शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
2
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
3
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
4
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
5
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
6
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
7
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
8
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
9
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
10
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
11
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
12
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
13
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
14
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
15
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
16
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
17
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
18
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
19
Ather IPO GMP Today : Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
20
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  

भारताला मोदीनिती देणारे भाजपचे आधुनिक चाणक्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2019 07:07 IST

कमी कालावधीत भाजपला अपूर्व यश मिळवून दिले

- हरिश गुप्ता।लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : २०१४ मध्ये शहा यांनी हरियाणात मित्रपक्ष इंडियन नॅशनल लोकदलाला दूर सारून जाटांचे प्राबल्य असलेल्या हरियाणात स्वबळावर निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला व सत्ता मिळवली. नंतर त्यांनी शब्दश: एकहाती झारखंड भाजपला मिळवून दिला. झारखंड राज्य स्थापन झाल्यापासून कधीही स्थिर सरकार त्याने पाहिले नव्हते. ते शहा यांनी दिले. या दोन्ही राज्यांत मुख्यमंत्रीपदी त्यांनी अपरिचित चेहरे दिले एवढेच नाही तर संपूर्ण पाच वर्षे ते त्या पदावर राहतील अशी व्यवस्था केली. असेच महाराष्ट्रात घडले. तेथे शिवसेनेने विधानसभा निवडणूक स्वबळावर लढली होती व शहा यांनी शिवसेनेच्या दबाबाला भीक घालण्यास नकार दिला.२८८ सदस्यांच्या विधानसभेत भाजप हा सर्वात जास्त आमदार असलेला पक्ष बनला होता. स्पष्ट बहुमताला खूपच कमी आमदार त्याला लागणार होते. त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाजपला विनाअट पाठिंबा देण्याची तयारी दाखवली होती. त्यामुळे शिवसेनेने नरमाईची भूमिका घेऊन भाजपसोबत राहण्याचा निर्णय घेतला. हा क्षण नरेंद्र मोदी-अमित शहा यांच्यासाठी ऐतिहासिक ठरला.या जोडीने जम्मू आणि काश्मीरमध्ये मेहबुबा मुफ्ती यांच्यासोबत आघाडी करून सरकार स्थापन केले व ऐतिहासिक अशी घटना घडवली. तोपर्यंत अशी मोठी आघाडी आकाराला आलेली नव्हती. दुर्देवाने हा प्रयोग फार दिवस टिकला नाही. यानंतर दिल्लीत २०१५मध्ये अरविंद केजरीवाल यांच्या हस्ते आणि बिहारमध्ये २०१६ मध्ये नितीश कुमार यांच्या हस्ते विधानसभा निवडणुकीत भाजपला अपमानास्पद पराभव पत्करावा लागला तो हा काळ अमित शहा यांच्यासाठी वाईट ठरला. आसाममध्ये अमित शहा यांना पहिले भाजपचे सरकार स्थापन करण्यात यश मिळाले.पुढच्या वर्षी उत्तर प्रदेश, उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणूक मोठ्या फरकाने जिंकून इतिहास घडवला. या तिन्ही राज्यांत मुख्यमंत्रीपदी नवे चेहरे त्यांनी दिले. हे तिन्ही मुख्यमंत्री नरेंद्र मोदी व मनोहरलाल खट्टर यांच्यासारखेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पूर्णवेळ पदाधिकारी व कार्यकर्ते होते. पंजाबमध्ये सुरक्षा व इतर प्रश्नांमुळे भाजप-शिरोमणी अकाली दलाने आम आदमी पक्षाच्या पराभवासाठी जोरदार प्रयत्न केले आणि कॅप्टन अमरिंदरसिंग तेथे मुख्यमंत्री बनले.

परंतु २०१८ च्या सुरवातीला अमित शहा यांनी माकपच्या पकडीतून त्रिपुरा खेचून घेतले. ही घटना शब्दश: अपूर्व होती. मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थानात मात्र शहा यांना मोठा झटका बसला. राजस्थानात अशोक गेहलोत आणि कमलनाथ मध्य प्रदेशात फार काळ टिकाव धरणार नाहीत याची शहा यांना खात्री आहे.आपल्या अतिशय कमी कालावधीच्या राजकीय कारकिर्दीत भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी जे यश मिळवले ते डोके चक्रावून टाकणारे आहे. राजकीय पंडितांनाही काही निष्कर्ष काढता येत नाही. शहा यांच्यावर जे फौजदारी गुन्हे दाखल झाले होते त्यामुळे २०१३ पर्यंत छोट्याशा खोलीच्या कोपऱ्यात झोपणारे अमित शहा यांनी ते पक्षाचे अध्यक्ष व्हायच्या आधीच पक्षासाठी एकामागून एक कामे केली होती. त्यांनी पहिला धक्का दिला तो विरोधकांना...२०१४ आणि २०१९ या दोन्ही लोकसभा निवडणुकांमध्ये भाजपला एकहाती विजय मिळवून देण्याचा करिष्मा करणारे नरेंद्र मोदी यांची कार्यपद्धती अतिशय शिस्तबद्ध आहे. कोणत्याही मुद्यांचा बारकाईने अभ्यास करून, त्याच्या विविध पैलूंवर चिंतन आणि मनन करून मग त्यावर आपले मत ते बनवित असतात. दृढनिश्चयी स्वभाव, झोकून देऊन काम करण्याची वृत्ती या त्यांच्या गुणांमुळेच ते दिवसाचे १७ ते १८ तास कार्यरत राहू शकतात. मोदींकडे असलेले प्रभावी प्रचारतंत्र हे त्यांच्या लोकप्रियतेचे गमक आहे. देशाच्या विकासाचा ध्यास घेऊन अहोरात्र कार्यरत असलेल्या या व्यक्तिमत्वाने देशभरातील तरुणाईच्या मनावर गारुड केले आहे. मोदी, मोदी आणि मोदी हा एकमेव ब्रॅँड सध्या भारतात चालतो आहे.

टॅग्स :Amit Shahअमित शहाLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९