शहरं
Join us  
Trending Stories
1
धगधगतं फ्रान्स! लाखो लोक रस्त्यावर उतरले, काही ठिकाणी दगडफेक; रेल्वे, मेट्रो, बस, शाळा बंद
2
Mumbai Crime: घाटकोपर रेल्वे स्थानकाबाहेर सापडला ३५ वर्षाच्या माणसाचा मृतदेह; कोणामुळे गेला जीव?
3
गोपीचंद पडळकरांचे वादग्रस्त विधान: अजित पवारांनी टोचले कान; म्हणाले, 'भाजपची जबाबदारी फडणवीसांची'
4
"आम्ही मित्र बनलो अन्..." १९ वर्षीय मॉडलनं का उचललं टोकाचं पाऊल?; बॅगेतील चिठ्ठीमुळे उघडलं रहस्य
5
रुममेटशी भांडण, पोलिसांनी थेट झाडल्या गोळ्या, अमेरिकेत भारतीय इंजिनियरचा मृत्यू  
6
बँक खात्यात पैसे नाही, टेन्शन कशाला? आता करा UPI पेमेंट, पुढच्या महिन्यात पैसे भरा; 'यांनी' आणलं जबरदस्त फीचर
7
आधी गोलंदाजीवर ठोकले गेले ५ षटकार, मग वडिलांचं निधन, श्रीलंकन क्रिकेटपटूवर कोसळला दु:खाचा डोंगर   
8
Nilon's Success Journey: लोणचं खायला घालून कंपनीनं कमावले ४०० कोटी; छोट्या किचनमधून झाली सुरुवात, आज परदेशातही आहे व्यवसाय
9
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये पाकिस्तानवर रात्री १.३० वाजताच स्ट्राइक का केले?; CDS चौहान यांचा खुलासा
10
फायद्याची बातमी! पेन्शनचा १००% पैसा टाका इक्विटीत; १ ऑक्टोबरपासून लागू होणार नवा नियम; पैसे कुठे आणि किती वाढत आहेत हे समजणे सोपे होणार
11
..तर महाराष्ट्रात एक नवीन 'खिचडी' पकेल! एकत्र राहण्यासाठी वरून खूपच दबाव आला तर बंडखोरीचे पेव फुटेल
12
आयफोन १७ च्या खरेदीवर ईएमआय किती येईल? जाणून घ्या बँक आणि कॅशबॅक ऑफर्स!
13
सात महिन्यांमध्ये राज्यात वाढले १४ लाख मतदार; राजकीय पक्षांकडून कोणताच आक्षेप नाही
14
iPhone 17: आयफोन १७ मालिकेची विक्री आजपासून सुरू; मुंबईतील अ‍ॅपल स्टोअरबाहेर ग्राहकांची मोठी गर्दी
15
सरकारचे आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर, वितरण २२ सप्टेंबर रोजी मुंबईत होणार; जाणून घ्या यादी
16
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा हल्लाबोल : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार मतचोरांना पाठीशी घालत असल्याचा आरोप, निवडणूक आयोगाचे उत्तर
17
आजचे राशीभविष्य, 19 सप्टेंबर 2025: धनलाभ होण्याचा योग; कोणत्या राशींसाठी आजचा दिवस आनंदाचा?
18
हिंडनबर्ग प्रकरणात अदानींना क्लीन चिट, ४४ पानी आदेशात सेबीने म्हटले; 'व्यवहार' लपवल्याचा पुरावा नाही
19
एका आठवड्यात खड्डे बुजवा, कंत्राटदारांवर कारवाई करा; उच्च न्यायालयाचे महापालिकांना आदेश, राज्यभरात १२ जणांचा मृत्यू
20
मराठा समाजाला मोठा दिलासा, मराठा समाजाला कुणबी जातीचा दर्जा देण्याविरोधातील याचिका फेटाळली

जाणून घ्या, युद्धाच्या काळात महत्वपूर्ण ठरणा-या इंडियन एअर फोर्सच्या C-130J हर्क्युलिस विमानाबद्दल..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 24, 2017 17:10 IST

सध्या भारतीय हवाई दलाकडे सहा C-130J हर्क्युलिस विमाने आहेत. भारताने अमेरिकेकडून ही विमाने विकत घेतली आहेत.

ठळक मुद्देहर्क्युलिसमध्ये हवेतच दुस-या विमानांमध्ये इंधन भरण्याची क्षमता आहे.

लखनऊ - उत्तर प्रदेशच्या आगर-लखनऊ एक्सप्रेस वे वर भारतीय हवाई दलाच्या फायटर विमानांचा जो सराव सुरु आहे त्यामध्ये C-130J हर्क्युलिस विमानाचे लँडिंग आणि उड्डाण मुख्य आकर्षण होते. महाकाय आकारमानाचे C-130J हे लष्करी मालवाहतूक विमान आहे. एक्सप्रेस वे च्या छोटयाशा धावपट्टीवर इतक्या मोठया विमानाचे लँडिंग एक चॅलेंज होते. पण भारतीय हवाई दलाच्या वैमानिकांनी हे आव्हान यशस्वीरित्या  पूर्ण केले. 

सध्या भारतीय हवाई दलाकडे सहा C-130J हर्क्युलिस विमाने आहेत. भारताने अमेरिकेकडून ही विमाने विकत घेतली असून, लॉकहीड मार्टिन कंपनीने या विमानांची निर्मिती केली आहे. या सहा विमानापैंकी दोन विमाने बक्क्षी का तालाब विमानतळावर तैनात असतात. चार अत्याधुनिक टरबोप्रॉप इंजिन असलेले हे विमान हवाई दलाची पहिली पसंत आहे. 

कारण वेगवेगळया मोहिमांमध्ये हे विमान प्रचंड उपयुक्त ठरु शकते. हर्क्युलिसमध्ये हवेतच दुस-या विमानांमध्ये इंधन भरण्याची क्षमता आहे. 2008 मध्ये भारतीय हवाई दलाच्या ताफ्यात पहिले  हर्क्युलिस विमान दाखल झाले. हवाई दल भविष्यात आणखी हर्क्युलिस विमाने खरेदी करण्याचा विचार करत आहे. हे विमान अनेक सुविधांनी सुसज्ज आहे. जंगलात पेटलेला वणवा विझवण्यासाठी पाणी मारण्याची खास व्यवस्था या विमानात आहे तसेच युद्धकाळात मोठया प्रमाणावर शस्त्रसाठा, दारुगोळा, बॉम्ब या विमानातून वाहू नेता येऊ शकतात. नैसर्गिक आपत्तीच्या प्रसंगातही मदत आणि बचावकार्यात हे विमान प्रचंड उपयुक्त आहे. 

मंगळवारी सकाळी C-130J हर्क्युलिस विमानाच्या लँडिंगनेच सरावाला सुरुवात झाली. विमान एक्सप्रेस वे वर उतरल्यानंतर सर्वात प्रथम एअर फोर्सचे गरुड कमांडो विमानातून बाहेर आले व त्यांनी धावपट्टीचा ताबा घेतला. त्यानंतर मिराज 2000, जॅग्वार, सुखोई 30 ही विमाने धावपट्टीवर उतरली. लँडिंग करताना फायटर विमाने काही सेकंदांसाठी धावपट्टीवर उतरली व लगेच पुन्हा उड्डाण केले. 

युद्धाच्या काळात रनवे काही कारणाने मिळत नसेल तर अशावेळी एक्सप्रेस वे महत्वाचा असेल त्यामुळे हा सराव खूप महत्वाचा आहे असे हवाई दलाचे उपप्रमुख एअर मार्शल एस बी देव म्हणाले. याआधी हाय वे वर आम्ही मिराज विमाने उतरवली होती. सरकारने ही बाब खूप गांर्भीयाने घेतल्याने मी आनंदी आहे. प्रत्येक नवीन हायवेवर रनवेची सुविधा असली पाहिजे असे देव म्हणाले.