शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
4
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
5
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
6
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
7
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
8
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
9
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
10
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
11
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
12
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
13
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
14
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
15
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
16
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
17
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
18
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
19
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
20
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास

मुलींना घरातच ठेवा, छेडछाडीच्या घटनेवर आझम खान यांचा अजब सल्ला

By admin | Updated: May 29, 2017 09:01 IST

तरुणांचा एक गट दोन महिलांचा विनयभंग करत असल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर संपूर्ण उत्तरप्रदेशात संतापाचे वातावरण आहे.

 ऑनलाइन लोकमत 

लखनऊ, दि. 29 - रामपूर जिल्ह्यात दिवसाढवळया तरुणांचा एक गट दोन महिलांचा विनयभंग करत असल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर संपूर्ण उत्तरप्रदेशात संतापाचे वातावरण आहे. अशा परिस्थितीत समाजवादी पक्षाचे नेते आझम खान यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केले आहे. वादग्रस्त विधान करण्याची आझम खान यांची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी सुद्धा त्यांनी अनेकदा अशी विधाने केली आहेत. मुलींनी त्यांची छेडछाड होईल अशा ठिकाणी जाणे टाळले पाहिजे असे विधान आझम खान यांनी केले आहे. 
 
छेडछाड, महिलांशी गैरवर्तन, लूट, दरोडा आणि हत्या हे आता नित्याचेच झाले आहे. विधानसभा निवडणुकीआधी भाजपाला मतदान केल्याने काय धोका निर्माण होऊ शकतो त्याची मी मतदारांना कल्पना दिली होती. समाजवादी पक्षाचा सुशासनाचा कारभार लक्षात ठेवून मतदान करा असा मी सल्ला दिला होता. भाजपाला संधी दिली तर, कायदा-सुव्यवस्था बिघडेल हे मी आधीच सांगितले होते असे आझम खान यांनी म्हटले आहे. 
 
परिस्थितीचे गांर्भीय लक्षात घेऊन पालकांनी त्यांच्या मुलींना घराबाहेर सोडू नये. घरातच आपल्या नजरेसमोर ठेवावे असे आझम खान यांनी म्हटले आहे. भाजपाच्या राज्यात महिला सुरक्षित नसल्याचे विधानही त्यांनी केले. आझम खान यांचा मुलगा अब्दुल्लाह आझम ज्या स्वार-तांडा विधानसभा मतदारसंघातून आमदार आहे तिथे ही छेडछाडीची घटना घडली. 
 
आझम खान यांनी जे म्हटलेय त्यामुळेच उत्तरप्रदेशच्या जनतेने त्यांना बाहेरचा रस्ता दाखवला. आपल्या असंवेदनशील विधानाबद्दल त्यांनी माफी मागितली पाहिजे असे राज्याचे अल्पसंख्याक मंत्री बलदेव सिंह म्हणाले. पोलिसांनी आरोपींच्या विरोधात गँगस्टर कायद्याखाली गुन्हा नोंदवून त्यांना कठोरात कठोर शिक्षा देण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. योगी आदित्यनाथ सरकारमध्ये महिलांना त्रास देणे अजिबात सहन केले जाणार नाही असे त्यांनी सांगितले. 
 
यापूर्वी आझम खान बुलंदशहरात घडलेला सामूहिक बलात्कार राजकीय कारस्थान असल्याचे म्हटले होते. आपल्या या वक्तव्याबद्दल त्यांना डिसेंबर 2016 सर्वोच्च न्यायालयात विनाशर्त माफी मागावी लागली होती.