शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याला दिलं हृदय त्यानेच घेतला जीव! प्रेमविवाह करणाऱ्या अंजलीचा शेवट कसा झाला?; आरोपी पतीला अटक
2
खासदार श्रीकांत शिंदेंच्या बंगल्यातही शिरलं पाणी; विकासकामांवर बोलायचं नाही, मनसेचा खोचक टोला
3
Mumbai Rain Updates Live: शाळा-कॉलेजला २० ऑगस्टला सुट्टी जाहीर केल्याचा मेसेज खोटा - BMC
4
जग पाहण्याआधीच बाळाचा जीव गेला, आईनं गमावलं लेकरू; महाराष्ट्रात आरोग्य सेवेचे धिंडवडे निघाले
5
School Holiday: मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
6
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
7
४० तोळं सोने अन् २० लाख खर्च करून लग्न लावलं; २ वर्षात पोरीनं स्वत:ला कायमचं संपवलं
8
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
9
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
10
Asia Cup 2025 : गिल वर्षभरानंतर संघात आला अन् उप-कर्णधार झाला! सूर्यकुमार यादवनं सांगितली आतली गोष्ट
11
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
12
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली
13
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
14
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
15
सेंच्युरीसह मुंबईकर पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दुसऱ्या बाजूला पुणेकर ऋतुराजनं घातला घोळ, अन्...
16
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
17
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
18
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
19
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
20
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका

‘अच्छे’ सोडा, जुने दिवस तरी परत आणा

By admin | Updated: October 18, 2015 02:13 IST

बिहारचे मुख्यमंत्री आणि संयुक्त जनता दलाचे ज्येष्ठ नेते नितीशकुमार यांनी वाढत्या महागाईवरून केंद्रातील मोदी सरकारला लक्ष्य करताना अच्छे दिवस तर सोडा आमचे जुने दिवस तरी

पाटणा : बिहारचे मुख्यमंत्री आणि संयुक्त जनता दलाचे ज्येष्ठ नेते नितीशकुमार यांनी वाढत्या महागाईवरून केंद्रातील मोदी सरकारला लक्ष्य करताना अच्छे दिवस तर सोडा आमचे जुने दिवस तरी परत आणा, असा टोला पंतप्रधानांना लगावला आहे. नितीशकुमार यांनी शनिवारी टिष्ट्वट करून मोदींच्या ‘अच्छे दिन’वर सडकून टीका केली. बिहारमध्ये सध्या विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू असून यानिमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि नितीशकुमार यांच्यात वाक्युद्ध शिगेला पोहोचले आहे. एकीकडे भाजप नितीशकुमार सरकारचा विकासाचा दावा फेटाळून लावत आहे, तर दुसरीकडे लालूप्रसाद यादव-नितीशकुमार ही जोडगोळी मोदी सरकारच्या काळा पैसा आणि महागाईसह सर्व मुद्यांवर प्रहार करीत आहे. सातत्याने निर्यातीत घट होत असून, तिने वर्षभरातील नीचांक गाठला आहे. परिणामी, महागाई प्रचंड वाढली आहे. तेव्हा मोदींनी अच्छे दिन सोडा; पण आमचे जुने दिवस तरी परत आणावेत, अशी टीका संजद नेत्याने केली.शत्रुघ्न : सभा रद्द झाल्याने नकारात्मक संदेशपाटणा : भारतीय जनता पार्टीचे खासदार आणि चित्रपट अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांनी पुन्हा एकदा पक्षाला अडचणीत आणत भाजपाचे स्टार प्रचारक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभा रद्द करण्यात आल्याने नकारात्मक संदेश जात असल्याचे म्हटले आहे.पक्षाकडून होणाऱ्या उपेक्षेमुळे सिन्हा नाराज असून पक्षावर कुरघोडीची एकही संधी ते सोडत नाहीत. यापूर्वीही त्यांनी पक्षाला अडचणीत आणणारी वक्तव्ये केली आहेत.बिहारमध्ये पंतप्रधानांच्या आणखी सभा होणार -भाजपनवी दिल्ली : बिहारमध्ये पंतप्रधानांच्या जास्त सभा न घेण्याचा निर्णय भाजपने घेतल्याच्या वृत्ताचा पक्षाने इन्कार केला असून, त्यांच्या आणखी सभा होतील, असे जाहीर केले आहे. भाजपच्या एका ज्येष्ठ नेत्याने सांगितले की, मोदी आणखी १३ सभा घेणार आहेत. मोदी हेच आमचे सर्वांत मोठे यश आहे. प्रचाराकडे अद्यापही पाठचपाटणासाहिब मतदारसंघाचे खासदार असलेले सिन्हा यांनी काही संकटे आणि निवडणूक समस्या असतानाही भाजपा विधानसभा निवडणुकीत अपेक्षित कामगिरी करील, असा विश्वास व्यक्त केला आहे.बिहार विधानसभा निवडणुकीसाठी पक्षाच्या स्टार प्रचारकांच्या यादीत असलेले शत्रुघ्न सिन्हा यांनी अद्याप प्रचारास सुरुवात केलेली नाही. यापूर्वी त्यांनी डाळीच्या वाढत्या किमतींवर चिंता व्यक्त करून यावर नियंत्रणाची मागणी केंद्र सरकारकडे केली होती.