शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
3
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
4
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
5
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
6
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
7
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
8
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
9
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
10
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
11
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
12
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
13
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
14
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
15
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
16
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
17
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
18
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
19
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
20
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी

कमी मतदानामुळे भाजपची काळजी वाढली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2019 04:48 IST

लोकसभेच्या २०१९ च्या निवडणूक निकालाचे अंदाज व्यक्त करणाऱ्यांनी भलेही भाजपच्या पारड्यात मोठा विजय टाकला असला तरी ५४२ लोकसभा मतदारसंघांतील मतदानाची आकडेवारी हे दाखवते की २२७ मतदारसंघांत कमी मतदान झाले आहे

हरिश गुप्ता/नितीन अग्रवाल ।लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : लोकसभेसाठीच्या २०१४च्या निवडणुकीत बहुमत मिळवलेल्या भाजपला यंदा मात्र काळजीने ग्रासले आहे. कारण भाजपचे प्राबल्य असलेल्या भागांत देशभर कमी मतदान झाले आहे. त्यामुळे निवडणूक निकालापूर्वी भाजपची काळजी वाढली आहे.

लोकसभेच्या २०१९ च्या निवडणूक निकालाचे अंदाज व्यक्त करणाऱ्यांनी भलेही भाजपच्या पारड्यात मोठा विजय टाकला असला तरी ५४२ लोकसभा मतदारसंघांतील मतदानाची आकडेवारी हे दाखवते की २२७ मतदारसंघांत कमी मतदान झाले आहे तर ३१५ मतदारसंघांत मतदान २०१४ मधील मतदानापेक्षा जास्त झाले आहे. २०१४ मध्ये भाजपने २८२ जागा जिंकल्या होत्या आणि त्यापैकी ९८ जागांवर कमी किंवा खूप कमी मतदान झाले होते. २०१४ मध्ये भाजपने १८४ लोकसभा जागा जिंकल्या होत्या तेथे खूपच जास्त मतदान झाले होते. ९८ मतदारसंघांत कमी मतदान झाले होते. त्यापैकी ३१ मतदारसंघ नागरी तर ६७ मतदारसंघ ग्रामीण भागांतील होते. भाजपचे प्राबल्य असलेल्या भागांत देशभर कमी मतदान झाले याची काळजी निवडणुकीच्या निकालांचे अंदाज व्यक्त करणाऱ्यांना आहे. त्यांनी राष्ट्रीय लोकशाही आघाडी ३३०-३६९ जागा जिंकेल असे भाकीत केले आहे. परंतु, कमी मतदानाचा लाभ कोणत्या पक्षाला मिळेल याची उत्तरे हे अंदाज व्यक्त करणाºयांकडे नाहीत.

याबाबत प्रश्न विचारल्यावर इंडिया टुडे अ‍ॅक्सिसचे निवडणूक भाकीत व्यक्त करणारे प्रदीप गुप्ता यांनी ‘लोकमत’ला सांगितले की, कमी मतदानाचा अर्थ हा सत्ताधारी उमेदवार/सरकार यांच्यासाठी दुबळेपणा असा होतो. याच गुप्ता यांनी रालोआला ३३०-३६५ जागा मिळतील, असे म्हटलेले आहे. याचा अर्थ असा की, मोठ्या संख्येतील मतदारांत विद्यमान उमेदवाराला मतदान करण्याचा उत्साह नव्हता. परंतु याचा अर्थ असाही नाही की जे लोक मतदानासाठी आले त्यांनी विद्यमान उमेदवाराला मत दिले नाही, असेही ते म्हणाले. २०१४ मध्ये भाजपने उत्तर प्रदेशात ७१ जागा जिंकल्या होत्या. त्यातील ३० जागांवर कमी मतदान झाले होते. महाराष्ट्रात नऊ ठिकाणी कमी तर १४ ठिकाणी जास्त मतदान झाले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गुजरातेत नऊ लोकसभा मतदारसंघांत कमी तर १७ मतदारसंघांत जास्त मतदान झाले होते. २०१४ मध्ये झारखंडमध्ये भाजपने १० जागा जिंकल्या होत्या व त्यापैकी नऊ मतदारसंघात कमी मतदान झाले होते. २०१४ मध्ये आग्रा आणि पाटणा साहिब मतदारसंघांत भाजपने विजय मिळवला होता. तेथे अनुक्रमे २३ ते १७ टक्के मतदान झाले होते.
पटणा साहिबमध्ये चिंता!२०१९ च्या निवडणुकीत पाटणा साहिब मतदारसंघात काँग्रेसतर्फे शत्रुघ्न सिन्हा हे भाजपच्या रविशंकर प्रसाद यांच्याविरुद्ध लढले असून तेथील कमी मतदानाने भाजपची काळजी वाढवली आहे.

टॅग्स :Lok Sabha Election 2019 Resultsलोकसभा निवडणूक निकालLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९