शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
4
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
5
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
6
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
7
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
8
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
9
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
10
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
11
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
12
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
13
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
14
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
15
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
16
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
17
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
18
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
19
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
20
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता

जाणून घ्या, युद्धाच्या काळात महत्वपूर्ण ठरणा-या इंडियन एअर फोर्सच्या C-130J हर्क्युलिस विमानाबद्दल..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 24, 2017 17:10 IST

सध्या भारतीय हवाई दलाकडे सहा C-130J हर्क्युलिस विमाने आहेत. भारताने अमेरिकेकडून ही विमाने विकत घेतली आहेत.

ठळक मुद्देहर्क्युलिसमध्ये हवेतच दुस-या विमानांमध्ये इंधन भरण्याची क्षमता आहे.

लखनऊ - उत्तर प्रदेशच्या आगर-लखनऊ एक्सप्रेस वे वर भारतीय हवाई दलाच्या फायटर विमानांचा जो सराव सुरु आहे त्यामध्ये C-130J हर्क्युलिस विमानाचे लँडिंग आणि उड्डाण मुख्य आकर्षण होते. महाकाय आकारमानाचे C-130J हे लष्करी मालवाहतूक विमान आहे. एक्सप्रेस वे च्या छोटयाशा धावपट्टीवर इतक्या मोठया विमानाचे लँडिंग एक चॅलेंज होते. पण भारतीय हवाई दलाच्या वैमानिकांनी हे आव्हान यशस्वीरित्या  पूर्ण केले. 

सध्या भारतीय हवाई दलाकडे सहा C-130J हर्क्युलिस विमाने आहेत. भारताने अमेरिकेकडून ही विमाने विकत घेतली असून, लॉकहीड मार्टिन कंपनीने या विमानांची निर्मिती केली आहे. या सहा विमानापैंकी दोन विमाने बक्क्षी का तालाब विमानतळावर तैनात असतात. चार अत्याधुनिक टरबोप्रॉप इंजिन असलेले हे विमान हवाई दलाची पहिली पसंत आहे. 

कारण वेगवेगळया मोहिमांमध्ये हे विमान प्रचंड उपयुक्त ठरु शकते. हर्क्युलिसमध्ये हवेतच दुस-या विमानांमध्ये इंधन भरण्याची क्षमता आहे. 2008 मध्ये भारतीय हवाई दलाच्या ताफ्यात पहिले  हर्क्युलिस विमान दाखल झाले. हवाई दल भविष्यात आणखी हर्क्युलिस विमाने खरेदी करण्याचा विचार करत आहे. हे विमान अनेक सुविधांनी सुसज्ज आहे. जंगलात पेटलेला वणवा विझवण्यासाठी पाणी मारण्याची खास व्यवस्था या विमानात आहे तसेच युद्धकाळात मोठया प्रमाणावर शस्त्रसाठा, दारुगोळा, बॉम्ब या विमानातून वाहू नेता येऊ शकतात. नैसर्गिक आपत्तीच्या प्रसंगातही मदत आणि बचावकार्यात हे विमान प्रचंड उपयुक्त आहे. 

मंगळवारी सकाळी C-130J हर्क्युलिस विमानाच्या लँडिंगनेच सरावाला सुरुवात झाली. विमान एक्सप्रेस वे वर उतरल्यानंतर सर्वात प्रथम एअर फोर्सचे गरुड कमांडो विमानातून बाहेर आले व त्यांनी धावपट्टीचा ताबा घेतला. त्यानंतर मिराज 2000, जॅग्वार, सुखोई 30 ही विमाने धावपट्टीवर उतरली. लँडिंग करताना फायटर विमाने काही सेकंदांसाठी धावपट्टीवर उतरली व लगेच पुन्हा उड्डाण केले. 

युद्धाच्या काळात रनवे काही कारणाने मिळत नसेल तर अशावेळी एक्सप्रेस वे महत्वाचा असेल त्यामुळे हा सराव खूप महत्वाचा आहे असे हवाई दलाचे उपप्रमुख एअर मार्शल एस बी देव म्हणाले. याआधी हाय वे वर आम्ही मिराज विमाने उतरवली होती. सरकारने ही बाब खूप गांर्भीयाने घेतल्याने मी आनंदी आहे. प्रत्येक नवीन हायवेवर रनवेची सुविधा असली पाहिजे असे देव म्हणाले.