शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: माजी मंत्री तानाजी सावंत यांचा बंगला पाण्याखाली; दोन-दोन टोयोटा फॉर्च्युनर पुरात बुडाल्या...
2
सुनेत्रा अजित पवार यांचे NCP कार्यकर्त्यांना आवाहन; म्हणाल्या, “अतिवृष्टी हातात नाही, पण...”
3
अभूतपूर्व परिस्थितीत तातडीच्या मदतीसह कायमस्वरुपी मदतीची गरज; अन्यथा शेती मोठ्या समस्येत - शरद पवार
4
PM मेलोनींच्या इटलीमध्ये हजारो आंदोलक रस्त्यावर, बस-रेल्वे गाड्यांची तोडफोड; 60 पोलीस जखमी
5
पेनी स्टॉक बनला मल्टीबॅगर, एका वर्षात केलं मालामाल; १ लाखांचे झाले ६८ लाखांपेक्षा अधिक
6
Accident Video: दोन बाईकचा थरकाप उडवणारा अपघात; हवेत उडाले, नंतर फूट दूर जाऊन पडले
7
फक्त डेटा डिलिट करणं पुरेसं नाही! जुना फोन विकण्यापूर्वी 'या' ५ सीक्रेट गोष्टी करायलाच हव्यात
8
"पाकिस्तानचे तुकडे तुकडे होतील, बॉम्बहल्ला ही तर सुरुवात..."; इस्लामाबादच्या शत्रूचा इशारा
9
Navratri 2025: वडापावची क्रेव्हिंग होतेय? झटपट करा 'हा' उपासाचा कुरकुरीत बटाटेवडा
10
काय सांगता? स्लिम होण्याचा ट्रेंड जीवघेणा; बारीक लोकांमध्ये अकाली मृत्यूचा धोका तिप्पट
11
नाना पाटेकर सरसावले, 'ऑपरेशन सिंदूर'नंतर Pakच्या गोळीबारात बाधित झालेल्या कुटुंबांना ४२ लाखांची मदत
12
जीएसटीने आणखी अवघड केले...! पार्ले-जी बिस्कीट पुडा ५ रुपयांचा आता ४.४५ ला, १ रुपयाचे चॉकलेट ८८ पैशांना...
13
Gold Silver Price Today: आजही सोन्या-चांदीचे भाव नव्या विक्रमी पातळीवर; सोन्याच्या दरात प्रति तोळा ₹१,३४३ तर चांदी ₹१,१८१ ने महागली
14
Mumbai Local: एसी लोकलच्या टपावर चढला तरूण; क्षणात होत्याचं नव्हत झालं; दिवा स्थानकावरील घटना!
15
...म्हणून डोंबिवलीत काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याला भाजपाच्या कार्यकर्त्यांनी नेसवली साडी, व्हिडीओ व्हायरल
16
नवरात्री २०२५: वातीभोवती काजळी धरली? १ सोपा उपाय; वात नीट राहील अन् दिवा अजिबात विझणार नाही
17
"निरपराध लोकांची काय चूक होती? आम्ही निषेध करणार"; हवाई हल्ल्यात ३० जणांचा मृत्यू, पाकिस्तानमधील जनता संतापली
18
GST कपातीनंतर सरकारची आणखी एक गुड न्यूज! २५ लाख महिलांना मिळणार मोफत गॅस कनेक्शन
19
ओला दुष्काळ जाहीर करणार का? देवेंद्र फडणवीस म्हणाले, 'त्याकरिता जेवढ्या पद्धतीची..."
20
"...ही चांगली गोष्ट नाही!"; राहुल गांधी यांच्या 'मत चोरी' संदर्भातील आरोपांवरून शरद पवार यांचं मोठं विधान, नेमकं काय म्हणाले?

रुग्णसंख्या वाढल्याने देशात पुन्हा लॉकडाउन? या राज्यांनी दिले निर्देश

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2020 07:42 IST

तामिळनाडूतील चेन्नई येथे 19 ते 30 जूनपर्यंत लॉकडाउनची घोषणा करण्यात आली आहे. तर, दुसरीकडे गुवाहटी येथेही मंगळवार 23 जूनपासून 14 दिवसांसाठी लॉकडाउन लागू करण्यात आला आहे.

नवी दिल्ली - कोरोनामुळे देशात तब्बल अडीच महिन्यांचा कडक लॉकडाऊन पाळण्यात आला. त्यानंतर, केंद्र आणि राज्य सरकारने अनलॉक करत परिस्थिती पूर्वपदावर आणण्यास सुरुवात केली आहे. मात्र, अनलॉक 1 मध्ये मोठ्या प्रमाणात रुग्णांची संख्या वाढताना दिसून येत आहे. सध्या देशातील एकूण रुग्णांची संख्या साधारणपणे 4.5 लाखांपर्यंत पोहोचली आहे. त्यामुळे, पुन्हा एकदा देशातील अनेक राज्यांवर लॉकडाउनचे सावट घोंगावत असून काही राज्यांनी लॉगडॉउन लागू केले आहे. 

तामिळनाडूतील चेन्नई येथे 19 ते 30 जूनपर्यंत लॉकडाउनची घोषणा करण्यात आली आहे. तर, दुसरीकडे गुवाहटी येथेही मंगळवार 23 जूनपासून 14 दिवसांसाठी लॉकडाउन लागू करण्यात आला आहे. आता, बंगळुरु येथेही कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता, लॉकडाउन लागू करण्यावर विचारविनिमय सुरू आहे. देशातील सर्वाधिक कोरोनाग्रस्त रुग्णांच्या संख्येत महाराष्ट्राचा पहिला क्रमांक लागतो. त्यात, राजधानी मुंबई अव्वलस्थानावर असून एकट्या मुंबईतील रुग्णांची संख्या 67 हजारांवर पोहोचली आहे. त्यामुळे, मुंबईतही पुन्हा लॉकडाउन लागू केला जाण्याची शक्यता नाकारण्यात येत नाही. 

तामिळनाडूत कोरोनाचा गुणाकार होताना दिसत आहे, त्यात चेन्नई येथे सर्वाधिक रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे, मेट्रोपोलियन सिटी असलेल्या चेन्नईतील जिल्ह्यात  19 ते 30 जूनपर्यंत लॉकडाउन लागू झाला आहे. चेन्नई, कांचीपूरम, चेंगलपट्टू, आणि तीरवल्लर या शहरात हा लॉकडाउन असून यास 'मैक्सिमाइज रेस्ट्रिक्टेड लॉकडाउन' असे नाव देण्यात आले आहे. चेन्नईत कोरोनाचे एकूण 44,205 रुग्ण आढळले असून गेल्या 24 तासात 1380 नवीन रुग्णांची भर पडली आहे. 

आसाममध्ये कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता, पुन्हा एकदा लॉकडाउनची चर्चा सुरु आहे. गुवाहटीच्या 11 नगरपालिका क्षेत्रात मंगळवारपासूनच 14 दिवसांसाठी लॉकडाउन लागू करण्यात आला आहे. आसाममध्ये आत्तापर्यंत 3718 एकूण रुग्ण आढळले असून त्यापैकी 1584 लोकं बरे होऊन घरी परतले आहेत. मात्र, खबरदारी म्हणून सरकारकडून लॉकडाउन करण्यात आले आहे. दरम्यान, बंगळुरुतही कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे, मुख्यमंत्री येदीयुरप्पा यांनी, ज्या भागात रुग्णांची वाढ होतेय, तेथे लॉकडाउन कडक करण्याचे निर्देश दिले आहेत. 

दरम्यान, देशातील एकूण रुग्णसंख्या आत्तापर्यंत 4,40,215 वर पोहोचली असून त्यामध्ये 1,78,014 एक्टीव्ह रुग्ण आहेत. तर जवळपास अडीच लाख रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे. दरम्यान, कोरोनामुळे देशात 14,011 जणांचा मृत्यू झाल्याची नोंद आहे.  

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याTamilnaduतामिळनाडूBengaluruबेंगळूरMumbaiमुंबई