शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
3
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
4
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
5
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
6
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
7
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
8
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
9
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
10
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
11
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
12
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
13
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
14
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
15
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
16
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
17
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
18
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
19
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
20
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प

पहिलवानासारखा रिगणात उतरणार!

By admin | Updated: February 14, 2015 00:43 IST

आपला विजय अथवा पराभव याबाबत अजिबात भीती न बाळगता आपण एका पहिलवानासारखे रिंगणात उतरणार, असे सांगत बिहारचे मुख्यमंत्री जितनराम मांझी

पाटणा : आपला विजय अथवा पराभव याबाबत अजिबात भीती न बाळगता आपण एका पहिलवानासारखे रिंगणात उतरणार, असे सांगत बिहारचे मुख्यमंत्री जितनराम मांझी यांनी २० फेब्रुवारीला आपले सरकार विश्वासदर्शक प्रस्ताव जिंकणारच, असा विश्वास व्यक्त केला आहे. ते पत्रकारांशी बोलत होते. ‘प्रतिस्पर्धी किती बलवान आहे आणि मी जिंकणार की हरणार याची अजिबात चिंता न करता एखाद्या पहिलवानासारखा मी रिंगणात उतरणार आहे. समाजातील गरीब आणि दुर्बल घटकांच्या कल्याणासाठी मी उभा आहे, असे भावनिक भाषण मी आमदारांसमोर करणार आहे. तुम्ही माझ्याशी सहमत असाल तर माझ्या सोबत या आणि मला पुरेसा प्रतिसाद मिळाला नाही, तर मी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देईन,’ असे मांझी म्हणाले. भाजपचा पाठिंबा मिळणार का, असे विचारले असता मांझी म्हणाले की, ‘मी एकटाच उभा आहे. गरीब आणि दुर्बल लोकांसाठी यापुढेही काम करू द्या, हे माझे आवाहन स्वीकार करण्याची नम्र विनंती मी सर्व पक्षांच्या आमदारांना करणार आहे. लोकांची सेवा करण्याच्या उद्देशाने मी राजकारणात आलो.’बिहारमध्ये घोडेबाजार होत असल्याचा आरोप नितीशकुमार यांनी केला आहे. त्याकडे लक्ष वेधले असता मांझी म्हणाले की, ‘मी गरीब आणि कंगाल माणूस आहे. माझ्याजवळ घोडेबाजारासाठी पैसा नाही. खरे पाहता तेच (नितीशकुमार गट) आमदारांना दिल्लीला नेऊन आणि त्यांना आलिशान हॉटेलात ठेवून घोडेबाजार करीत आहेत. दिल्ली प्रवासात प्रत्येक आमदारावर एक लाख रुपये खर्च करण्यात आला आहे.’ नितीशकुमारांनी घोडचूक केली!मांझी यांना मुख्यमंत्री बनवून आपण चूक केली असे नितीशकुमार सांगत आहेत; परंतु त्यांनी चूक नाही तर घोडचूक केली, असे मांझी यांनी म्हटले आहे. ‘मी त्यांच्या हातचे बाहुले बनून वागेन, असे गृहीत धरणे हीच त्यांची घोडचूक होती. गरीब असलो तरी स्वाभिमानी आहे. (वृत्तसंस्था)