शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

बांधकाम मजुरासमोर रोजगाराचा प्रश्न कायम जिल्‘ातील ६३ हजार मजुरांवर उपासमारीची वेळ लातूर : मागील दोन वर्षांपासून पावसाने ओढ दिल्याने लातूर जिल्‘ात तीव्र पाणीटंचाई

By admin | Updated: September 16, 2015 00:33 IST

मागील दोन वर्षांपासून पावसाने ओढ दिली असल्याने समाधानकारक पाऊस नाही़ पाऊस नसल्याने शेतीत पिके नाहीत़ पिकांनाही पाणी नाही आणि पिण्यासाठीही पाणी नाही़ त्यामुळे तिव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे़ एकूणन दुष्काळग्रस्त परिस्थिती निर्माण झाली आहे़ याचा परिणाम अन्य कामासोबतच बांधकामावरही झाला आहे़ लातूर शहरात महापालिकेने तर जिल्‘ात ग्र्रामपंचायतीने बांधकाम परवाने देणे बंद केले आहे़ सुरु असलेल्या बांधकामावर महापालिका प्रशासन धाड टाकून सामान जप्त करत आहे़ त्यामुळे शहरासह जिल्‘ात ७० टक्के बांधकाम बंद आहेत़ कामे बंद झाली़ त्यामुळे बांधकाम मजुरांपुढे रोजगाराचा प्रश्न कायम आहे़ मागील तीन महिन्यांपासून हाताला काम नसल्याने उपासमारीची वेळ त्यांच्यावर येत आहे़ एकूणच महापालिका प्रशासनाने पाणी बचतीच्या नावावर बांधकामे बंद केली

मागील दोन वर्षांपासून पावसाने ओढ दिली असल्याने समाधानकारक पाऊस नाही़ पाऊस नसल्याने शेतीत पिके नाहीत़ पिकांनाही पाणी नाही आणि पिण्यासाठीही पाणी नाही़ त्यामुळे तिव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे़ एकूणन दुष्काळग्रस्त परिस्थिती निर्माण झाली आहे़ याचा परिणाम अन्य कामासोबतच बांधकामावरही झाला आहे़ लातूर शहरात महापालिकेने तर जिल्‘ात ग्र्रामपंचायतीने बांधकाम परवाने देणे बंद केले आहे़ सुरु असलेल्या बांधकामावर महापालिका प्रशासन धाड टाकून सामान जप्त करत आहे़ त्यामुळे शहरासह जिल्‘ात ७० टक्के बांधकाम बंद आहेत़ कामे बंद झाली़ त्यामुळे बांधकाम मजुरांपुढे रोजगाराचा प्रश्न कायम आहे़ मागील तीन महिन्यांपासून हाताला काम नसल्याने उपासमारीची वेळ त्यांच्यावर येत आहे़ एकूणच महापालिका प्रशासनाने पाणी बचतीच्या नावावर बांधकामे बंद केली आहेत़ बांधकाम मजुरांसाठी मात्र उपाययोजना नाही़ तीन महिन्यांपासून हाताला काम नसल्याने जे मजूर ग्रामीण भागातून येऊन शहरात राहतात़ त्यांची तीन-तीन महिन्याचे घरभाडे थकल्याचेही ते सांगत आहेत़ तर काही मजुरांना इथे काम मिळत नसल्याने १५ दिवस पुण्यात काम करुन पुन्हा १५ दिवसांनी गावाकडे अशी ये-जा करावी लागत आहे़ नोंदणीकृत मजुरांनी कामगार आयुक्तांकडे तीन हजार अनुदानासाठीचे प्रस्ताव मागील सहा महिन्यांपासून मार्च पर्यंत १ हजार ७५७ प्रलंबीत आहेत़ तर मार्च नंतर संबंधीत विभागाचे अधिकारी कार्यालयात उपस्थित राहत नसल्याने हजारो प्रस्ताव धुळखात पडून आहेत़ विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीसह अन्य विविध योजनेच्या आणि नोंदणीचे प्रस्ताव ढिगार्‍यानिशी पडून आहेत़ अशा परिस्थितीत कामगारांना या नैसर्गिक आणि मानवनिर्मित आपत्तीला तोंड द्यावे लागत आहे़ तसेच दैनंदीन रोजगार मिळेल या आशेवर दररोज सकाळी गोलाई परिसरात तर काही कामगार शिवाजी चौकात कामाच्या शोधात येतात़ दिवसभर थांबतात आणि संध्याकाळी रिकाम्या हातानेच घराकडे परतात़ त्यांच्या या दैनंदिन येण्या-जाण्याने मनाची मात्र घुसमट होत आहे़ शेजार्‍या-पाजार्‍याकडे उसनवारी करुनही काही महिने ढकलले़ आता शेजार्‍या बाजार्‍यांचेही हात अखडले जात आहेत़ शासन मात्र काहीच करीत नाही, अशी खंत कामगारांकडून व्यक्त होत आहे़