शहरं
Join us  
Trending Stories
1
बेस्ट निवडणूक २०२५: ना ठाकरे बंधू, ना भाजपा; शशांक राव यांच्या पॅनलला १४ जागा, आकडेवारी पाहाच
2
'ब्रँडचे बॉस एकही जागा जिंकले नाहीत'; बेस्ट निवडणुकीतील पराभवावरुन ठाकरे बंधूंना भाजपचा टोला
3
महाराष्ट्र जलमय... पिके खरडली, घरे बुडाली; मराठवाड्यात ११ जीव गेले, ४९८ जनावरे दगावली
4
पंतप्रधान, मुख्यमंत्री असो अथवा मंत्री...; ३० दिवसांपेक्षा अधिक काळ तुरुंगात राहिल्यास खुर्ची जाणार! आज संसदेत ३ विधेयकं सादर होणार
5
आजचे राशीभविष्य, २० ऑगस्ट २०२५: नवीन कार्याच्या प्रारंभात अडचणी; व्यवसायात अपेक्षित सहकार्य
6
थकबाकी तिप्पट, व्याज चार पट; सरकारवर वाढतोय कर्जाचा डोंगर; सध्याची रक्कम २०० लाख कोटींवर
7
मुंबईची 'लाइफ'लाइन पाण्यात; रायगड, पुणे परिसराला आजही 'रेड अलर्ट', नांदेड जिल्ह्यात आठ बळी
8
पावसाची दहशत! ८००हून जास्त लोकल रद्द; २५०+ विमानांना फटका, भुयारी मेट्रो स्थानकांवर पाणीगळती
9
काच फोडून मोनोचे प्रवासी बाहेर! 'एवढेच व्हायचे बाकी होते', प्रवाशांच्या संतप्त प्रतिक्रिया
10
वाहतूक बंद, साचले पाणी; परिस्थितीचा गैरफायदा घेत ॲप आधारित खासगी वाहनांची मनमानी भाडेवाढ
11
सोन्याचे दागिने ‘एसआयपी’वर घ्यावे का? पैसे भरताना ज्वेलरची बाजारातील पतही तपासा
12
मिठी नदी धोका पातळीपर्यंत; रहिवाशांचा गोंधळ; गर्दी नियंत्रित करताना यंत्रणेच्या नाकीनऊ
13
४२,८९२ कोटींची गुंतवणूक, २५,८९२ रोजगाराची निर्मिती; १० गुंतवणूक सामंजस्य करारांवर स्वाक्षरी
14
ऑनलाइन गेमिंगला बसणार चाप! विधेयकाला केंद्राची मंजुरी; पैसे ट्रान्सफर करण्यास बँकांना मनाई
15
‘लोकमत’कडून नमामी गंगे प्रकल्पासाठी ५७.५० लाखांचा निधी; देवेंद्र दर्डा यांनी दिला धनादेश
16
ज्याला दिलं हृदय त्यानेच घेतला जीव! प्रेमविवाह करणाऱ्या अंजलीचा शेवट कसा झाला?; आरोपी पतीला अटक
17
खासदार श्रीकांत शिंदेंच्या बंगल्यातही शिरलं पाणी; विकासकामांवर बोलायचं नाही, मनसेचा खोचक टोला
18
Mumbai Rain Updates Live: शाळा-कॉलेजला २० ऑगस्टला सुट्टी जाहीर केल्याचा मेसेज खोटा - BMC
19
जग पाहण्याआधीच बाळाचा जीव गेला, आईनं गमावलं लेकरू; महाराष्ट्रात आरोग्य सेवेचे धिंडवडे निघाले
20
School Holiday: मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा

सहा महिन्यांत दहशतवाद नष्ट करू

By admin | Updated: October 5, 2016 05:45 IST

पाकव्याप्त काश्मीरमध्ये असलेल्या दहशतवाद्यांच्या तळांची फार मोठी हानी सलग सहा महिने मोहीम राबवून करता येऊ शकेल, असे भारताच्या सशस्त्र दलांनी राजकीय नेतृत्वाला सांगितले आहे.

नवी दिल्ली : पाकव्याप्त काश्मीरमध्ये असलेल्या दहशतवाद्यांच्या तळांची फार मोठी हानी सलग सहा महिने मोहीम राबवून करता येऊ शकेल, असे भारताच्या सशस्त्र दलांनी राजकीय नेतृत्वाला सांगितले आहे. लष्कराच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर दिलेली माहिती अशी की, गेल्या आठवड्यात भारताने पाकव्याप्त काश्मीरमध्ये जाऊन दहशतवाद्यांचे तळ नष्ट केले व ३८ दहशतवाद्यांना ठार मारले. हे असे हल्ले अधूनमधून केले तरी त्यामुळे दहशतवाद्यांच्या क्षमतेचे नुकसान होणार नाही तर त्यासाठी मध्यम मुदतीच्या योजनेची गरज आहे, असे राजकीय नेतृत्वाला सांगितले आहे.

सशस्त्र दलांतील वरिष्ठ व्यूहरचनाकारानेही सरकारने काश्मीरमध्ये सर्जिकल आॅपरेशनचे पडसाद उमटतील म्हणून तयार राहावे, असे सांगितले. रविवारी बारामुल्लातील सीमा सुरक्षा दलाच्या छावणीवर दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. देशात इतरत्रही असे हल्ले होऊ शकतात. सर्जिकल आॅपरेशनसारख्या हल्ल्यांसाठी दहशतवाद्यांचे तळही लक्ष्य करणे गरजेचे आहे व त्यासाठी निश्चयाने मोहीम राबवावी लागेल, असे हा अधिकारी म्हणाला.

दहशतवाद्यांचे नेटवर्क आता दोन पावले मागे गेले असले तरी खरोखर काही साध्य करायचे असेल तर मध्यम मुदतीची म्हणजे सहा महिन्यांची मोहीम राबवावी लागेल. एखाद्या हल्ल्याने त्यांना रोखता येणार नाही, असे हा अधिकारी म्हणाला. सर्जिकल आॅपरेशनचा सूड घेण्यास पाकमध्ये असलेल्या व दहशतवाद्यांना हाताळणाऱ्यांकडून येत्या आठवड्यांत आणखी जास्त दहशतवादी घुसविण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो, असे भारताच्या जनरल्संना वाटते. (लोकमत न्यूज नेटवर्क)