शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
5
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
6
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
7
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
8
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
9
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
10
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
11
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
12
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
13
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
14
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
15
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
16
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
17
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
18
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
19
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
20
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या

हिंदी भवनासमोरील चहावाल्याचा भाषेवर संशोधन ग्रंथ

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2019 08:50 IST

गेली २५ वर्षे दिल्लीच्या हिंदी भवनापुढे फुटपाथवर चहा विकणारे लक्ष्मण राव यांचा अलीकडेच हिंदी भाषा व साहित्यावरील ७२० पानांचा संशोधन ग्रंथ प्रकाशित झाला.

ठळक मुद्देगेली २५ वर्षे दिल्लीच्या हिंदी भवनापुढे फुटपाथवर चहा विकणारे लक्ष्मण राव यांचा अलीकडेच हिंदी भाषा व साहित्यावरील ७२० पानांचा संशोधन ग्रंथ प्रकाशित झाला.लक्ष्मण राव यांच्या ४० वर्षांच्या साहित्य संपदेत ‘मानविकी हिंदी साहित्य’ ग्रंथाच्या निमित्ताने आणखी एकाची भर पडली.चहाचा व्यवसाय करतानाच लक्ष्मण राव यांनी एमए पूर्ण केले. हिंदी साहित्यिकांचे ग्रंथ वाचून काढले.

नितीन नायगावकर 

नवी दिल्ली  - गेली २५ वर्षे दिल्लीच्याहिंदी भवनापुढे फुटपाथवर चहा विकणारे लक्ष्मण राव यांचा अलीकडेच हिंदी भाषा व साहित्यावरील ७२० पानांचा संशोधन ग्रंथ प्रकाशित झाला. लक्ष्मण राव यांच्या ४० वर्षांच्या साहित्य संपदेत ‘मानविकी हिंदी साहित्य’ ग्रंथाच्या निमित्ताने आणखी एकाची भर पडली आहे. एका चहावाल्याची यशोगाथा भारताला तोंडपाठ असली तरीही जगभरातील हजारो वाचकांना या चहावाल्या लेखकाची पुस्तके तोंडपाठ आहेत.

लक्ष्मण राव अमरावतीच्या तळेगाव दशासरचे. गिरणीतील नोकरी गेल्यामुळे १९७५ मध्ये दिल्ली गाठणारे राव यांनी पहिली चार वर्षे विस्थापितांसारखी काढली. जिद्द असून उपयोग नव्हता, कारण हाती पैसा नव्हता. शेवटी आयटीओ येथील हिंदी भवनाच्या परिसरातच पान-बिडीची टपरी सुरू केली. त्यावर कसाबसा उदरनिर्वाह करून १५ वर्षांनी सुरू केलेली चहाची टपरी आजही आहे.मुन्शी प्रेमचंद, शरदचंद्र चटोपाध्याय आदींची पुस्तके वाचल्यावर, शब्दकोषांचा अभ्यास केल्यावर हिंदी भाषा व साहित्यावर संशोधन आवश्यक असल्याचे त्यांना वाटले. त्यातून सुरू झालेल्या लिखाणातूनच ‘मानविकी हिंदी साहित्य’ची निर्मिती झाली.

सकाळी लेखन, वाचन; नंतर चहाची टपरी

एक मुलगा अकाऊंटंट आणि एक बँकेत आहे. ती घरखर्च सांभाळतात; पण ज्या जागेने माझ्यातील लेखक जागवला ती जागा सोडवत नाही म्हणून चहा विकतो,’ असे लक्ष्मण राव सांगतात.

७२० पानी ग्रंथाच्या ४० प्रतींची विक्री टपरीच्या बाजूला लावलेल्या छोट्या स्टॉलवरून व ऑनलाईन झाली. लवकरच त्यांचे ‘बॅरिस्टर गांधी’ हे पुस्तक प्रकाशित होणार आहे. रोज सकाळी पाच-सहा तास लेखन-वाचन आणि दुपारी तीनपासून रात्री नऊपर्यंत चहाची टपरी चालवतात. पुस्तकांच्या विक्रीतून माझा खर्च निघतो. राष्ट्रपतींकडून कौतुक झाले, कित्येक पुरस्कारही मिळाले, देश-विदेशातील माध्यमांनी डोक्यावर घेतले. याचे मोल आहेच; पण चहा टपरीचे मोल कदाचित थोडे जास्तच आहे.

जिद्दीचा प्रवास

चहाचा व्यवसाय करतानाच लक्ष्मण राव यांनी एमए पूर्ण केले. हिंदी साहित्यिकांचे ग्रंथ वाचून काढले. त्यातूनच लिखाणाची प्रेरणा मिळून २५ पुस्तके प्रकाशित झाली. सुरुवातीला एका प्रकाशकाने ‘गेट आऊट’ म्हटले आणि राव यांनी स्वत:चीच प्रकाशन संस्था सुरू केली. हौसेपोटी लिखाण केले नाही, तर पुस्तकविक्रीचा मार्गही शोधला. त्यांच्या कथा, नाटके सत्यघटनांवर आधारित आहेत. 

टॅग्स :hindiहिंदीdelhiदिल्ली