शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

कमी मतदानामुळे भाजपची काळजी वाढली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2019 04:48 IST

लोकसभेच्या २०१९ च्या निवडणूक निकालाचे अंदाज व्यक्त करणाऱ्यांनी भलेही भाजपच्या पारड्यात मोठा विजय टाकला असला तरी ५४२ लोकसभा मतदारसंघांतील मतदानाची आकडेवारी हे दाखवते की २२७ मतदारसंघांत कमी मतदान झाले आहे

हरिश गुप्ता/नितीन अग्रवाल ।लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : लोकसभेसाठीच्या २०१४च्या निवडणुकीत बहुमत मिळवलेल्या भाजपला यंदा मात्र काळजीने ग्रासले आहे. कारण भाजपचे प्राबल्य असलेल्या भागांत देशभर कमी मतदान झाले आहे. त्यामुळे निवडणूक निकालापूर्वी भाजपची काळजी वाढली आहे.

लोकसभेच्या २०१९ च्या निवडणूक निकालाचे अंदाज व्यक्त करणाऱ्यांनी भलेही भाजपच्या पारड्यात मोठा विजय टाकला असला तरी ५४२ लोकसभा मतदारसंघांतील मतदानाची आकडेवारी हे दाखवते की २२७ मतदारसंघांत कमी मतदान झाले आहे तर ३१५ मतदारसंघांत मतदान २०१४ मधील मतदानापेक्षा जास्त झाले आहे. २०१४ मध्ये भाजपने २८२ जागा जिंकल्या होत्या आणि त्यापैकी ९८ जागांवर कमी किंवा खूप कमी मतदान झाले होते. २०१४ मध्ये भाजपने १८४ लोकसभा जागा जिंकल्या होत्या तेथे खूपच जास्त मतदान झाले होते. ९८ मतदारसंघांत कमी मतदान झाले होते. त्यापैकी ३१ मतदारसंघ नागरी तर ६७ मतदारसंघ ग्रामीण भागांतील होते. भाजपचे प्राबल्य असलेल्या भागांत देशभर कमी मतदान झाले याची काळजी निवडणुकीच्या निकालांचे अंदाज व्यक्त करणाऱ्यांना आहे. त्यांनी राष्ट्रीय लोकशाही आघाडी ३३०-३६९ जागा जिंकेल असे भाकीत केले आहे. परंतु, कमी मतदानाचा लाभ कोणत्या पक्षाला मिळेल याची उत्तरे हे अंदाज व्यक्त करणाºयांकडे नाहीत.

याबाबत प्रश्न विचारल्यावर इंडिया टुडे अ‍ॅक्सिसचे निवडणूक भाकीत व्यक्त करणारे प्रदीप गुप्ता यांनी ‘लोकमत’ला सांगितले की, कमी मतदानाचा अर्थ हा सत्ताधारी उमेदवार/सरकार यांच्यासाठी दुबळेपणा असा होतो. याच गुप्ता यांनी रालोआला ३३०-३६५ जागा मिळतील, असे म्हटलेले आहे. याचा अर्थ असा की, मोठ्या संख्येतील मतदारांत विद्यमान उमेदवाराला मतदान करण्याचा उत्साह नव्हता. परंतु याचा अर्थ असाही नाही की जे लोक मतदानासाठी आले त्यांनी विद्यमान उमेदवाराला मत दिले नाही, असेही ते म्हणाले. २०१४ मध्ये भाजपने उत्तर प्रदेशात ७१ जागा जिंकल्या होत्या. त्यातील ३० जागांवर कमी मतदान झाले होते. महाराष्ट्रात नऊ ठिकाणी कमी तर १४ ठिकाणी जास्त मतदान झाले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गुजरातेत नऊ लोकसभा मतदारसंघांत कमी तर १७ मतदारसंघांत जास्त मतदान झाले होते. २०१४ मध्ये झारखंडमध्ये भाजपने १० जागा जिंकल्या होत्या व त्यापैकी नऊ मतदारसंघात कमी मतदान झाले होते. २०१४ मध्ये आग्रा आणि पाटणा साहिब मतदारसंघांत भाजपने विजय मिळवला होता. तेथे अनुक्रमे २३ ते १७ टक्के मतदान झाले होते.
पटणा साहिबमध्ये चिंता!२०१९ च्या निवडणुकीत पाटणा साहिब मतदारसंघात काँग्रेसतर्फे शत्रुघ्न सिन्हा हे भाजपच्या रविशंकर प्रसाद यांच्याविरुद्ध लढले असून तेथील कमी मतदानाने भाजपची काळजी वाढवली आहे.

टॅग्स :Lok Sabha Election 2019 Resultsलोकसभा निवडणूक निकालLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९