शहरं
Join us  
Trending Stories
1
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
2
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
3
Asia Cup 2025 : बांगलादेशनं मॅच जिंकली; अफगाणिस्तानला अजूनही स्वबळावर बाजी पलटण्याची संधी, पण...
4
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
5
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
6
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक
7
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
8
दोन मुंबईकरांसोबत नेट प्रॅक्टिस करताना दिसला हिटमॅन रोहित शर्मा; फोटो व्हायरल
9
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
10
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...
11
म्युच्युअल फंड असावा तर असा...! ₹10000 ची SIP गुंतवणूक ₹1.79 कोटींवर पोहोचली, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
12
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
13
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
14
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय
15
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
16
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
17
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
18
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
19
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
20
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग

पालेभाज्या कडाडल्या

By admin | Updated: March 5, 2015 23:05 IST

अवकाळी पावसामुळे येथील गेल्या पाच दिवसांत भाजीमंडईत पालक, कोबी, गाजर आणि वाटाण्याच्या शेंगांचे भाव ६७ टक्क्यांनी वधारले आहेत.

अवकाळी पावसाचा फटका : राजधानी दिल्लीत महागाईचा भडकानवी दिल्ली : अवकाळी पावसामुळे येथील गेल्या पाच दिवसांत भाजीमंडईत पालक, कोबी, गाजर आणि वाटाण्याच्या शेंगांचे भाव ६७ टक्क्यांनी वधारले आहेत.भाज्यांचा घाऊक बाजार होळीनिमित्त शुक्रवारी बंद राहणार असून पुरवठाही जेमतेमच असल्यामुळे येते दोन दिवस भाज्यांचे भाव चढेच राहतील असा अंदाज आहे. बटाटे आणि कांद्याचा पुरवठा पुरेसा असल्यामुळे त्याचे भावही स्थिर आहेत, असे केंद्रीय कृषी मंत्रालयातील अधिकाऱ्याने सांगितले. शेतात पावसाचे पाणी साचल्यामुळे काही भाजीपाल्याचे पीक बाहेर काढण्यास उशीर झाला. पालेभाज्यांचे भाव ३०-३५ टक्के, तर अन्य भाज्यांचे भाव २०-५० टक्के वाढले, असे अझादूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सदस्य राजेंद्र कुमार यांनी सांगितले.स्मॉल फार्मर्स अ‍ॅग्रिकल्चर-बिझनेस कॉन्सॉर्टियमचे व्यवस्थापकीय संचालक प्रवेश शर्मा म्हणाले की, कांदे आणि बटाट्याच्या पुरवठ्यात कोणतीही अडचण नाही. शेतकरी शेतातील साचलेले पाणी बाहेर काढत असून शेतात हालचाल करता येत नसल्यामुळे काही भाजीपाल्यांच्या पुरवठ्यावर विपरीत परिणाम झाला आहे. मदर डेलीच्या दुकानात गुरुवारी बटाचे ११.९०, तर कांदे ३० रुपये किलोने विकले गेले. एवढेच काय फिरत्या विक्रेत्यांनीही जवळपास याच भावात या दोन भाज्या विकल्या. मात्र पालेभाज्या व ज्या भाज्या हिवाळ्यात येतात त्यांचे भाव एकदम उसळले. जो बाजार संघटित नाही तेथे भाज्यांचे भाव निरनिराळे राहिले.४नुकत्याच झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतात पाणी साचून राहिल्याचा परिणाम पालकाचा पुरवठा मंडीत होऊ शकला नाही. होळीनंतर शेतकरी पुन्हा भाज्यांचे पीक काढतील तेव्हा पुरवठा वाढेल, असे ओखला मंडईतील व्यापाऱ्याने सांगितले.