शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
4
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
5
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
6
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
7
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
8
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
9
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
10
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
11
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
12
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
13
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
14
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
15
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
16
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
17
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
18
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
19
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
20
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
Daily Top 2Weekly Top 5

ऑन लाईन नोंदणीत चोपडा व शिरपूरचे काम चांगले एकनाथ डवले : टंचाई निवारणासाठी पाण्याचे स्त्रोत शोधण्याची सूचना

By admin | Updated: February 5, 2016 00:33 IST

जळगाव : ऑन लाईन नोंदणीसाठी चोपडा व शिरपूर या दोन तालुक्यांनी उत्तम काम केले आहे. उर्वरित तालुक्यांमधील कामांतील तांत्रिक दोष दूर करून लवकरच संगणकीकरण केले जाईल अशी माहिती विभागीय आयुक्त एकनाथ डवले यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.

जळगाव : ऑन लाईन नोंदणीसाठी चोपडा व शिरपूर या दोन तालुक्यांनी उत्तम काम केले आहे. उर्वरित तालुक्यांमधील कामांतील तांत्रिक दोष दूर करून लवकरच संगणकीकरण केले जाईल अशी माहिती विभागीय आयुक्त एकनाथ डवले यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
३१ मार्चपर्यंत शेतरस्ते मोकळे करा
जिल्ह्यात अनेक ठिकाणी शेतरस्ते मोकळे करण्याबाबतच्या केसेस प्रलंबित आहेत. प्रातांधिकारी व तहसीलदार यांच्याकडे प्रलंबित असलेले हे प्रकरणे ३१ मार्चपर्यंत निकाली काढण्यास सांगितले आहे. भविष्यात पाणी टंचाईची स्थिती भीषण होणार आहे.त्यामुळे टंचाई निवारणासाठी पाण्याचे स्त्रोत उपलब्ध करणे, विहिर अधिग्रहण व नवीन विंधन विहिर तयार करणे यासारख्या उपाययोजना करण्याची सूचना केली आहे.

जलयुक्तची ७० कोटींची कामे शक्य
जलयुक्त शिवार योजनेत २३२ गावांचा समावेश आहे. या गावांमध्ये १६८ कोटी रुपयांच्या कामांचे नियोजन आहे. सद्यस्थितीला ८० कोटींचे कामे पूर्ण झाली आहेत. मार्च अखेर ६० ते ७० कोटींचे कामे पूर्ण होणे अपेक्षित आहेत. शेततळे, नाला खोलीकरण यासारखी कामे लोकसहभागातून करण्यावर भर देण्याची सूचना केल्याचे त्यांनी सांगितले.

अतिक्रमण काढण्याचा निर्णय जिल्हाधिकारी घेतील
यावल येथील अतिक्रमण काढत असताना नगराध्यक्ष व मुख्याधिकारी यांच्या अंगावर रॉकेल फेकून त्यांना जाळण्याचा प्रयत्न झाला. मुख्याधिकारी सोमनाथ आढाव यांच्या आम्ही पूर्ण पाठीशी आहोत. या प्रकरणी आरोपींवर कठोर कारवाईबाबत पोलिसांना आवश्यक त्या सूचना आपण केल्या आहेत. यावलसह अन्य नगरपालिका क्षेत्रातील अतिक्रमणधारकांवर कारवाईचे अधिकार हे जिल्हाधिकारी यांना आहेत. त्यामुळे त्यावर त्या कारवाई करतील असे त्यांनी सांगितले.

रावेर व यावल तालुक्याचे काम पूर्ण
जिल्‘ातील नागरिकांना ऑन लाईन सातबारा उतारा मिळावा यासाठी संगणकीकरणाचे काम सुरू आहेत. यात रावेर व यावल तालुक्याचे काम पूर्ण झाले आहे. उर्वरित तालुक्यांमधील कामाची चांगली प्रगती आहे. संगणीकरणाबाबत असलेले तांत्रिक दोष दूर करून काम पूर्ण करण्यात येईल असे त्यांनी सांगितले.

वाळू चोरांवर लवकरच कारवाई
वाळू चोरांवर एमपीडीएच्या कारवाईसाठी प्रातांधिकार्‍यांना रेकॉर्ड काढण्याचे आदेश दिले आहे. जिल्हाधिकार्‍यांनी त्यानुसार दोन ते तीन जणांचे प्रस्ताव मागविले आहे. येत्या काही दिवसांत वाळू चोरांवर कारवाई करण्यात येईल. यासोबतच वाळू लिलावाला प्रतिसाद न मिळालेल्या गटांची अपसेट प्राईज २५ टक्क्यांनी कमी करण्याबाबत लवकरच निर्णय घेण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.