शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशात रस्त्यांना छावणीचं स्वरूप, मोहम्मद युनूस यांच्या घराबाहेर मोठा फौज फाटा; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
2
'मी पुन्हा येईन! १४ नोव्हेंबरला विजय निश्चित'; बिहारच्या शेवटच्या सभेतून पंतप्रधान मोदींचा ठाम दावा
3
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
4
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
5
लोक प्रवाशांच्या जीवावर कोण उठले? सँडहर्स्ट रोड अपघाताची चौकशी जीआरपीकडे
6
ट्रॉलरसह आठ मच्छीमारांचे पाकिस्तानकडून अपहरण?
7
विकृत इसमाने मांजरावर केला अतिप्रसंग; मुंबईतील धक्कादायक घटना
8
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
9
केवळ पत्नी रडायची, म्हणून पतीला क्रूरतेसाठी दोषी ठरवू शकत नाही: उच्च न्यायालय
10
संसदेचे हिवाळी अधिवेशन १ ते १९ डिसेंबरदरम्यान
11
आज 'कोंडीवार'; सेंट्रल लोकलने जाणाऱ्यांनो सावधान!
12
आफ्रिकेचे आणखी ८ चित्ते लवकरच येणार भारतात
13
बिहारमध्ये झालेले विक्रमी मतदान कोणाच्या बाजूने? एनडीए आणि महाआघाडीत रस्सीखेच, पहिल्या टप्प्यात ६१.७८% मतदान
14
मनोज जरांगे यांना मुंबई पोलिसांचे समन्स; सोमवारी हजर राहण्याचे निर्देश
15
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभ, ६ राशींना अवघड काळ; उत्तम धनलाभ, पण पैसे उसने देऊ नका!
16
'मेक इन लातूर'; 'वंदे भारत'चा स्लीपर कोच जूनपासून रुळांवर धावणार, देखभाल दुरुस्ती राजस्थानला होणार
17
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
18
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
19
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
20
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी

रुग्णसंख्या वाढल्याने देशात पुन्हा लॉकडाउन? या राज्यांनी दिले निर्देश

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2020 07:42 IST

तामिळनाडूतील चेन्नई येथे 19 ते 30 जूनपर्यंत लॉकडाउनची घोषणा करण्यात आली आहे. तर, दुसरीकडे गुवाहटी येथेही मंगळवार 23 जूनपासून 14 दिवसांसाठी लॉकडाउन लागू करण्यात आला आहे.

नवी दिल्ली - कोरोनामुळे देशात तब्बल अडीच महिन्यांचा कडक लॉकडाऊन पाळण्यात आला. त्यानंतर, केंद्र आणि राज्य सरकारने अनलॉक करत परिस्थिती पूर्वपदावर आणण्यास सुरुवात केली आहे. मात्र, अनलॉक 1 मध्ये मोठ्या प्रमाणात रुग्णांची संख्या वाढताना दिसून येत आहे. सध्या देशातील एकूण रुग्णांची संख्या साधारणपणे 4.5 लाखांपर्यंत पोहोचली आहे. त्यामुळे, पुन्हा एकदा देशातील अनेक राज्यांवर लॉकडाउनचे सावट घोंगावत असून काही राज्यांनी लॉगडॉउन लागू केले आहे. 

तामिळनाडूतील चेन्नई येथे 19 ते 30 जूनपर्यंत लॉकडाउनची घोषणा करण्यात आली आहे. तर, दुसरीकडे गुवाहटी येथेही मंगळवार 23 जूनपासून 14 दिवसांसाठी लॉकडाउन लागू करण्यात आला आहे. आता, बंगळुरु येथेही कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता, लॉकडाउन लागू करण्यावर विचारविनिमय सुरू आहे. देशातील सर्वाधिक कोरोनाग्रस्त रुग्णांच्या संख्येत महाराष्ट्राचा पहिला क्रमांक लागतो. त्यात, राजधानी मुंबई अव्वलस्थानावर असून एकट्या मुंबईतील रुग्णांची संख्या 67 हजारांवर पोहोचली आहे. त्यामुळे, मुंबईतही पुन्हा लॉकडाउन लागू केला जाण्याची शक्यता नाकारण्यात येत नाही. 

तामिळनाडूत कोरोनाचा गुणाकार होताना दिसत आहे, त्यात चेन्नई येथे सर्वाधिक रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे, मेट्रोपोलियन सिटी असलेल्या चेन्नईतील जिल्ह्यात  19 ते 30 जूनपर्यंत लॉकडाउन लागू झाला आहे. चेन्नई, कांचीपूरम, चेंगलपट्टू, आणि तीरवल्लर या शहरात हा लॉकडाउन असून यास 'मैक्सिमाइज रेस्ट्रिक्टेड लॉकडाउन' असे नाव देण्यात आले आहे. चेन्नईत कोरोनाचे एकूण 44,205 रुग्ण आढळले असून गेल्या 24 तासात 1380 नवीन रुग्णांची भर पडली आहे. 

आसाममध्ये कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता, पुन्हा एकदा लॉकडाउनची चर्चा सुरु आहे. गुवाहटीच्या 11 नगरपालिका क्षेत्रात मंगळवारपासूनच 14 दिवसांसाठी लॉकडाउन लागू करण्यात आला आहे. आसाममध्ये आत्तापर्यंत 3718 एकूण रुग्ण आढळले असून त्यापैकी 1584 लोकं बरे होऊन घरी परतले आहेत. मात्र, खबरदारी म्हणून सरकारकडून लॉकडाउन करण्यात आले आहे. दरम्यान, बंगळुरुतही कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे, मुख्यमंत्री येदीयुरप्पा यांनी, ज्या भागात रुग्णांची वाढ होतेय, तेथे लॉकडाउन कडक करण्याचे निर्देश दिले आहेत. 

दरम्यान, देशातील एकूण रुग्णसंख्या आत्तापर्यंत 4,40,215 वर पोहोचली असून त्यामध्ये 1,78,014 एक्टीव्ह रुग्ण आहेत. तर जवळपास अडीच लाख रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे. दरम्यान, कोरोनामुळे देशात 14,011 जणांचा मृत्यू झाल्याची नोंद आहे.  

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याTamilnaduतामिळनाडूBengaluruबेंगळूरMumbaiमुंबई