शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरे सोबत आले, तर शिवसेना (UBT) इंडिया आघाडीतून बाहेर पडणार का? उद्धव ठाकरे म्हणाले...
2
'तुमच्याकडे पुरावे आहेत, न्यायालयात का जात नाही?', राहुल गांधींच्या आरोपांवर भाजपचा पलटवार
3
राहुल गांधींनी उल्लेख केलेला आदित्य श्रीवास्तव खरोखरच ३ राज्यांत मतदार आहे? समोर आली अशी माहिती  
4
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
5
Asia Cup 2025 मध्ये IND vs PAK सामना रद्द होणार का? दुबईतून आली मोठी अपडेट
6
या पाच कारणांमुळे डोनाल्ड ट्रम्प भडकलेत; म्हणून भारतावर कर लावलेत
7
येसूबाई अन् 'शंभुराज'! प्राजक्ता गायकवाडचा झाला साखरपुडा; होणाऱ्या नवऱ्यासोबत फोटोशूट
8
VIDEO : सॉरी सॉरी...! वैभव सूर्यवंशीची पॉवर; गोळीच्या वेगानं मारला चेंडू; बचावासाठी कॅमेरामनची 'कसरत'
9
ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सॅमसंगने आणलाय 5G फोन, किंमतही कमी!
10
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मोठा घोटाळा, राहुल गांधी यांनी सादर केले पुरावे, मतदार यादीतील घोळ केला उघड   
11
धुळ्यात ईव्हीएम स्ट्राँगरूम बाहेर ड्युटीवर असताना पोलिसाने स्वतःवरच झाडली गोळी
12
संजू सॅमसन राजस्थानची साथ सोडणार, मॅनेजमेंटकडे रिलीज करण्याची विनंती; पण नियम काय सांगतो?
13
"राहुल गांधी यांचा हा करंटेपणा, त्यांना..."; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे का संतापले?
14
मंदिरात आला, पिंडीवर जल अर्पण केले, हात जोडले आणि तिथली भांडी चोरली, सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाली चोरी
15
Asia Cup 2025 Hockey : पाकिस्तानची माघार; भारतात येऊन खेळण्यास दिला नकार, आता...
16
नागरिकांचं आरोग्य महत्त्वाचं, आदेशाचा अवमान करू नका; मुंबई उच्च न्यायालयाने पिळले कान
17
प्रेमाच्या नादात नातंच विसरले! २ मुलांच्या आईने भाच्याशी केलं लग्न, नवऱ्याला पाठवले फोटो
18
Aisa Cup 2025: सूर्यकुमार यादव संघात नसेल तर कर्णधार कोण? 'या' ३ खेळाडूंमध्ये चुरशीची स्पर्धा
19
कुबेरेश्वर धाममध्ये आणखी ३ भाविकांचा मृत्यू; आतापर्यंत ७ जणांनी गमावला जीव, कारण काय..?
20
रशियाचे राष्ट्राध्यक्ष भारतात येणार, ट्रम्प यांच्या 'दबावतंत्रा'वर मोदी-पुतीन तोडगा काढणार!

बंगळुरूत जनजीवन आले पूर्वपदावर; संचारबंदी उठविली

By admin | Updated: September 15, 2016 03:01 IST

कावेरीच्या पाण्यावरून झालेल्या हिंसाचारानंतर बुधवारी परिस्थिती सुधारल्यामुळे बंगळुरूसह सर्व १६ पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील संचारबंदी उठविण्यात आली

बंगळुरू : कावेरीच्या पाण्यावरून झालेल्या हिंसाचारानंतर बुधवारी परिस्थिती सुधारल्यामुळे बंगळुरूसह सर्व १६ पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील संचारबंदी उठविण्यात आली. व्यावसायिक प्रतिष्ठाने, शाळा-महाविद्यालये उघडण्यासह रस्ता वाहतूक आणि मेट्रो सेवाही सुरू झाली आहे. सकाळी ९ वाजता संचारबंदी उठविण्यात आल्यानंतर देशाच्या या आयटी राजधानीतील जनजीवन पुन्हा पूर्वपदावर आले. मात्र, बंगळुरूत जमावबंदी लागूच राहील, असे पोलीस अधिकाऱ्याने सांगितले. तामिळनाडूत कानडी लोक आणि त्यांच्या मालमत्तांवर हल्ले झाल्याचे वृत्त आल्यानंतर बंगळुरूत हिंसाचार उफाळला. सर्वोच्च न्यायालयाने ५ सप्टेंबर रोजीच्या आपल्या आदेशात बदल करीत कर्नाटकने तामिळनाडूला २० सप्टेंबरपर्यंत १२,००० क्युसेक पाणी सोडावे, असे निर्देश दिले होते. कर्नाटकचे गृहमंत्री जी. परमेश्वरा यांनी हिंसाचारग्रस्त भागांचा बुधवारी दौरा केला. कावेरी वादावरून कर्नाटकात तामिळींवर झालेल्या हल्ल्यांच्या विरोधात तामिळनाडूच्या विविध व्यापारी आणि शेतकरी संघटनांनी १६ सप्टेंबर रोजी राज्यव्यापी बंदची हाक दिली असून, द्रमुकसह विरोधी पक्षांनी या बंदला बुधवारी पाठिंबा दिला. (वृत्तसंस्था)