यात यावी, असे माजी मुख्यमंत्री भूपिंदर सिंह हुडा यांनी गुरुवारी म्हटले. 

ओदिशात कठोर निर्बंध; बाजारपेठा बंदnभुवनेश्वर : ओदिशात कोरोना विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी पाच मेपासून १४ दिवसांचा लॉकडाऊन लागू करण्यात आल्याची घोषणा रविवारी राज्याचे मुख्य सचिव एस. सी. महापात्र यांनी केल्याचे अधिकृत आदेशात म्हटले आहे. nमहापात्रा यांनी ट्विटर संदेशात हा लॉकडाऊन १९ मेपर्यंत सकाळी पाच वाजेपासून लागू असेल, असे म्हटले. या लॉकडाऊनशिवाय १५ मेपर्यंत शहरी भागांत वीकेंड शटडाऊनही अमलात राहील. nशटडाऊनमध्ये वैद्यकीय दुकाने आणि रुग्णालये वगळता सगळे बंद राहील. कोणालाही एवढा कडक लॉकडाऊन नको आहे, परंतु सरकारने या महामारीत लोकांचे जीवित सुरक्षित राखण्यासाठी तो लागू केला असल्याचे महापात्रा म्हणाले. देशाच्या इतर भागांत दुसऱ्या लाटेत ज्या वेगाने कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत, तसेच ओदिशातही वाढत आहेत. शनिवारी राज्यात ८ हजार १५ नवे रुग्ण नोंद झाले.

टॅग्स :Haryanaहरयाणाcorona virusकोरोना वायरस बातम्या