शहरं
Join us  
Trending Stories
1
"पैशांची एखादी बॅग देऊ...आजकाल हमारा नाम बहुत चल रहा है"; शिरसाटांची मिश्कील टिप्पणी
2
“महायुतीच्या अपयशावर बोट ठेवणार, पक्षाची प्रतिष्ठा वाढवणार”; शशिकांत शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
3
IPO पूर्वी Flipkart चं मोठं गिफ्ट, ७५०० पेक्षा अधिक कर्मचाऱ्यांना होणार फायदा
4
छांगूर बाबाची हुशारी, मालमत्तेत भरपूर पैसे गुंतवले; पण स्वत:च्या नावावर एकही जमीन नाही
5
'माझा व्हिडीओ मॉर्फ करून बनवला,अब्रुनुकसानीची नोटीस पाठवणार'; संजय शिरसाटांचा इशारा
6
८ व्या वेतन आयोगाच्या शिफारसी केव्हापर्यंत लागू होणार, केंद्रीय कर्मचाऱ्यांना माहीत करुन घेणं गरजेचं
7
मोठी बातमी! शरद पवारांनी भाकरी फिरवली! जयंत पाटलांचा राजीनामा; या नेत्याकडे सोपवणार सूत्रे
8
भलं करायच्या नादात, ट्रम्प कापताहेत आपल्याच लोकांचे खिसे; आकडेवारी पाहून डोक्यावर हात माराल
9
१२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश; शरद पवारांनी मानले मोदी सरकारचे आभार
10
Astrology: जोडीदार 'क्लिक' होत नाही अशी तरुणांची सबब; हा ग्रहांचा परिणाम समजावा का?
11
छत्तीसगडच्या सुकमामध्ये २३ नक्षलवाद्यांनी एकत्र आत्मसमर्पण केले, त्यांच्यावर १.१८ कोटी रुपयांचे होते बक्षीस
12
IND vs ENG 3rd Test: मोहम्मद सिराजनं सांगितलं त्याच्या आगळ्यावेगळ्या सेलिब्रेशनमागचं कारण!
13
लग्नाच्या रात्रीच नवरी करणार होती कांड, पण नवरदेव निघाला भलताच हुशार! मित्रांना घरी बोलावलं अन्... 
14
Recipe : किसलेल्या दोडक्याची ‘अशी’ चमचमीत करा भाजी, चव जबरदस्त-दोडक्याचेच व्हाल फॅन!
15
दोन वर १ शेअर मिळणार फ्री, 'ही' कंपनी ग्रहकांना देणार भेट; याच महिन्यात जमा होणार, तुमच्याकडे आहे का?
16
Air India Plane Crash : इंजिन थांबले, पण प्रयत्न सुरूच होते...; दोन्ही वैमानिकांनी शेवटच्या क्षणापर्यंत झुंज दिली
17
West Bengal Accident: जगन्नाथाच्या दर्शनासाठी जाताना भाविकांवर काळाचा घाला, वाटेतच ट्रकला धडक, कारमधील ४ जण ठार!
18
“१२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश झाल्याचा आनंद, अभिमान”: DCM अजित पवार
19
जनसुरक्षा विधेयकाला उद्धवसेनेचा विरोध; भाजपाची टीका, नेते म्हणाले, “महाविकास आघाडी...”
20
Ahmedabad Plane Crash : विमानात नेमका कुठे असतो 'फ्यूअल स्विच'? कोण करू शकतं याला चालू-बंद?

आसामात कमळ केरळात डावे

By admin | Updated: May 20, 2016 09:22 IST

पाच राज्यांमध्ये नवा इतिहास लिहिणारा विधानसभा निवडणुकांचा निकाल गुरुवारी घोषित झाला.

हरीश गुप्ता,

नवी दिल्ली- पाच राज्यांमध्ये नवा इतिहास लिहिणारा विधानसभा निवडणुकांचा निकाल गुरुवारी घोषित झाला. आसाममध्ये प्रथमच भाजपाचे कमळ फुलले. या पक्षाने भगवा उंचावत काँग्रेसची १५ वर्षांपासूनची सत्ता उलथवली. तामिळनाडूत जयललितांनी निसटती का होईना, लागोपाठ दुसऱ्यांदा सत्ता काबीज केली. काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांचा प. बंगालमध्ये डाव्यांशी आघाडी करण्याचा प्रयोग फसला. बंगालमध्ये काँग्रेसशी समझोता करणाऱ्या डाव्या पक्षांनी (एलफडीएफ) ने केरळमध्ये तर काँग्रेसला सत्तेतूनच हटवले आहे.पुडुच्चेरीमधील मिळवलेली सत्ता हेच काय ते समाधान काँग्रेसला लाभले. आसाममधील विजय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी वैयक्तिक पातळीवर किती मोठा होता हे त्यांच्या टिष्ट्वटमधून दिसून आले. देशभरातील जनता भाजपावर विश्वास दाखवत आहे. सर्वांगीण आणि सर्वसमावेशक विकासावर जनतेने दाखविलेला हा विश्वास असल्याचे पक्षाला वाटते, असे ते निकाल जाहीर होत असताना प्रतिक्रिया देताना म्हणाले. >मोदींच्या कामगिरीला पावतीदेशाने काँग्रेसमुक्त भारताच्या दिशेने आणखी एक पाऊल टाकले आहे. मोदी सरकारच्या दोन वर्षांच्या कामगिरीला व ध्येयधोरणांना जनतेने जोरदार समर्थन दिल्याचे यातून दिसून येते. - अमित शहा, भाजपाध्यक्ष>जनतेचा निर्णय स्वीकारतोकाँग्रेस लोकांचा विश्वास प्राप्त करेपर्यंत कठोर मेहनत करेल. आम्ही जनतेचा हा निर्णय नम्रपणे स्वीकारतो. निवडणुकीत विजयी पक्षांना शुभेच्छा देतो. - राहुल गांधी, उपाध्यक्ष, काँग्रेस>भ्रष्ट सरकारला धोबीपछाडकेरळातील विजय एलडीएफसाठी मोठा आहे. जनतेने भ्रष्ट सरकारला धोबीपछाड दिला आहे. केरळच्या मुख्यमंत्र्यांसंदर्भात शुक्रवारी बैठक घेतली जाणार आहे. - प्रकाश करात, माकपा नेते>ममतांचा विजय ऐतिहासिक...ममतांच्या तृणमूलने २०११मध्ये २९४पैकी १८४ जागा जिंकल्या होत्या. या वेळी या पक्षाने दुहेरी द्विशतकच पार केले. गेल्या वेळी तृणमूलशी युती करणाऱ्या काँग्रेसने प. बंगालमध्ये ४२ जागा जिंकल्या होत्या. या वेळी तृणमूलने स्वबळावर मिळविलेले यश ऐतिहासिक ठरते.भाजपाने आसाममध्ये केलेली निवडणूकपूर्व आघाडी कामी आल्याचे पाहता पुढील वर्षी उत्तर प्रदेश, पंजाब, उत्तराखंड, मणिपूर व गोवा या राज्यांमध्ये तशाच प्रकारची रणनीती अवलंबली जाऊ शकते. राहुल गांधी यांचा आसाम आणि प. बंगालमधील प्रयोग पुरता फसल्यामुळे काँग्रेसला अधिक आत्मचिंतनाची गरज भासेल.>तामिळनाडूत भोपळाच, तरीही जयललितांची साथ!तामिळनाडूत भाजपाला या वेळीही खाते उघडता आले नाही, मात्र या पक्षाने केरळमध्ये प्रथमच पाय रोवले. प. बंगालमध्ये संख्याबळ वाढविले. जयललितांच्या विजयामुळे भाजपाला संसदेत अण्णाद्रमुकची साथ लाभेल.प. बंगालचा विकास डोळ्यांसमोर ठेवत ममता बॅनर्जीही या पक्षाला मदतीचा हात देऊ शकतात. जयललितांनी गेल्या वेळी २३४पैकी १५० जागा जिंकल्या होत्या. त्या तुलनेत त्यांचे संख्याबळ घटले आहे.