शहरं
Join us  
Trending Stories
1
सोनम वांगचुक यांनीच लोकांना भडकावले; लेहमधील हिंसाचारासाठी गृहमंत्रालयाने धरले जबाबदार
2
'तुमचेही फोटो लावा'; प्रताप सरनाईकांच्या पूरग्रस्तांच्या मदतीच्या किटवरुन अजितदादांनी विरोधकांना सुनावलं
3
"अक्खी दुनिया एक तरफ, मेरा बुमराह एक तरफ"; अभिनेत्याची फरमाईश अन् संजनाची डायलॉगबाजी (VIDEO)
4
"मुस्लिमांनी अयोध्या सोडावी, या मंदिरनगरीत मशिदीच्या बांधकामाला परवानगी दिली जाणार नाही..."; भाजप नेते विनय कटियार यांचं विधान
5
Asia Cup 2025: सलग पाचव्या विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल! आता बांगलादेश-पाक यांच्यात रंगणार सेमीफायनल
6
MBBS आणि वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी १० हजार जागा वाढवण्यास मान्यता; प्रत्येक जागोसाठी १.५० कोटींचा खर्च
7
"रशिया कागदी वाघ नाही, तर...!"; डोनाल्ड ट्रम्प म्हणाले होते 'कागदी वाघ', रशियानं केला पलटवार; म्हणाला...
8
Pahalgam Terror Attack : मोठं यश...! पहलगाम हल्ल्यात दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या मोहम्मद कटारियाला अटक; असा पकडला
9
अभिषेकनं साधला मोठा डाव! आधी हिटमॅन रोहितला ओव्हरटेक केलं, मग गुरबाझचा विक्रमही मोडला
10
३ दिवस भारताचे मंत्री, अधिकारी अमेरिकेत तळ ठोकून; ट्रेड डील, ट्रम्प टॅरिफ, H1B व्हिसावर चर्चा
11
पूरग्रस्तांच्या मदतीसाठी भाजपा खासदार, आमदारांचा मोठा निर्णय, एक महिन्याचे वेतन देणार!
12
IND vs BAN : बांगलादेशच्या नव्या कॅप्टननं नशीब काढलं, पण तो गडबडला! सूर्या म्हणाला, आमच्या मनासारखं झालं
13
एकीकडे डोनाल्ड ट्रम्प यांची 'बोंबाबोंब', दुसरीकडे रशियाने मात्र थेट इराणसोबत केला अणू करार
14
राज ठाकरेंचे CM फडणवीसांना पत्र; सरकारला ५ महत्त्वाच्या सूचना, मदत-जाहिरातबाजीवरून टोचले कान
15
“शेतकऱ्यांना सर्व प्रकारची मदत, ड्रोनने केलेले पंचनामे मान्य करणार”; CM फडणवीसांची ग्वाही
16
त्याला अजून फाशी का दिली नाही? मुख्यमंत्र्यांची हत्या करणाऱ्या आरोपीच्या याचिकेवर कोर्टाने सरकारला फटकारलं
17
सरकार शेतकऱ्यांचे आहे, चिंता करू नका! एकनाथ शिंदे यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिला धीर
18
वायरल 'बाल्कनी' हिमनगाचे केवळ टोक? ९९८ कोटींचा इंडोरा–दिगोरी उड्डाणपूलामुळे प्रभावित मालमत्तांची यादी तयार करण्याचे आदेश
19
“पूरग्रस्त प्रत्येक कुटुंबाला १० किलो गहू-तांदूळ, केंद्राची मदत १०० टक्के येईल”: छगन भुजबळ
20
"प्रत्येकाला स्वाभिमान असतो, त्याने..."; शाहीन शाह आफ्रिदीकडून हॅरिस रौफच्या कृतीचे समर्थन

एलबीटी रद्द झाला तरी कारवाई अटळ !

By admin | Updated: July 31, 2015 23:54 IST

नोंदणी बंधनकारक : व्यापाऱ्यांना अडीच वर्षाचा एलबीटी द्यावाच लागेलनागपूर : राज्य सरकारने ५० कोटीहून अधिक उलाढाल करणाऱ्या व्यापाऱ्यांचाच एलबीटीत समावेश करण्याची घोषणा केली आहे. असे असले तरी गेल्या अडीच वर्षात एलबीटी न भरणाऱ्या व्यापाऱ्यांना तो भरावाच लागेल अन्यथा महापालिकेच्या एलबीटी विभागाकडून त्यांच्यावर कारवाई केली जाणार आहे. ...


नोंदणी बंधनकारक : व्यापाऱ्यांना अडीच वर्षाचा एलबीटी द्यावाच लागेल
नागपूर : राज्य सरकारने ५० कोटीहून अधिक उलाढाल करणाऱ्या व्यापाऱ्यांचाच एलबीटीत समावेश करण्याची घोषणा केली आहे. असे असले तरी गेल्या अडीच वर्षात एलबीटी न भरणाऱ्या व्यापाऱ्यांना तो भरावाच लागेल अन्यथा महापालिकेच्या एलबीटी विभागाकडून त्यांच्यावर कारवाई केली जाणार आहे.
व्यापाऱ्यांना एलबीटीची नोंदणी रद्द करावयाची असल्यास , यासाठी त्यांना मनपाच्या एलबीटी विभागाकडे अर्ज करावा लागेल. २०१३-१४ व २०१४-१५ तसेच एप्रिल ते जुलै २०१५ या कालावधी केलेल्या व्यवसायाबाबत रिटर्न दाखल करावे लागणार आहे. त्यानंतरच व्यापाऱ्यांना एलबीटीची नोंदणी रद्द करता येईल. ती रद्द न केल्यास अशा व्यापाऱ्यांवर एलबीटीची रक्कम पुन्हा वाढणार आहे.
गेल्या वर्षात मनपाला एलबीटीपासून ३३९ कोटीचे उत्पन्न झाले. एप्रिल ते जुलै २०१५ दरम्यान एलबीटीपासून १२१.४२ कोटी मिळाले. तसेच स्टॅम्प ड्युटीच्या माध्यमातून १ टक्का म्हणजेच १७ कोटी मनपाच्या तिजोरीत जमा झाले. ३१ जुलैपर्यत अभय योजना लागू असल्याने एलबीटी न भरणाऱ्या व्यापाऱ्यांवर कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. या मुदतीदरम्यान ८०० व्यापाऱ्यांनी या योजनेचा लाभ घेतला. वास्तविक शहरातील ४० हजार व्यापाऱ्यांनी एलबीटी विभागाकडे नोंदणी केली आहे. (प्रतिनिधी)
चौकट...
आयुक्तांच्या निर्देशानुसार कारवाई
एलबीटी न भरणाऱ्या व्यापाऱ्यांच्या विरोधात आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्या निर्देशानुसार कारवाई केली जाईल, अशी माहिती एलबीटी विभागाचे सहायक आयुक्त मिलिंद मेश्राम यांनी दिली. व्यापाऱ्यांना नोंदणी रद्द करावयाची असल्यास त्यांना अडीच वर्षाचा एलबीटी रिटर्न भरावाच लागेल. त्याशिवाय नोंदणी रद्द होणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
चौकट..
११० प्रतिष्ठान नवीन नियमाच्या कक्षेत
५० कोटीहून अधिक उलाढाल असलेल्या व्यापाऱ्यांचा एलबीटीतील समावेश कायम ठेवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. नागपुरात अशी ११० प्रतिष्ठाने असून यात व्यापारी व उद्योजक यांचा समावेश आहे. त्यांच्यावर नजर ठेवण्याचे काम मनपाच्या एलबीटी विभागाला करावे लागणार आहे. मात्र यातून सुटका होण्यासाठी अनेक व्यापारी शहराबाहेरून कारभारावर नियंत्रण ठेवण्याची शक्यता वर्तवली जात आहे.