शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?...
2
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
3
दोन पराभवांनंतर अखेर संजयकाका पाटलांनी मैदान मारले, आर. आर. आबांचा रोहित पाटील पराभूत
4
"दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश दिल्याचा हा परिणाम"; चंद्रपूरातील पराभवानंतर मुनगंटीवारांचा घरचा आहेर
5
Maharashtra Local Body Election Results 2025 : अख्खं मंत्रिमंडळ ईश्वरपुरात, तरीही जयंत पाटलांनी महायुतीला दिला धक्का; सांगली जिल्ह्यातील नगराध्यक्षांची यादी एका क्लिकवर
6
विमा घेताय? केवळ जाहिरातींवर जाऊ नका; 'या' ४ तांत्रिक गोष्टी तपासा, अन्यथा क्लेमवेळी होईल पश्चात्ताप!
7
उद्धवसेना-मनसे युतीची बोलणी संपली, संजय राऊतांनी दिली महत्त्वाची माहिती; "अजूनही ७२ तास..."
8
"म्हणून पुन्हा एकदा सांगतो, शून्य अधिक शून्य...", निकाल लागताच भाजपचा उद्धव ठाकरेंवर पहिला प्रहार
9
Shrivardhan Nagar Parishad Election Result 2025: रायगडमध्ये मोठा ट्विस्ट! श्रीवर्धनमधील ठाकरे गटाचा विजयी नगराध्यक्ष शिंदेसेनेत प्रवेश करणार?
10
Maharashtra Nagaradhyaksha Winners List: महाराष्ट्रातील नगरपरिषद, नगरपंचायतींमध्ये कोण झालं नगराध्यक्ष? वाचा, पक्षनिहाय यादी
11
Muktainagar Nagar Panchayat Election Result 2025: “रक्षा खडसे भाजपात एकाकी पडल्या”; मुक्ताईनगरातील शिंदेसेनेच्या विजयानंतर एकनाथ खडसेंचा दावा
12
"पैसे भरा, मृतदेह न्या", पोटच्या पोरासाठी बापाने मागितली भीक; घर गहाण ठेवलं, कर्ज काढलं, पण...
13
धारुरमध्ये हे काय घडलं? भाजपचे सर्व उमेदवार आपटले...! पंकजा मुंडे यांना मोठा धक्का, म्हणाल्या...
14
रेल्वे प्रवासासाठी आता मोजावे लागणार जादा पैसे! जास्त सामान नेण्यावरही अतिरिक्त शुल्क लागू होणार
15
Sangamner Nagar Parishad Election Result 2025: संगमनेरमध्ये पुन्हा 'तांबे-थोरात' पॅटर्न; डॉ. मैथिली तांबे महाराष्ट्रात सर्वाधिक मताधिक्याने विजयी
16
Khed Nagar Parishad Election Result 2025: “कोकणातील विजय हा मुंबई मनपा विजयाची नांदी”; एकनाथ शिंदे यांच्या शिलेदाराचे मोठे भाकित
17
एका आठवड्यात चांदी १६ हजारांनी महागली; वर्षात दिला १२६% परतावा, सोन्याची काय स्थिती?
18
Amul: नोकरीची चिंता सोडा आणि स्वतःच मालक व्हा! अमूलसोबत दरमहा कमवा १.५ लाख रुपये, कसे?
19
IND vs PAK U19 Asia Cup: कोण आहे Sameer Minhas? ज्यानं दोन वेळा मोडला वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड
20
सावधान! तुमचं बँक खातंही होऊ शकतं रिकामं! आधार कार्ड सुरक्षित ठेवण्यासाठी करा 'बायोमॅट्रिक लॉक'
Daily Top 2Weekly Top 5

आसामात कमळ केरळात डावे

By admin | Updated: May 20, 2016 09:22 IST

पाच राज्यांमध्ये नवा इतिहास लिहिणारा विधानसभा निवडणुकांचा निकाल गुरुवारी घोषित झाला.

हरीश गुप्ता,

नवी दिल्ली- पाच राज्यांमध्ये नवा इतिहास लिहिणारा विधानसभा निवडणुकांचा निकाल गुरुवारी घोषित झाला. आसाममध्ये प्रथमच भाजपाचे कमळ फुलले. या पक्षाने भगवा उंचावत काँग्रेसची १५ वर्षांपासूनची सत्ता उलथवली. तामिळनाडूत जयललितांनी निसटती का होईना, लागोपाठ दुसऱ्यांदा सत्ता काबीज केली. काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांचा प. बंगालमध्ये डाव्यांशी आघाडी करण्याचा प्रयोग फसला. बंगालमध्ये काँग्रेसशी समझोता करणाऱ्या डाव्या पक्षांनी (एलफडीएफ) ने केरळमध्ये तर काँग्रेसला सत्तेतूनच हटवले आहे.पुडुच्चेरीमधील मिळवलेली सत्ता हेच काय ते समाधान काँग्रेसला लाभले. आसाममधील विजय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी वैयक्तिक पातळीवर किती मोठा होता हे त्यांच्या टिष्ट्वटमधून दिसून आले. देशभरातील जनता भाजपावर विश्वास दाखवत आहे. सर्वांगीण आणि सर्वसमावेशक विकासावर जनतेने दाखविलेला हा विश्वास असल्याचे पक्षाला वाटते, असे ते निकाल जाहीर होत असताना प्रतिक्रिया देताना म्हणाले. >मोदींच्या कामगिरीला पावतीदेशाने काँग्रेसमुक्त भारताच्या दिशेने आणखी एक पाऊल टाकले आहे. मोदी सरकारच्या दोन वर्षांच्या कामगिरीला व ध्येयधोरणांना जनतेने जोरदार समर्थन दिल्याचे यातून दिसून येते. - अमित शहा, भाजपाध्यक्ष>जनतेचा निर्णय स्वीकारतोकाँग्रेस लोकांचा विश्वास प्राप्त करेपर्यंत कठोर मेहनत करेल. आम्ही जनतेचा हा निर्णय नम्रपणे स्वीकारतो. निवडणुकीत विजयी पक्षांना शुभेच्छा देतो. - राहुल गांधी, उपाध्यक्ष, काँग्रेस>भ्रष्ट सरकारला धोबीपछाडकेरळातील विजय एलडीएफसाठी मोठा आहे. जनतेने भ्रष्ट सरकारला धोबीपछाड दिला आहे. केरळच्या मुख्यमंत्र्यांसंदर्भात शुक्रवारी बैठक घेतली जाणार आहे. - प्रकाश करात, माकपा नेते>ममतांचा विजय ऐतिहासिक...ममतांच्या तृणमूलने २०११मध्ये २९४पैकी १८४ जागा जिंकल्या होत्या. या वेळी या पक्षाने दुहेरी द्विशतकच पार केले. गेल्या वेळी तृणमूलशी युती करणाऱ्या काँग्रेसने प. बंगालमध्ये ४२ जागा जिंकल्या होत्या. या वेळी तृणमूलने स्वबळावर मिळविलेले यश ऐतिहासिक ठरते.भाजपाने आसाममध्ये केलेली निवडणूकपूर्व आघाडी कामी आल्याचे पाहता पुढील वर्षी उत्तर प्रदेश, पंजाब, उत्तराखंड, मणिपूर व गोवा या राज्यांमध्ये तशाच प्रकारची रणनीती अवलंबली जाऊ शकते. राहुल गांधी यांचा आसाम आणि प. बंगालमधील प्रयोग पुरता फसल्यामुळे काँग्रेसला अधिक आत्मचिंतनाची गरज भासेल.>तामिळनाडूत भोपळाच, तरीही जयललितांची साथ!तामिळनाडूत भाजपाला या वेळीही खाते उघडता आले नाही, मात्र या पक्षाने केरळमध्ये प्रथमच पाय रोवले. प. बंगालमध्ये संख्याबळ वाढविले. जयललितांच्या विजयामुळे भाजपाला संसदेत अण्णाद्रमुकची साथ लाभेल.प. बंगालचा विकास डोळ्यांसमोर ठेवत ममता बॅनर्जीही या पक्षाला मदतीचा हात देऊ शकतात. जयललितांनी गेल्या वेळी २३४पैकी १५० जागा जिंकल्या होत्या. त्या तुलनेत त्यांचे संख्याबळ घटले आहे.