शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
2
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
3
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
6
नव्या भारताकडे दहशवाद्यांना मातीत गाडण्याची अन् शत्रूला घरात घुसून संपवण्याची क्षमता- योगी आदित्यनाथ
7
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
8
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
9
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
10
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
11
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
12
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
13
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार
14
पीएम किसान योजनेच्या २०व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, असा तपासा स्टेटस
15
"अरुण जेटलींनी मला धमकावलं होतं"; राहुल गांधींच्या आरोपावर जेटलींच्या मुलाचे प्रत्युत्तर, "पर्रिकरांसोबतही तुम्ही..."
16
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले
17
शाळांना राजकारणापासून दूर ठेवा; आंध्र प्रदेश सरकारचा कौतुकास्पद निर्णय, नवी नियमावली वाचा
18
रशियाकडून कच्चं तेल खरेदी करणं बंद केलंय का? ट्रम्प यांच्या दाव्यावर भारतानं दिलं उत्तर
19
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
20
Shravan Shanivar 2025: श्रावण शनिवारी केलेले 'हे' सोपे उपाय देतात शनी पीडेपासून मुक्ती!

जे लोक कलम 370 हटविण्याला विरोध करतायेत त्यांची यादी बनवा अन्...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2019 14:43 IST

हळूहळू जम्मू काश्मीरमधील परिस्थिती पूर्वपदावर येईल. कलम 370 मधील काही घटक देशासाठी नुकसानकारक होते.

ठळक मुद्देमहिला, मुले, अल्पसंख्याक समुदायामधील लोकांवर काश्मीरात प्रचंड अन्याय झाला आहेज्यांनी या निर्णयाला विरोध केला त्यांनी जम्मू काश्मीरमधल्या लोकांचा आवाज ऐकला आहे का? कलम 370 आणि 35 ए मुळे जम्मू काश्मीर, लडाखला देशापासून वेगळं ठेवलं होतं.

नवी दिल्ली - मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळाला सुरुवात होऊन 100 दिवस होण्यापूर्वीच केंद्र सरकारने तीन तलाक, कलम 370 सारखे ऐतिहासिक निर्णय घेण्यात यश मिळविलं आहे. कलम 370 हटविणे हे राजकीयदृष्ट्या सर्वात मोठा विजय मानला जात आहे. काश्मीरबाबत सरकारने घेतलेल्या धाडसी निर्णयाचं सर्व स्तरातून कौतुक होत आहे. याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका न्यूज संस्थेची बोलताना विस्तृत माहिती सांगितली आहे. 

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सांगितले की, तुम्ही अशा लोकांची यादी बनवा ज्यांनी जम्मू काश्मीरमधील कलम 370 हटविण्याला विरोध केला. या यादीत तुम्हाला स्वार्थी राजकीय नेते, दहशतवाद्यांप्रती सहानभुती दाखविणारी लोकं आणि विरोधी पक्षातील काही नेते दिसतील. देशातील प्रत्येक नागरिक मग तो कोणत्याही राजकीय विचारधारेशी जोडलेला असो. प्रत्येक जण केंद्र सरकारने जम्मू काश्मीर, लडाखबाबत घेतलेल्या निर्णयाचं समर्थन करतोय. हा विषय राष्ट्राचा आहे यात राजकारणाचा भाग नाही. देशातील लोकांना हा धाडसी निर्णय वाटतो कारण आजतागायत जे अशक्य वाटत होतं ते शक्य होताना दिसत आहे. 

हळूहळू जम्मू काश्मीरमधील परिस्थिती पूर्वपदावर येईल. कलम 370 मधील काही घटक देशासाठी नुकसानकारक होते. त्यामुळे काही राजकारण्यांना आणि फुटिरतावाद्यांना मदत मिळत होती. हे स्पष्ट होतं की, कलम 370 आणि 35 ए मुळे जम्मू काश्मीर, लडाखला देशापासून वेगळं ठेवलं होतं. गेल्या 7 दशकांपासून लोकांना याचा फायदा झाला नाही. लोकांना विकासापासून वंचित ठेवण्यात आलं होतं. सर्वात मोठं नुकसान असं झालं की आजतागायत जम्मू काश्मीर, लडाखचा आर्थिक विकास झाला नाही. मात्र आता काश्मीरच्या आणि लडाखच्या विकासाला चालना मिळेल असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदींनी व्यक्त केला. 

तसेच माझ्या जम्मू काश्मीरमधील बंधू-भगिनींना उज्ज्वल भविष्य हवं आहे. मात्र कलम 370 मुळे ते शक्य नव्हतं. त्या राज्यातील महिला, मुले, अल्पसंख्याक समुदायामधील लोकांवर प्रचंड अन्याय झाला आहे. आता बीपीओपासून स्टार्टअपपर्यंत, खाद्य संस्कृतीपासून पर्यटनापर्यंत अनेक उद्योग उभारले जातील. स्थानिकांना रोजगार मिळेल, शिक्षणाच्या संधी चालून येतील असं पंतप्रधानांनी सांगितले. दरम्यान जे लोक कलम 370 हटविण्याचा विरोध करतायेत त्या लोकांनी जम्मू काश्मीरमधल्या लोकांचा आवाज ऐकला आहे का? काश्मीरमधील स्थानिक पंचायत निवडणुकांना मिळणारा प्रतिसाद लक्षात घ्या. लोकं मोठ्या प्रमाणात मतदान करण्यासाठी बाहेर आले होते. मतदान करण्यापासून रोखणारे अनेक जण होते तरीही लोकं घराबाहेर पडून मतदान करत होते. जवळपास 74 टक्के लोकांनी मतदान केलं. नोव्हेंबर, डिंसेबर 2018 मध्ये तेथील ग्रामपंचायतीत 35 हजार सरपंच निवडून आलेत असा दावाही पंतप्रधानांनी केला.     

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीArticle 370कलम 370Jammu Kashmirजम्मू-काश्मीर