शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
4
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
5
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
6
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
7
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
8
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
9
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
10
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
11
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
12
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
13
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
14
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
15
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
16
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
17
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
18
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
19
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
20
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?

जल आराखड्या विरोधात कायदेशीर लढा आवश्यक पाण्याची पळवापळवी : उपभोगता गटाशी चर्चा व्हावी

By admin | Updated: September 15, 2015 18:49 IST

अहमदनगर : मुळा-प्रवरा खोर्‍यातील पाणी काढून जायकवाडीला देण्याचा घाट जलसंपदा विभागाने घातला आहे. यासाठी जल आराखड्याचा मसुदा तयार करून तो हरकतीसाठी संकेतस्थळावर टाकण्यात आला आहे. या आराखड्या विरोधात जिल्‘ात संताप व्यक्त होत असून शेतीच्या पाण्याबाबत चिंताही व्यक्त होत आहे. या जल आराखड्यातील विसंगत तरतुदी विरोधात जास्तीतजास्त हरकती नोंदवत कायदेशीर लढा उभारणे गरजेचे असल्याचा सूर जिल्‘ातून व्यक्त होत आहे.

अहमदनगर : मुळा-प्रवरा खोर्‍यातील पाणी काढून जायकवाडीला देण्याचा घाट जलसंपदा विभागाने घातला आहे. यासाठी जल आराखड्याचा मसुदा तयार करून तो हरकतीसाठी संकेतस्थळावर टाकण्यात आला आहे. या आराखड्या विरोधात जिल्ह्यात संताप व्यक्त होत असून शेतीच्या पाण्याबाबत चिंताही व्यक्त होत आहे. या जल आराखड्यातील विसंगत तरतुदी विरोधात जास्तीतजास्त हरकती नोंदवत कायदेशीर लढा उभारणे गरजेचे असल्याचा सूर जिल्ह्यातून व्यक्त होत आहे.
जलसंपदा विभागाने गोदावरी खोर्‍यातील पाण्याच्या नियोजनासाठी आराखडा तयार केला आहे. यात जिल्ह्यातील ४१.५० टीएमसी पाणी मराठवाड्यात देण्याचे सुचवण्यात आले आहे. वास्तवात गोदावरी खोर्‍यात ३० उपखोरे आहेत. त्यात जिल्ह्यातील उर्ध्व गोदावरी, प्रवरा आणि मुळा ही तीन खोरे आहेत. या खोर्‍यातील अतिरिक्त पाण्याचा वापर करण्यासाठी जलसंपदा विभागाने आराखडा तयार केला आहे. गोदावरी खोरे हे साधारण खोरे या प्रकारात मोडते. या ठिकाणी हेक्टरला तीन हजार ते आठ हजार घनमीटर पाणी उपलब्ध आहे. जल आराखड्यातील नियमानुसार ज्या खोर्‍यात अतिरिक्त पाणी उपलब्ध आहे. ते दुसर्‍या खोर्‍यात वापरावे, असे स्पष्ट आहे. तरीही जिल्ह्यातील पाणी बाहेर काढण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
आराखड्यात पाणी वापराच्या निकषात ८० ते १०० टक्के सुक्ष्म सिंचनाखाली जिल्ह्यातील क्षेत्र आणल्यास पाणी शिल्लक राहणार आहे. हे पाणी दुसर्‍या खोर्‍यात वापरता येईल, सिंचन पाहून पिकाच्या गरजेनुुसार पाण्याचे केवळ एकच आवर्तन द्यावे, मुळा व प्रवरा खोर्‍यात शेतीवर आधारित उद्योग कमी आहेत. यामुळे येथील पाणी दुसर्‍या खोर्‍यात वळणे शक्य आहे, असे आराखड्यात सुचवण्यात आले आहे. मात्र, ज्या भागात शेतीवर आधारित उद्योगच कमी आहेत. पर्यायाने त्या ठिकाणी मुख्य व्यवसाय शेती असल्याने तेथे जादा पाणी देणे आवश्यक असतांना त्या ठिकाणी असणारे पाणी काढून घेण्याचा डाव आहे. यामुळे शेती आणि पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण होणार आहे. तसेच आराखड्यातील बाबींमध्ये विसंगती आहेत.
जिल्ह्यात पाणी बचाव समिती स्थापन झालेली आहे. पाण्यासाठी संघर्षाची हाक देण्यात आली आहे. या आराखड्या विरोधात संतापासोबत चिंताही व्यक्त करण्यात आली आहे. मात्र, त्या विरोधात कायदेशीर लढा आवश्यक आहे. जलसंपदा विभागाने उपभोगता गटाला विश्वासात घेणे आवश्यक आहे. आराखड्यातील विसंगत तरतुदी विरोधात जास्तीत जास्त हकरती नोंदवणे आवश्यक बनले आहे.
............अपूर्ण.............