शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांनी हमासला दिला निर्वाणीचा इशारा, म्हणाले, आता आणखी उशीर नको, अन्यथा...
2
“२०२७मध्ये गोव्यात ‘आप’ स्वबळावर सरकार स्थापन करेल”: अरविंद केजरीवाल; भाजपा-काँग्रेसवर टीका
3
युरोपपर्यंत पोहोचले बंडाचे वारे, या देशात आंदोलक रस्त्यावर, राष्ट्रपती भवनाला घेराव, पोलिसांसोबत संघर्ष
4
आणखी एका मुलीने गमावला जीव, मृतांचा आकडा १० वर; काँग्रेसची ५० लाख भरपाई देण्याची मागणी
5
रोहित शर्माच्या कप्तानीसोबत या दोन सिनियर खेळाडूंच्या वनडे कारकिर्दीलाही निवड समितीने दिला पूर्णविराम? 
6
केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह यांचे शिर्डी विमानतळावर आगमन
7
आयटीनंतर ॲाटो क्षेत्रातही कर्मचारी कपात, ही कंपनी ३००० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार   
8
“RSS-BJPने ओबीसींचा घात केला, मोहन भागवत कधी गजानन महाराजांच्या दर्शनाला गेले का”: आंबेडकर
9
टॉपर तरुणीला गुंगीचे औषध देऊन अत्याचार; स्वतःला संपवायला निघालेल्या माय-लेकीला माजी सैनिकाने वाचवलं
10
"भारत माझी मातृभूमी, तर पाकिस्तान…’’, दानिश कनेरियाचं मोठं विधान, नागरिकत्वाबाबत म्हणाला  
11
...तर रोहित-विराटवर वनडे वर्ल्ड कप स्पर्धेआधीच निवृत्ती घेण्याची वेळ येणार?
12
भारतीय तरुणांना फसवून सायबर गुन्ह्यांसाठी जुंपणारी आंतरराष्ट्रीय टोळी उघडकीस; दोघे अटकेत, भारतीय आरोपींसह चिनी कनेक्शन आले समोर 
13
बिहारमध्ये लालू यादवांच्या निवासस्थांनी उमेदवारीवरून गोंधळ, घरात घुसले कार्यकर्ते, म्हणाले, आम्हाला...  
14
पावसाच्या 'बॅटिंग'च्या जोरावर श्रीलंकेनं उघडलं खातं; पाकला पराभूत करताच टीम इंडिया होईल टॉपर
15
अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्याची गोळ्या घालून हत्या; शिक्षणासोबत पेट्रोल पंपावर करत होता पार्ट-टाईम काम
16
“राहुल गांधी यांचा पासपोर्ट जप्त करावा अन् कायदेशीर कारवाई करावी”; भाजपा नेत्यांची मागणी
17
रोहित शर्माने कप्तानी सोडली की त्याला हटवलं? निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
18
निसर्ग अशांतच! अतिवृष्टीनंतर आता ‘शक्ती’ चक्रीवादळाचा धोका; किनारपट्टी भागात सतर्कतेचा इशारा
19
वनडे क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार; रोहित शर्मा दुसरा, मग पहिला कोण?
20
फर्रुखाबादमधील कोचिंग सेंटरमध्ये भीषण स्फोट; एकाचा मृत्यू, सहा जण जखमी

सहा महिन्यांत दहशतवाद नष्ट करू

By admin | Updated: October 5, 2016 05:45 IST

पाकव्याप्त काश्मीरमध्ये असलेल्या दहशतवाद्यांच्या तळांची फार मोठी हानी सलग सहा महिने मोहीम राबवून करता येऊ शकेल, असे भारताच्या सशस्त्र दलांनी राजकीय नेतृत्वाला सांगितले आहे.

नवी दिल्ली : पाकव्याप्त काश्मीरमध्ये असलेल्या दहशतवाद्यांच्या तळांची फार मोठी हानी सलग सहा महिने मोहीम राबवून करता येऊ शकेल, असे भारताच्या सशस्त्र दलांनी राजकीय नेतृत्वाला सांगितले आहे. लष्कराच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर दिलेली माहिती अशी की, गेल्या आठवड्यात भारताने पाकव्याप्त काश्मीरमध्ये जाऊन दहशतवाद्यांचे तळ नष्ट केले व ३८ दहशतवाद्यांना ठार मारले. हे असे हल्ले अधूनमधून केले तरी त्यामुळे दहशतवाद्यांच्या क्षमतेचे नुकसान होणार नाही तर त्यासाठी मध्यम मुदतीच्या योजनेची गरज आहे, असे राजकीय नेतृत्वाला सांगितले आहे.

सशस्त्र दलांतील वरिष्ठ व्यूहरचनाकारानेही सरकारने काश्मीरमध्ये सर्जिकल आॅपरेशनचे पडसाद उमटतील म्हणून तयार राहावे, असे सांगितले. रविवारी बारामुल्लातील सीमा सुरक्षा दलाच्या छावणीवर दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. देशात इतरत्रही असे हल्ले होऊ शकतात. सर्जिकल आॅपरेशनसारख्या हल्ल्यांसाठी दहशतवाद्यांचे तळही लक्ष्य करणे गरजेचे आहे व त्यासाठी निश्चयाने मोहीम राबवावी लागेल, असे हा अधिकारी म्हणाला.

दहशतवाद्यांचे नेटवर्क आता दोन पावले मागे गेले असले तरी खरोखर काही साध्य करायचे असेल तर मध्यम मुदतीची म्हणजे सहा महिन्यांची मोहीम राबवावी लागेल. एखाद्या हल्ल्याने त्यांना रोखता येणार नाही, असे हा अधिकारी म्हणाला. सर्जिकल आॅपरेशनचा सूड घेण्यास पाकमध्ये असलेल्या व दहशतवाद्यांना हाताळणाऱ्यांकडून येत्या आठवड्यांत आणखी जास्त दहशतवादी घुसविण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो, असे भारताच्या जनरल्संना वाटते. (लोकमत न्यूज नेटवर्क)