नवी दिल्ली : अनेक मोठे प्रकल्प प्रलंबित असल्याच्या पाश्र्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘चलता है’ मानसिकता झटकून वेळेआधी काम पूर्ण करण्याची सूचना संरक्षण विकास व संशोधन संस्थेला (डीआरडीओ) केली.
संरक्षण क्षेत्रतील तंत्रज्ञान वेगाने बदलत आहे. आपण एखाद्या प्रणालीबाबत संकल्पना मांडतो. त्यापूर्वीच त्याच्या दोन पाऊल पुढे असलेले उत्पादन बाजारात उपलब्ध असते. त्यामुळे आपण मागे पडतो, असे ते म्हणाले. डीआरडीओच्या एका पुरस्कार सोहळ्यात ते बोलत होते. डीआरडीओला ठरवावे लागेल की, परिस्थितीवर प्रतिक्रिया द्यायची की, सुरक्षित बनून जगासाठी अजेंडा निश्चित करायचा. आपल्याला जगासाठी अजेंडा निश्चित करावे लागेल. आम्ही दुस:यांचे अनुकरण करून नव्हे तर अजेंडा निश्चित करून जगाचे नेते बनू शकतो. भारतात प्रतिभेची कमतरता नाही. परंतु येथे ‘चलता है’ मानसिकता आहे, असेही ते म्हणाले. आपण काळाच्या पुढे राहावे, ही काळाची गरज आहे. जग आपली वाट पाहणार नाही. त्यामुळे आपण जे काही करू, ते वेळेआधी करण्यासाठी कठोर परिश्रम घ्यावे लागेल. असे व्हायला नको की, एखाद्या प्रकल्पाची संकल्पना 1992 मध्ये केली जावी आणि 2क्14 मध्ये आपण म्हणावे की, त्यास आता आणखी वेळ लागेल. अशामुळे जग आपल्या ब:याच पुढे निघून जाईल. (वृत्तसंस्था)