शहरं
Join us  
Trending Stories
1
Bihar CM: मुख्यमंत्री कोण? एनडीएमध्ये चर्चा सुरूच; बिहारच्या नेतृत्वाबाबत गूढ कायम!
2
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेेंबर २०२५: आर्थिक लाभ होतील, मित्र व स्नेह्यांची भेट आनंददायी राहील.
3
पाकिस्तानची सौदी अरेबियानंतर आता आणखी एका मुस्लिम देशाशी हातमिळवणी? नवा 'प्लॅन' काय?
4
Kalyan: रेल्वेतून पडून जखमी; डॉक्टरांनी घरी पाठवले, काही तासांत मृत्यू!
5
ड्रायव्हिंग टेस्ट फक्त नावापुरती! मुंबई RTO मध्ये स्टिअरिंगवर हात ठेवताच मिळतंय लायसन्स
6
JJ Hospital: जेजे रुग्णालयाची कॅन्सर रुग्णांसाठी ११ एकर जागेची मागणी!
7
Mumbai: मुंबईत मोठी दुर्घटना! भायखळा येथे बांधकाम सुरू असताना माती कोसळली; २ ठार, ३ जखमी
8
Court: राजकारण्यांवरील खटल्यांचा निपटारा करा! महाराष्ट्र, गोव्यातील ४७८ प्रकरणांवर हायकोर्टाचे आदेश
9
Congress: ठाकरेंना मोठा धक्का! काँग्रेसची 'एकला चलो'ची घोषणा; मुंबई महानगरपालिका स्वबळावर लढणार
10
Akasa Air: नवी मुंबई विमानतळामुळे प्रवाशांना दिलासा; ख्रिसमसपासून दिल्ली, गोवासह ४ शहरांसाठी थेट सेवा
11
Vasai: बालदिनीच क्रूर शिक्षा! शाळेत उशिरा आली म्हणून १०० उठाबशा, विद्यार्थिनीचा दुर्दैवी मृत्यू
12
अमेरिकेत महागाई वाढली, डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफवर घेतला यू-टर्न; भारताला मोठा फायदा होणार
13
लालू प्रसाद यादवांच्या मुलीचा खळबळजनक आरोप! रोहिणी म्हणाल्या "तेजस्वीने मला घरातून बाहेर..."
14
Rohini Aacharya: लालू प्रसाद यादवांच्या घरात ज्यांच्यामुळे सुरू झालं 'महाभारत', ते संजय यादव कोण?
15
एका वर्षात तिसरी वेळ! भारताच्या शेजारी देशात सापडली तब्बल १००० टन सोन्याची खाण, कोणता आहे देश?
16
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आज कराडात! सातारा जिल्ह्यामधील महाविकास आघाडी बाबत होणार निर्णय?
17
मुंबईत मोठी दुर्घटना! भायखळ्यातील बांधकाम सुरू असलेल्या इमारतीजवळ मातीचा ढिगारा कोसळला; २ मजुरांचा मृत्यू, ३ जखमी
18
IPL 2026 : अय्यरसह मसल पॉवर रसेल OUT! मिनी लिलावासाठी शाहरुखच्या KKR च्या पर्समध्ये सर्वाधिक पैसा
19
इराण देशभरातील लोकांच्या मोबाईल फोनवर 'इमरजन्सी अलर्ट' का पाठवत आहे?
20
IPL 2026: प्रितीच्या पंजाबनं ग्लेन मॅक्सवेलला दाखवला ठेंगा! कोच रिकी पाँटिंगनं सांगितली आतली गोष्ट
Daily Top 2Weekly Top 5

याच व्यासपीठावरून गर्जना करू; राकेश टिकैत यांचे आव्हान

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2021 15:50 IST

Rakesh Tikait : शेतकरी आंदोलनाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे वय गाठले. अर्थात आज ७० दिवस झालेत. परंतु मोदी सरकार अद्याप तोडगा काढू शकले नाही. आता तर या आंदोलनात पुन्हा चैतन्य आले आहे.

- विकास झाडेनवी दिल्ली - शेतकरी आंदोलनाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे वय गाठले. अर्थात आज ७० दिवस झालेत. परंतु मोदी सरकार अद्याप तोडगा काढू शकले नाही. आता तर या आंदोलनात पुन्हा चैतन्य आले आहे. गाजीपूर, सिंघू आणि टिकरी सीमांवर दिवसेंदिवस गर्दी वाढत आहे. संयुक्त किसान मोर्चाने उद्या ६ फेब्रुवारीला देशभर चक्का जाम करण्याचा निर्णय घेतला आहे. तर राकेश टिकैत यांनी आम्ही याच व्यासपीठावरून गर्जना करू हिंमत असेल तर अडवा, असे सरकारला आव्हान दिले.गेल्या सहा दिवसांमध्ये आंदोलनाचे संपूर्ण चित्र बदलले आहे. २६ जानेवारीला झालेल्या घटनेला जबाबदार धरल्याने शेतकरी पुन्हा पेटून उठले आहेत. आंदोलक शेतकऱ्यांमध्ये सरकारबाबत प्रचंड रोष असून यापुढचे आंदोलन अत्यंत विचारपूर्वक करण्याचा निर्णय संयुक्त किसान मोर्चाने घेतला आहे. खा. सुप्रिया सुळे आणि त्यांच्या समवेत दहा विरोधी पक्षातील १५ सदस्य आज सकाळी शेतकऱ्यांना भेटण्यासाठी गाजीपूर सीमेवर गेले; परंतु त्यांचा मार्ग चुकला. पोलिसांनी उभारलेल्या अडथळ्यांच्या ठिकाणी त्यांची बस पोहचली त्यामुळे त्यांना आंदोलनस्थळी पोहचता आले नाही.  शेतकऱ्यांच्या समस्या या नेत्यांनी ऐकूण घेतल्यात. शिवाय लोकसभेत या विषयावर आवाज उठवणार असल्याचे आश्वासन खा. सुळे यांनी दिल्याचे संदीप गिड्डे पाटील यांनी सांगितले. नव्या कृषी कायद्यांचे अमेरिकेने केले समर्थनवॉशिंग्टन : नव्या कृषी कायद्यांना अमेरिकेने पाठिंबा दिला आहे. या कायद्यांमुळे भारतीय बाजारपेठेची कार्यक्षमता वाढण्यास मदत होईल, असेही त्या देशाने म्हटले आहे.  अमेरिकेच्या परराष्ट्र खात्याने म्हटले आहे की, या कृषी कायद्यांमुळे भारतात मोठ्या प्रमाणावर खासगी गुंतवणूक येण्यासही मदत होणार आहे.  शांततापूर्ण पद्धतीने चाललेली निदर्शने हे कोणत्याही लोकशाही देशाचे वैशिष्ट्य आहे. या कायद्यांबाबत असलेल्या मतभेदांवर संबंधित लोक चर्चेच्या माध्यमातून तोडगा काढू शकतात. भारताच्या सर्वोच्च न्यायालयानेही असेच म्हटले आहे. अमेरिकेने म्हटले आहे की, भारतीय बाजारपेठेची कार्यक्षमता वाढविण्यासाठी घेतलेल्या निर्णयाचे आम्ही स्वागतच करतो. 

टॅग्स :rakesh tikaitराकेश टिकैतFarmers Protestशेतकरी आंदोलन