शहरं
Join us  
Trending Stories
1
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
2
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
3
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
4
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
5
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
6
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
7
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
8
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
9
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
10
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
11
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
12
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
13
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
14
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
15
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
16
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
17
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
18
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?
19
Air India Plane Crash: ज्या आगीत जिवंत माणसांची झाली राख, त्यात एकच मानवी अवयव वाचला
20
दिवसभर खुर्चीवर बसून वाढतंय वजन? ३०-३०-३० नियमाची जादू, लठ्ठपणाला कराल बाय-बाय

जे लोक कलम 370 हटविण्याला विरोध करतायेत त्यांची यादी बनवा अन्...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2019 14:43 IST

हळूहळू जम्मू काश्मीरमधील परिस्थिती पूर्वपदावर येईल. कलम 370 मधील काही घटक देशासाठी नुकसानकारक होते.

ठळक मुद्देमहिला, मुले, अल्पसंख्याक समुदायामधील लोकांवर काश्मीरात प्रचंड अन्याय झाला आहेज्यांनी या निर्णयाला विरोध केला त्यांनी जम्मू काश्मीरमधल्या लोकांचा आवाज ऐकला आहे का? कलम 370 आणि 35 ए मुळे जम्मू काश्मीर, लडाखला देशापासून वेगळं ठेवलं होतं.

नवी दिल्ली - मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळाला सुरुवात होऊन 100 दिवस होण्यापूर्वीच केंद्र सरकारने तीन तलाक, कलम 370 सारखे ऐतिहासिक निर्णय घेण्यात यश मिळविलं आहे. कलम 370 हटविणे हे राजकीयदृष्ट्या सर्वात मोठा विजय मानला जात आहे. काश्मीरबाबत सरकारने घेतलेल्या धाडसी निर्णयाचं सर्व स्तरातून कौतुक होत आहे. याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका न्यूज संस्थेची बोलताना विस्तृत माहिती सांगितली आहे. 

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सांगितले की, तुम्ही अशा लोकांची यादी बनवा ज्यांनी जम्मू काश्मीरमधील कलम 370 हटविण्याला विरोध केला. या यादीत तुम्हाला स्वार्थी राजकीय नेते, दहशतवाद्यांप्रती सहानभुती दाखविणारी लोकं आणि विरोधी पक्षातील काही नेते दिसतील. देशातील प्रत्येक नागरिक मग तो कोणत्याही राजकीय विचारधारेशी जोडलेला असो. प्रत्येक जण केंद्र सरकारने जम्मू काश्मीर, लडाखबाबत घेतलेल्या निर्णयाचं समर्थन करतोय. हा विषय राष्ट्राचा आहे यात राजकारणाचा भाग नाही. देशातील लोकांना हा धाडसी निर्णय वाटतो कारण आजतागायत जे अशक्य वाटत होतं ते शक्य होताना दिसत आहे. 

हळूहळू जम्मू काश्मीरमधील परिस्थिती पूर्वपदावर येईल. कलम 370 मधील काही घटक देशासाठी नुकसानकारक होते. त्यामुळे काही राजकारण्यांना आणि फुटिरतावाद्यांना मदत मिळत होती. हे स्पष्ट होतं की, कलम 370 आणि 35 ए मुळे जम्मू काश्मीर, लडाखला देशापासून वेगळं ठेवलं होतं. गेल्या 7 दशकांपासून लोकांना याचा फायदा झाला नाही. लोकांना विकासापासून वंचित ठेवण्यात आलं होतं. सर्वात मोठं नुकसान असं झालं की आजतागायत जम्मू काश्मीर, लडाखचा आर्थिक विकास झाला नाही. मात्र आता काश्मीरच्या आणि लडाखच्या विकासाला चालना मिळेल असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदींनी व्यक्त केला. 

तसेच माझ्या जम्मू काश्मीरमधील बंधू-भगिनींना उज्ज्वल भविष्य हवं आहे. मात्र कलम 370 मुळे ते शक्य नव्हतं. त्या राज्यातील महिला, मुले, अल्पसंख्याक समुदायामधील लोकांवर प्रचंड अन्याय झाला आहे. आता बीपीओपासून स्टार्टअपपर्यंत, खाद्य संस्कृतीपासून पर्यटनापर्यंत अनेक उद्योग उभारले जातील. स्थानिकांना रोजगार मिळेल, शिक्षणाच्या संधी चालून येतील असं पंतप्रधानांनी सांगितले. दरम्यान जे लोक कलम 370 हटविण्याचा विरोध करतायेत त्या लोकांनी जम्मू काश्मीरमधल्या लोकांचा आवाज ऐकला आहे का? काश्मीरमधील स्थानिक पंचायत निवडणुकांना मिळणारा प्रतिसाद लक्षात घ्या. लोकं मोठ्या प्रमाणात मतदान करण्यासाठी बाहेर आले होते. मतदान करण्यापासून रोखणारे अनेक जण होते तरीही लोकं घराबाहेर पडून मतदान करत होते. जवळपास 74 टक्के लोकांनी मतदान केलं. नोव्हेंबर, डिंसेबर 2018 मध्ये तेथील ग्रामपंचायतीत 35 हजार सरपंच निवडून आलेत असा दावाही पंतप्रधानांनी केला.     

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीArticle 370कलम 370Jammu Kashmirजम्मू-काश्मीर