शहरं
Join us  
Trending Stories
1
आता जर चुकाल तर संपाल, मराठी माणसांना आवाहन; उद्धवसेना-मनसे युतीची अधिकृत घोषणा
2
Shiv Sena MNS Alliance: 'शिवतीर्थ'वर राज-उद्धव! बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर संपूर्ण ठाकरे कुटुंबाचं अभिवादन
3
शिवसेनेनं 'करून दाखवलं', मनसेचं 'इंजिन' घसरलं! पाहा, मागील दोन निवडणुकांमध्ये नेमकं काय घडलं?
4
IND W vs SL W: भारताच्या 'लेडी सेहवाग'चा मोठा पराक्रम; स्मृती मानधना, दिप्ती शर्मा, जेमिमालाही टाकलं मागं!
5
'आम्ही भारतातील सर्वात मोठे फरार', ललित मोदी आणि विजय मल्ल्या यांचा सरकारवर हल्लाबोल; व्हिडीओ व्हायरल
6
सोने-चांदी-हिरे काही कमी नाही, राममूर्ती घडवायला दिले ३० कोटी; अयोध्येतील राम मंदिराला भेट दिली
7
Uddhav- Raj Thackeray PC: थोड्याच वेळात उद्धवसेना-मनसे युतीची अधिकृत घोषणा होणार; पत्रकार परिषदेकडे सगळ्यांचं लक्ष
8
कुणीही एकत्र आले तरी मुंबईत भाजपाचा महापौर बसेल; मंत्री बावनकुळेंचा ठाकरे बंधूंवर निशाणा
9
फास्ट फूडमुळे खरंच झाला विद्यार्थिनीचा मृत्यू? डॉक्टर आणि कुटुंबीयांनी सांगितलं धक्कादायक 'सत्य'
10
DCM शिंदे पोहोचले बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर; ठाकरे बंधूंच्या यूतीपूर्वी घडामोडींना वेग
11
बांग्लादेशात हिंदूंवरील अत्याचार वाढले; चिटगावमध्ये कट्टरतावाद्यांनी हिंदूंची घरे जाळली
12
Vijay Hazare Trophy स्पर्धेतील पहिल्याच सामन्यात वैभव सूर्यवंशीचा धमाका! वादळी शतकासह रचला इतिहास
13
शेतकरी ते नोकरदार... बँकिंगपासून सोशल मीडियापर्यंत 'हे' ८ नियम १ जानेवारीपासून बदलणार
14
शरद पवारांची राष्ट्रवादी ठाकरे बंधूंच्या युतीत सहभागी होणार?; बैठकीतील इनसाइड स्टोरी समोर
15
नमो भारत ट्रेनमधील 'तो' अश्लील चाळा पडणार महागात! तरुण-तरुणीवर FIR; किती शिक्षा होणार?
16
अगदी बाबाची कॉपी! वडिलांसारखीच हँडसम आहेत हृतिकची मुलं, हृदान-हृहानचे डान्स मूव्ह्ज पाहून चाहते प्रेमात
17
सुधीर मुनंगटीवार यांनी घेतली CM देवेंद्र फडणवीसांची भेट; बैठकीत काय घडले, नाराजी दूर होणार?
18
अमेरिकेत 'एपस्टीन फाइल्स'चा महास्फोट! डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर 'तसले' गंभीर आरोप; रिपोर्टने खळबळ
19
इंडिगोची 'दादागिरी' आता चालणार नाही; सरकारने दोन नवीन विमान कंपन्यांना दाखवला हिरवा कंदील
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत विक्रमी वाढ सुरुच, आज किती आहे १० ग्रॅम सोन्याचा लेटेस्ट रेट?
Daily Top 2Weekly Top 5

एलओसीजवळ पुन्हा दहशतवादी शिबिरांमध्ये वाढ

By admin | Updated: May 3, 2017 11:12 IST

भारतीय लष्कराने सप्टेंबर 2016 साली पाकव्याप्त काश्मीर येथे केलेल्या सर्जिकल स्ट्राइकनंतर ताबा रेषेलगत पाकिस्तान समर्थक दहशतवादी संघटनांच्या अड्ड्यांचा पुन्हा सुळसुळाट वाढल्याचे वृत्त समोर आले आहे.

 ऑनलाइन  लोकमत

नवी दिल्ली, दि. 3 - भारतीय लष्कराने सप्टेंबर 2016 साली पाकव्याप्त काश्मीर येथे केलेल्या सर्जिकल स्ट्राइकनंतर ताबा रेषेलगत पाकिस्तान समर्थक दहशतवादी संघटनांच्या अड्ड्यांचा पुन्हा सुळसुळाट वाढल्याचे वृत्त समोर आले आहे.  जवळपास दहशतवादी संघटनांनी 20 नवीन अड्डे उभारले आहेत, अशी माहिती भारत सरकारच्या अधिकाऱ्यांनी दिली. प्रत्यक्ष नियंत्रण रेषेला अगदी खेटून काही अड्डे अस्तित्वात असून, नवीन अड्ड्यांसह दहशतवाद्यांच्या एकूण अड्ड्यांची संख्या 35 ते 55च्या घरात पोहोचली आहे. हे सर्व अड्डे भारतविरोधी दहशतवादी कारवायांत सक्रिय आहेत. 
 
मिळालेल्या माहितीनुसार, पाकव्याप्त काश्मीरमध्ये सध्या जवळपास 55 दहशतवादी संघटनांचे प्रशिक्षण शिबिर सुरू आहेत. या शिबिरामध्ये दहशतवाद्यांना प्रशिक्षण दिले जात असून त्यांना भारतविरोधी कारवाया करण्यासाठी तयार केले जात आहे. पाकिस्तानातील वेगवेगळ्या दहशतवादी संघटना येथे आपले प्रशिक्षण शिबिर चालवत आहेत.  सप्टेंबर 2016 मध्ये भारतीय लष्कराकडून करण्यात आलेल्या सर्जिकल स्ट्राइकनंतर बिथरलेल्या 55 पैकी 35 दहशतवादी शिबिरांनी आपला गाशा गुंडाळत ठिकाणं बदलली होती. पण सध्या या दहशतवादी संघटनांनी आपला मुक्काम पुन्हा आधीच्या ठिकाणी हलवल्याचे वृत्त आहे. 
 
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, वर्ष 2017च्या सुरुवातीला 4 महिन्यांमध्ये दहशतवाद्यांनी जवळपास 60 वेळा घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला. यातील 15 दहशतवाद्यांचा भारतव्याप्त काश्मीरच्या सीमेजवळ घुसखोरी करण्याचा प्रयत्न अयशस्वी ठरला. गुप्तचर संस्थाच्या हवाल्याने माहिती देत एका अधिका-याने सांगितले की, काश्मीर खो-यात आताच्या घडीला जवळपास 160 दहशतवादी सक्रीय आहेत. या दहशतवाद्यांच्या पाकिस्तानातील म्होरक्याने त्यांना भारतीय सुरक्षा दलांविरोधात हल्ले वाढवण्याचे निर्देश दिल्याचीही माहिती आहे. दरम्यान, दहशतवाद्यांकडून काश्मीर खो-यातील तरुणांनाही त्यांच्या संघटनांमध्ये सामील करुन घेतले जात आहे. गेल्या काही महिन्यांमध्ये काश्मीर खो-यातील जवळपास 100 तरुण दहशतवादी संघटनांमध्ये सहभागी झाल्याचे म्हटले जात आहे. 
 
हाती आलेल्या माहितीनुसार, दहशतवादी संघटना सुरक्षा दलांवरील हल्ले वाढवून आपल्या सदस्यांचे मनोधैर्य वाढवण्याचा प्रयत्न करत आहेत. तर सोमवारी जम्मू-काश्मीर बँकेच्या कॅश व्हॅनवर कुलगामजवळ दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात दोन बँक कर्मचारी व पाच पोलीस असे सात जण ठार झाले. दहशतवाद्यांनी 50 लाख रुपये आणि शस्त्रे घेऊन पळ काढला. या हल्ल्याची जबाबदारी हिजबुल मुजाहिद्दीनने स्वीकारली. मात्र नंतर यासाठी हिजबुल मुजाहिद्दीनने सीआरपीएफला दोषी ठरवलं. यामागील कारण म्हणजे सीआरपीएफबाबत स्थानिक नागरिकांच्या मनात द्वेष पसरवून सीआरपीएफला खलनायक बनवणे, हा या दहशतावाद्यांचा उद्देश आहे. जेणेकरुन स्थानिक संतापल्याने ते स्वतः भारतीय जवानांविरोधात निदर्शन करुन आपला रोष व्यक्त करतील. यापूर्वी रविवारी श्रीनगरच्या खानयार पोलीस ठाण्यावर हल्लेखोरांनी ग्रेनेडचा मारा केला. त्यात चार पोलीस जखमी झाले; तर एका नागरिकाचा मृत्यू झाला.
 
दहशतवाद्यांनी पुन्हा लुटली बँक 
तर मंगळवारी (2 मे) कुलगाम जिल्ह्यात दोन दहशतवाद्यांनी पुन्हा बँक लुटल्याची घटना मंगळवारी घडली. मिळालेल्या माहितीनुसार, कुलगाम जिल्ह्यातील कादर येरीपोरा परिसरात असलेल्या इलाकाई देहाती बॅंकेत दोन दहशतवाद्यांनी दरोडा टाकला. या दरोड्यात 65, 000 रुपयांची रोकड लुटून पोबारा केला.