शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

हिंदी भवनासमोरील चहावाल्याचा भाषेवर संशोधन ग्रंथ

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2019 08:50 IST

गेली २५ वर्षे दिल्लीच्या हिंदी भवनापुढे फुटपाथवर चहा विकणारे लक्ष्मण राव यांचा अलीकडेच हिंदी भाषा व साहित्यावरील ७२० पानांचा संशोधन ग्रंथ प्रकाशित झाला.

ठळक मुद्देगेली २५ वर्षे दिल्लीच्या हिंदी भवनापुढे फुटपाथवर चहा विकणारे लक्ष्मण राव यांचा अलीकडेच हिंदी भाषा व साहित्यावरील ७२० पानांचा संशोधन ग्रंथ प्रकाशित झाला.लक्ष्मण राव यांच्या ४० वर्षांच्या साहित्य संपदेत ‘मानविकी हिंदी साहित्य’ ग्रंथाच्या निमित्ताने आणखी एकाची भर पडली.चहाचा व्यवसाय करतानाच लक्ष्मण राव यांनी एमए पूर्ण केले. हिंदी साहित्यिकांचे ग्रंथ वाचून काढले.

नितीन नायगावकर 

नवी दिल्ली  - गेली २५ वर्षे दिल्लीच्याहिंदी भवनापुढे फुटपाथवर चहा विकणारे लक्ष्मण राव यांचा अलीकडेच हिंदी भाषा व साहित्यावरील ७२० पानांचा संशोधन ग्रंथ प्रकाशित झाला. लक्ष्मण राव यांच्या ४० वर्षांच्या साहित्य संपदेत ‘मानविकी हिंदी साहित्य’ ग्रंथाच्या निमित्ताने आणखी एकाची भर पडली आहे. एका चहावाल्याची यशोगाथा भारताला तोंडपाठ असली तरीही जगभरातील हजारो वाचकांना या चहावाल्या लेखकाची पुस्तके तोंडपाठ आहेत.

लक्ष्मण राव अमरावतीच्या तळेगाव दशासरचे. गिरणीतील नोकरी गेल्यामुळे १९७५ मध्ये दिल्ली गाठणारे राव यांनी पहिली चार वर्षे विस्थापितांसारखी काढली. जिद्द असून उपयोग नव्हता, कारण हाती पैसा नव्हता. शेवटी आयटीओ येथील हिंदी भवनाच्या परिसरातच पान-बिडीची टपरी सुरू केली. त्यावर कसाबसा उदरनिर्वाह करून १५ वर्षांनी सुरू केलेली चहाची टपरी आजही आहे.मुन्शी प्रेमचंद, शरदचंद्र चटोपाध्याय आदींची पुस्तके वाचल्यावर, शब्दकोषांचा अभ्यास केल्यावर हिंदी भाषा व साहित्यावर संशोधन आवश्यक असल्याचे त्यांना वाटले. त्यातून सुरू झालेल्या लिखाणातूनच ‘मानविकी हिंदी साहित्य’ची निर्मिती झाली.

सकाळी लेखन, वाचन; नंतर चहाची टपरी

एक मुलगा अकाऊंटंट आणि एक बँकेत आहे. ती घरखर्च सांभाळतात; पण ज्या जागेने माझ्यातील लेखक जागवला ती जागा सोडवत नाही म्हणून चहा विकतो,’ असे लक्ष्मण राव सांगतात.

७२० पानी ग्रंथाच्या ४० प्रतींची विक्री टपरीच्या बाजूला लावलेल्या छोट्या स्टॉलवरून व ऑनलाईन झाली. लवकरच त्यांचे ‘बॅरिस्टर गांधी’ हे पुस्तक प्रकाशित होणार आहे. रोज सकाळी पाच-सहा तास लेखन-वाचन आणि दुपारी तीनपासून रात्री नऊपर्यंत चहाची टपरी चालवतात. पुस्तकांच्या विक्रीतून माझा खर्च निघतो. राष्ट्रपतींकडून कौतुक झाले, कित्येक पुरस्कारही मिळाले, देश-विदेशातील माध्यमांनी डोक्यावर घेतले. याचे मोल आहेच; पण चहा टपरीचे मोल कदाचित थोडे जास्तच आहे.

जिद्दीचा प्रवास

चहाचा व्यवसाय करतानाच लक्ष्मण राव यांनी एमए पूर्ण केले. हिंदी साहित्यिकांचे ग्रंथ वाचून काढले. त्यातूनच लिखाणाची प्रेरणा मिळून २५ पुस्तके प्रकाशित झाली. सुरुवातीला एका प्रकाशकाने ‘गेट आऊट’ म्हटले आणि राव यांनी स्वत:चीच प्रकाशन संस्था सुरू केली. हौसेपोटी लिखाण केले नाही, तर पुस्तकविक्रीचा मार्गही शोधला. त्यांच्या कथा, नाटके सत्यघटनांवर आधारित आहेत. 

टॅग्स :hindiहिंदीdelhiदिल्ली