शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
2
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
3
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
4
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
5
वक्फ-दिलासा आणि खुलासा; कोर्टाने धार्मिक स्वातंत्र्यात ढवळाढवळ करण्याचा सरकारचा प्रयत्न हाणून पाडला
6
उपाशी लोक धनदांडग्यांना खुर्चीवरून खेचतात, तेव्हा..
7
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
8
‘डिएला’ म्हणते, मी पैसे खात नाही, कोणाला खाऊ देणार नाही!
9
राज कुंद्रांची ६० कोटींच्या फसवणूकप्रकरणी चौकशी; पुढील आठवड्यात पुन्हा हजर राहावे लागणार
10
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
11
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
12
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
13
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
14
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
15
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
16
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
17
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
18
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
19
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
20
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक

कुलभूषण जाधव यांना विनाअडथळा संवाद करू द्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2019 04:09 IST

पाकिस्तानच्या संपर्काच्या प्रस्तावावर भारताची भूमिका

नवी दिल्ली : हेरगिरीच्या आरोपावरून पाकिस्तानच्या ताब्यात असलेले भारतीय नौदलाचे निवृत्त अधिकारी कुलभूषण जाधव यांना विनाअडथळा संपर्क करू दिला जावा (अनइम्पिडेड कॉन्स्युलर अ‍ॅक्सेस) असे मत भारताने व्यक्त केले आहे. पाकिस्तानने जाधव यांना भारतीय अधिकाऱ्यांना भेटू देण्याची तयारी दर्शविली आहे. या आठवड्याच्या सुरुवातीला त्यांनी एक प्रस्तावही भारताला पाठविला आहे.भारताने आपली भूमिका स्पष्ट करताना पाकिस्तानला स्पष्ट केले आहे की, हा संपर्क, संवाद कोणत्याही अडथळ्याशिवाय असायला हवा आणि आयसीजेच्या आदेशानुसार असायला हवा. सूत्रांनी सांगितले की, भारताच्या या भूमिकेवर पाकिस्तानच्या प्रतिक्रियेची प्रतीक्षा केली जात आहे.

परराष्ट्र मंत्रालयाने गुरुवारी स्पष्ट केले होते की, संपर्क करून देण्याच्या पाकिस्तानच्या प्रस्तावावर विचार सुरू आहे. असे सांगितले जात आहे की, पाकिस्तानने जाधव यांना संपर्क करू देण्यासाठी काही अटी घातल्या आहेत.न्यायालयाने फटकारले होतेभारतीय नौदलाचे निवृत्त अधिकारी जावध (४९) यांना पाकिस्तानच्या एका सैन्य न्यायालयाने हेरगिरी आणि विध्वंसक कारवायांच्या आरोपावरून एप्रिल २०१७ मध्ये मृत्युदंडाची शिक्षा ठोठावली होती. त्यानंतर भारताने आंतरराष्ट्रीय न्यायालयात धाव घेतली होती. जाधव यांच्या शिक्षेची प्रभावी समीक्षा आणि पुनर्विचार करावा, असे आयसीजेने सांगितले होते. जाधव यांना संपर्क करू न देता पाकिस्तानने जिनेव्हा कराराचा भंग केल्याचे या न्यायालयाने म्हटले होते.

टॅग्स :Kulbhushan Jadhavकुलभूषण जाधवPakistanपाकिस्तान