शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते विधान राहुल गांधींचे नाही, मी परस्परच..."; वकिलाचा यू-टर्न, जिवाला धोका असल्याच्या वक्तव्याबद्दल काय बोलले?
2
Arjun Tendulkar Engagement :अर्जुन तेंडुलकरची होणारी बायको, साराची खास मैत्रिण; सानिया चांडोकचे फोटो पाहा
3
Arjun Tendulkar Engagement : चांडोकांची लेक होणार सचिन तेंडुलकरची सून; मुंबईत पार पडला अर्जुन सानियाचा साखरपुडा
4
पुण्यात वाहतूक पोलीस आणि कॅब चालक यांच्यात वाद; शिवीगाळ करत मारहाण केली; व्हिडीओ व्हायरल
5
कबुतरखाने प्रकरणात राज ठाकरेंना साकडे; पण बाळा नांदगावकर स्पष्टच बोलले, कुणाला सुनावले?
6
धक्कादायक! जमिनीच्या वादातून भर चौकात नवरा-बायकोला संपवले; कोयत्याने वार
7
महायुतीत समन्वय समितीच्या बैठका वेळेवर होत नाही, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे नी दिली कबुली
8
'आमचे कोणतेही लष्करी मित्र नाहीत, फक्त भारतीय नौदलाकडे धाडस'; फिलिपिन्सच्या राजदूतांची पाश्चात्य देशांवर टीका
9
Fatehpur Tomb Controversy: ज्यांच्या मकबऱ्यामध्ये मंदिर असल्याचा दावा, ते नवाब अब्दुल समद कोण?
10
RR नं संजूच्या बदल्यात जड्डू अन् ऋतुराजला मागितले! CSK ला ते अजिबात नाही पटलं; ट्रेड डील फिस्कटली
11
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
12
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
13
गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांना खुशखबर! मुंबई-गोवा महामार्गाबाबत धडक कारवाईचे आदेश
14
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
15
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
16
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
17
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
18
चहलला जळवण्यासाठी बिग बॉस विनरसोबत थिरकली धनश्री? व्हायरल व्हिडिओ मागची गोष्ट
19
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
20
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 

पहिलवानासारखा रिगणात उतरणार!

By admin | Updated: February 14, 2015 00:43 IST

आपला विजय अथवा पराभव याबाबत अजिबात भीती न बाळगता आपण एका पहिलवानासारखे रिंगणात उतरणार, असे सांगत बिहारचे मुख्यमंत्री जितनराम मांझी

पाटणा : आपला विजय अथवा पराभव याबाबत अजिबात भीती न बाळगता आपण एका पहिलवानासारखे रिंगणात उतरणार, असे सांगत बिहारचे मुख्यमंत्री जितनराम मांझी यांनी २० फेब्रुवारीला आपले सरकार विश्वासदर्शक प्रस्ताव जिंकणारच, असा विश्वास व्यक्त केला आहे. ते पत्रकारांशी बोलत होते. ‘प्रतिस्पर्धी किती बलवान आहे आणि मी जिंकणार की हरणार याची अजिबात चिंता न करता एखाद्या पहिलवानासारखा मी रिंगणात उतरणार आहे. समाजातील गरीब आणि दुर्बल घटकांच्या कल्याणासाठी मी उभा आहे, असे भावनिक भाषण मी आमदारांसमोर करणार आहे. तुम्ही माझ्याशी सहमत असाल तर माझ्या सोबत या आणि मला पुरेसा प्रतिसाद मिळाला नाही, तर मी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देईन,’ असे मांझी म्हणाले. भाजपचा पाठिंबा मिळणार का, असे विचारले असता मांझी म्हणाले की, ‘मी एकटाच उभा आहे. गरीब आणि दुर्बल लोकांसाठी यापुढेही काम करू द्या, हे माझे आवाहन स्वीकार करण्याची नम्र विनंती मी सर्व पक्षांच्या आमदारांना करणार आहे. लोकांची सेवा करण्याच्या उद्देशाने मी राजकारणात आलो.’बिहारमध्ये घोडेबाजार होत असल्याचा आरोप नितीशकुमार यांनी केला आहे. त्याकडे लक्ष वेधले असता मांझी म्हणाले की, ‘मी गरीब आणि कंगाल माणूस आहे. माझ्याजवळ घोडेबाजारासाठी पैसा नाही. खरे पाहता तेच (नितीशकुमार गट) आमदारांना दिल्लीला नेऊन आणि त्यांना आलिशान हॉटेलात ठेवून घोडेबाजार करीत आहेत. दिल्ली प्रवासात प्रत्येक आमदारावर एक लाख रुपये खर्च करण्यात आला आहे.’ नितीशकुमारांनी घोडचूक केली!मांझी यांना मुख्यमंत्री बनवून आपण चूक केली असे नितीशकुमार सांगत आहेत; परंतु त्यांनी चूक नाही तर घोडचूक केली, असे मांझी यांनी म्हटले आहे. ‘मी त्यांच्या हातचे बाहुले बनून वागेन, असे गृहीत धरणे हीच त्यांची घोडचूक होती. गरीब असलो तरी स्वाभिमानी आहे. (वृत्तसंस्था)