शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
2
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
3
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
4
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
5
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
6
आणखी एक मुस्कान! मेरठच्या 'सौरभ' हत्याकांडासारखा प्लॅन बनवला; पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीचे केले तुकडे
7
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
8
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
9
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
10
संपादकीय: नगरांचा जनादेश सत्तेला, काँग्रेस पक्ष राज्यात जिवंत असल्याचे...
11
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
12
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
13
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
14
भारताविरुद्ध बांगलादेशात षड्‌यंत्र! कोण कोण रचतेय...
15
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
16
रेल्वे प्रवाशांना नवीन वर्षाचा 'झटका'! २६ डिसेंबरपासून भाडेवाढ लागू; लांब पल्ल्याचा प्रवास आणि 'AC' कोच महागणार
17
दिशाभूल करणाऱ्या प्रचारामुळे संघाबद्दल काही लोकांमध्ये गैरसमज; संघाचा कोणीही शत्रू नाही :  सरसंघचालक मोहन भागवत
18
आमदारांचे पगार की जनतेची थट्टा? ओडिशात २००% पगारवाढीने रणकंदन; पाहा महाराष्ट्रासह कोणत्या राज्यात किती मिळतो पगार!
19
‘हा फोटो बघ’ असा मेसेज तुम्हालाही आलाय का? व्हॉट्सॲप ‘हायजॅक’चे नवे संकट!
20
२४ डिसेंबरला ब्लूबर्ड ब्लॉक-२ चे हाेणार उड्डाण ; अमेरिकेतील एएसटी स्पेस मोबाइलसोबत इस्रोचा करार
Daily Top 2Weekly Top 5

‘अच्छे’ सोडा, जुने दिवस तरी परत आणा

By admin | Updated: October 18, 2015 02:13 IST

बिहारचे मुख्यमंत्री आणि संयुक्त जनता दलाचे ज्येष्ठ नेते नितीशकुमार यांनी वाढत्या महागाईवरून केंद्रातील मोदी सरकारला लक्ष्य करताना अच्छे दिवस तर सोडा आमचे जुने दिवस तरी

पाटणा : बिहारचे मुख्यमंत्री आणि संयुक्त जनता दलाचे ज्येष्ठ नेते नितीशकुमार यांनी वाढत्या महागाईवरून केंद्रातील मोदी सरकारला लक्ष्य करताना अच्छे दिवस तर सोडा आमचे जुने दिवस तरी परत आणा, असा टोला पंतप्रधानांना लगावला आहे. नितीशकुमार यांनी शनिवारी टिष्ट्वट करून मोदींच्या ‘अच्छे दिन’वर सडकून टीका केली. बिहारमध्ये सध्या विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू असून यानिमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि नितीशकुमार यांच्यात वाक्युद्ध शिगेला पोहोचले आहे. एकीकडे भाजप नितीशकुमार सरकारचा विकासाचा दावा फेटाळून लावत आहे, तर दुसरीकडे लालूप्रसाद यादव-नितीशकुमार ही जोडगोळी मोदी सरकारच्या काळा पैसा आणि महागाईसह सर्व मुद्यांवर प्रहार करीत आहे. सातत्याने निर्यातीत घट होत असून, तिने वर्षभरातील नीचांक गाठला आहे. परिणामी, महागाई प्रचंड वाढली आहे. तेव्हा मोदींनी अच्छे दिन सोडा; पण आमचे जुने दिवस तरी परत आणावेत, अशी टीका संजद नेत्याने केली.शत्रुघ्न : सभा रद्द झाल्याने नकारात्मक संदेशपाटणा : भारतीय जनता पार्टीचे खासदार आणि चित्रपट अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांनी पुन्हा एकदा पक्षाला अडचणीत आणत भाजपाचे स्टार प्रचारक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभा रद्द करण्यात आल्याने नकारात्मक संदेश जात असल्याचे म्हटले आहे.पक्षाकडून होणाऱ्या उपेक्षेमुळे सिन्हा नाराज असून पक्षावर कुरघोडीची एकही संधी ते सोडत नाहीत. यापूर्वीही त्यांनी पक्षाला अडचणीत आणणारी वक्तव्ये केली आहेत.बिहारमध्ये पंतप्रधानांच्या आणखी सभा होणार -भाजपनवी दिल्ली : बिहारमध्ये पंतप्रधानांच्या जास्त सभा न घेण्याचा निर्णय भाजपने घेतल्याच्या वृत्ताचा पक्षाने इन्कार केला असून, त्यांच्या आणखी सभा होतील, असे जाहीर केले आहे. भाजपच्या एका ज्येष्ठ नेत्याने सांगितले की, मोदी आणखी १३ सभा घेणार आहेत. मोदी हेच आमचे सर्वांत मोठे यश आहे. प्रचाराकडे अद्यापही पाठचपाटणासाहिब मतदारसंघाचे खासदार असलेले सिन्हा यांनी काही संकटे आणि निवडणूक समस्या असतानाही भाजपा विधानसभा निवडणुकीत अपेक्षित कामगिरी करील, असा विश्वास व्यक्त केला आहे.बिहार विधानसभा निवडणुकीसाठी पक्षाच्या स्टार प्रचारकांच्या यादीत असलेले शत्रुघ्न सिन्हा यांनी अद्याप प्रचारास सुरुवात केलेली नाही. यापूर्वी त्यांनी डाळीच्या वाढत्या किमतींवर चिंता व्यक्त करून यावर नियंत्रणाची मागणी केंद्र सरकारकडे केली होती.