शहरं
Join us  
Trending Stories
1
VIDEO: उत्तरकाशीमध्ये ढगफुटी; १४ सेकंदात सगळं गाव उद्ध्वस्त, घरांसह अनेकजण ढिगाऱ्याखाली गाडले गेले
2
मंत्रिमंडळ बैठकीत ७ मोठे निर्णय; स्टार्टअप उद्योजगता धोरण जाहीर, समृद्धी फ्रेट कॉरिडॉर मंजूर
3
मराठीशी पंगा महागात! निशिकांत दुबेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता; मनसेकडून याचिका दाखल
4
बिहारमध्ये डोमिसाईल पॉलिसी मंजूर; शिक्षक भरतीमध्ये ८५ टक्के बिहारींनाच नोकरी मिळणार
5
पाकिस्तानातील प्रत्येक सहावा व्यक्ती भिकारी; परदेशात पसरलं नेटवर्क, दरवर्षी ११७ ट्रिलियन कमाई
6
सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय; घटस्फोटानंतर 12 कोटी रुपये अन् BMW कार मागणाऱ्या पत्नीला काय मिळाले?
7
डोनाल्ड ट्रंप टॅरिफविरोधात भारतीय सैन्याची एन्ट्री; ५४ वर्षांपूर्वीची कारस्थाने बाहेर काढली...
8
युजवेंद्र चहलने घटस्फोटावर उघडपणे विधान केल्यानंतर Ex-पत्नी धनश्रीची पोस्ट, म्हणाली- शांतता...
9
सरकारांना ईव्हींवर आणखी ऑफर्स द्याव्या लागणार? विक्रीच्या वेगावर निती आयोगाचे वक्तव्य...
10
छोट्या भावावर हात उचलणाऱ्याला कायमचं संपवलं; भावाचा बदला घेणारी २२ वर्षीय 'लेडी डॉन' कोण?
11
नवऱ्याचं पोट फाडलं, मृतदेहावर अ‍ॅसिड ओतलं; बॉयफ्रेंडसाठी तबस्सुमनं गाठला क्रूरतेचा कळस 
12
Jalana: "भाजप प्रवेशाच्या निव्वळ अफवा"; राजेश टोपेंनी चर्चांना दिला पूर्णविराम
13
कथावाचक प्रदीम मिश्रा यांच्या कुबेरेश्वर धाममध्ये चेंगराचेंगरी, २ महिलांचा मृत्यू, अनेकजण जखमी   
14
Satyapal Malik Death: जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे निधन; राम मनोहर लोहिया रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
15
Thane: ठाण्यातील प्रतिष्ठित शाळेत ४ वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार, पालकांच्या आरोपानंतर तपास सुरू
16
“मुंबई महानगरपालिका निवडणुकीत ठाकरे बंधूंना चांगले यश मिळेल”; महायुतीतील नेत्याचा मोठा दावा
17
Satyapal Malik: 'मला सत्य सांगायचे आहे', शेवटच्या पोस्टमध्ये काय म्हणाले होते सत्यपाल मलिक?
18
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! दिवाळीपूर्वी पगारात होणार इतकी वाढ? कोणाला मिळणार फायदा?
19
"Help Me! गर्लफ्रेंडसोबत फिरायला जायचंय..."; बॉयफ्रेंडने लावले UPI स्कॅनर असलेले पोस्टर
20
Mumbai: कबुतरांना दाणे टाकताना रोखलं, वृद्ध व्यक्तीसह त्यांच्या मुलावर लोखंडी रॉडने हल्ला!

हिंदी भवनासमोरील चहावाल्याचा भाषेवर संशोधन ग्रंथ

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2019 08:50 IST

गेली २५ वर्षे दिल्लीच्या हिंदी भवनापुढे फुटपाथवर चहा विकणारे लक्ष्मण राव यांचा अलीकडेच हिंदी भाषा व साहित्यावरील ७२० पानांचा संशोधन ग्रंथ प्रकाशित झाला.

ठळक मुद्देगेली २५ वर्षे दिल्लीच्या हिंदी भवनापुढे फुटपाथवर चहा विकणारे लक्ष्मण राव यांचा अलीकडेच हिंदी भाषा व साहित्यावरील ७२० पानांचा संशोधन ग्रंथ प्रकाशित झाला.लक्ष्मण राव यांच्या ४० वर्षांच्या साहित्य संपदेत ‘मानविकी हिंदी साहित्य’ ग्रंथाच्या निमित्ताने आणखी एकाची भर पडली.चहाचा व्यवसाय करतानाच लक्ष्मण राव यांनी एमए पूर्ण केले. हिंदी साहित्यिकांचे ग्रंथ वाचून काढले.

नितीन नायगावकर 

नवी दिल्ली  - गेली २५ वर्षे दिल्लीच्याहिंदी भवनापुढे फुटपाथवर चहा विकणारे लक्ष्मण राव यांचा अलीकडेच हिंदी भाषा व साहित्यावरील ७२० पानांचा संशोधन ग्रंथ प्रकाशित झाला. लक्ष्मण राव यांच्या ४० वर्षांच्या साहित्य संपदेत ‘मानविकी हिंदी साहित्य’ ग्रंथाच्या निमित्ताने आणखी एकाची भर पडली आहे. एका चहावाल्याची यशोगाथा भारताला तोंडपाठ असली तरीही जगभरातील हजारो वाचकांना या चहावाल्या लेखकाची पुस्तके तोंडपाठ आहेत.

लक्ष्मण राव अमरावतीच्या तळेगाव दशासरचे. गिरणीतील नोकरी गेल्यामुळे १९७५ मध्ये दिल्ली गाठणारे राव यांनी पहिली चार वर्षे विस्थापितांसारखी काढली. जिद्द असून उपयोग नव्हता, कारण हाती पैसा नव्हता. शेवटी आयटीओ येथील हिंदी भवनाच्या परिसरातच पान-बिडीची टपरी सुरू केली. त्यावर कसाबसा उदरनिर्वाह करून १५ वर्षांनी सुरू केलेली चहाची टपरी आजही आहे.मुन्शी प्रेमचंद, शरदचंद्र चटोपाध्याय आदींची पुस्तके वाचल्यावर, शब्दकोषांचा अभ्यास केल्यावर हिंदी भाषा व साहित्यावर संशोधन आवश्यक असल्याचे त्यांना वाटले. त्यातून सुरू झालेल्या लिखाणातूनच ‘मानविकी हिंदी साहित्य’ची निर्मिती झाली.

सकाळी लेखन, वाचन; नंतर चहाची टपरी

एक मुलगा अकाऊंटंट आणि एक बँकेत आहे. ती घरखर्च सांभाळतात; पण ज्या जागेने माझ्यातील लेखक जागवला ती जागा सोडवत नाही म्हणून चहा विकतो,’ असे लक्ष्मण राव सांगतात.

७२० पानी ग्रंथाच्या ४० प्रतींची विक्री टपरीच्या बाजूला लावलेल्या छोट्या स्टॉलवरून व ऑनलाईन झाली. लवकरच त्यांचे ‘बॅरिस्टर गांधी’ हे पुस्तक प्रकाशित होणार आहे. रोज सकाळी पाच-सहा तास लेखन-वाचन आणि दुपारी तीनपासून रात्री नऊपर्यंत चहाची टपरी चालवतात. पुस्तकांच्या विक्रीतून माझा खर्च निघतो. राष्ट्रपतींकडून कौतुक झाले, कित्येक पुरस्कारही मिळाले, देश-विदेशातील माध्यमांनी डोक्यावर घेतले. याचे मोल आहेच; पण चहा टपरीचे मोल कदाचित थोडे जास्तच आहे.

जिद्दीचा प्रवास

चहाचा व्यवसाय करतानाच लक्ष्मण राव यांनी एमए पूर्ण केले. हिंदी साहित्यिकांचे ग्रंथ वाचून काढले. त्यातूनच लिखाणाची प्रेरणा मिळून २५ पुस्तके प्रकाशित झाली. सुरुवातीला एका प्रकाशकाने ‘गेट आऊट’ म्हटले आणि राव यांनी स्वत:चीच प्रकाशन संस्था सुरू केली. हौसेपोटी लिखाण केले नाही, तर पुस्तकविक्रीचा मार्गही शोधला. त्यांच्या कथा, नाटके सत्यघटनांवर आधारित आहेत. 

टॅग्स :hindiहिंदीdelhiदिल्ली