शहरं
Join us  
Trending Stories
1
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
2
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
3
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
4
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
5
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
6
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
7
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
8
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
9
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
10
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
11
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
12
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
13
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
14
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
15
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
16
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
17
आई-वडिलांचा केला खून, मृतदेहांचे तुकडे करून गोणीत भरले, अन् नदीत फेकले, मुलाचं धक्कादायक कृत्य 
18
‘महाराष्ट्रात येणाऱ्या सर्व विमानांमध्ये मराठी भाषेत उद्घोषणा करा’, नाना पटोले यांची मागणी 
19
हृदयद्रावक! 'तो' सेल्फी ठरला अखेरचा; लग्नाच्या वाढदिवशी पतीसमोर पत्नीचा पाय घसरला अन्...
20
कसा आहे 'अवतार: फायर अँड ॲश'? सर्वात आधी चित्रपट पाहून राजामौली म्हणाले "थिएटरमध्ये बसलेल्या लहान मु
Daily Top 2Weekly Top 5

जल आराखड्या विरोधात कायदेशीर लढा आवश्यक पाण्याची पळवापळवी : उपभोगता गटाशी चर्चा व्हावी

By admin | Updated: September 15, 2015 18:49 IST

अहमदनगर : मुळा-प्रवरा खोर्‍यातील पाणी काढून जायकवाडीला देण्याचा घाट जलसंपदा विभागाने घातला आहे. यासाठी जल आराखड्याचा मसुदा तयार करून तो हरकतीसाठी संकेतस्थळावर टाकण्यात आला आहे. या आराखड्या विरोधात जिल्‘ात संताप व्यक्त होत असून शेतीच्या पाण्याबाबत चिंताही व्यक्त होत आहे. या जल आराखड्यातील विसंगत तरतुदी विरोधात जास्तीतजास्त हरकती नोंदवत कायदेशीर लढा उभारणे गरजेचे असल्याचा सूर जिल्‘ातून व्यक्त होत आहे.

अहमदनगर : मुळा-प्रवरा खोर्‍यातील पाणी काढून जायकवाडीला देण्याचा घाट जलसंपदा विभागाने घातला आहे. यासाठी जल आराखड्याचा मसुदा तयार करून तो हरकतीसाठी संकेतस्थळावर टाकण्यात आला आहे. या आराखड्या विरोधात जिल्ह्यात संताप व्यक्त होत असून शेतीच्या पाण्याबाबत चिंताही व्यक्त होत आहे. या जल आराखड्यातील विसंगत तरतुदी विरोधात जास्तीतजास्त हरकती नोंदवत कायदेशीर लढा उभारणे गरजेचे असल्याचा सूर जिल्ह्यातून व्यक्त होत आहे.
जलसंपदा विभागाने गोदावरी खोर्‍यातील पाण्याच्या नियोजनासाठी आराखडा तयार केला आहे. यात जिल्ह्यातील ४१.५० टीएमसी पाणी मराठवाड्यात देण्याचे सुचवण्यात आले आहे. वास्तवात गोदावरी खोर्‍यात ३० उपखोरे आहेत. त्यात जिल्ह्यातील उर्ध्व गोदावरी, प्रवरा आणि मुळा ही तीन खोरे आहेत. या खोर्‍यातील अतिरिक्त पाण्याचा वापर करण्यासाठी जलसंपदा विभागाने आराखडा तयार केला आहे. गोदावरी खोरे हे साधारण खोरे या प्रकारात मोडते. या ठिकाणी हेक्टरला तीन हजार ते आठ हजार घनमीटर पाणी उपलब्ध आहे. जल आराखड्यातील नियमानुसार ज्या खोर्‍यात अतिरिक्त पाणी उपलब्ध आहे. ते दुसर्‍या खोर्‍यात वापरावे, असे स्पष्ट आहे. तरीही जिल्ह्यातील पाणी बाहेर काढण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
आराखड्यात पाणी वापराच्या निकषात ८० ते १०० टक्के सुक्ष्म सिंचनाखाली जिल्ह्यातील क्षेत्र आणल्यास पाणी शिल्लक राहणार आहे. हे पाणी दुसर्‍या खोर्‍यात वापरता येईल, सिंचन पाहून पिकाच्या गरजेनुुसार पाण्याचे केवळ एकच आवर्तन द्यावे, मुळा व प्रवरा खोर्‍यात शेतीवर आधारित उद्योग कमी आहेत. यामुळे येथील पाणी दुसर्‍या खोर्‍यात वळणे शक्य आहे, असे आराखड्यात सुचवण्यात आले आहे. मात्र, ज्या भागात शेतीवर आधारित उद्योगच कमी आहेत. पर्यायाने त्या ठिकाणी मुख्य व्यवसाय शेती असल्याने तेथे जादा पाणी देणे आवश्यक असतांना त्या ठिकाणी असणारे पाणी काढून घेण्याचा डाव आहे. यामुळे शेती आणि पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण होणार आहे. तसेच आराखड्यातील बाबींमध्ये विसंगती आहेत.
जिल्ह्यात पाणी बचाव समिती स्थापन झालेली आहे. पाण्यासाठी संघर्षाची हाक देण्यात आली आहे. या आराखड्या विरोधात संतापासोबत चिंताही व्यक्त करण्यात आली आहे. मात्र, त्या विरोधात कायदेशीर लढा आवश्यक आहे. जलसंपदा विभागाने उपभोगता गटाला विश्वासात घेणे आवश्यक आहे. आराखड्यातील विसंगत तरतुदी विरोधात जास्तीत जास्त हकरती नोंदवणे आवश्यक बनले आहे.
............अपूर्ण.............