शहरं
Join us  
Trending Stories
1
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
2
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
3
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
4
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
5
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
6
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
7
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
8
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
9
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
10
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
11
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
12
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
13
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
14
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
15
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
16
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
17
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
18
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
19
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
20
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...

तीन वर्षांमध्ये 8 लाख भाविकांनी घेतले अमरनाथाचे दर्शन

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2018 15:29 IST

गेल्या तीन वर्षांच्या कालावधीमध्ये 8 लाख लोकांनी अमरनाथाचे दर्शन घेतल्याची माहिती जम्मू आणि काश्मीर राज्याच्या विधानसभेत आज गेण्यात आली. यासंदर्भात नॅशनल कॉन्फरन्सचे सदस्य मियाँ अल्ताफ अहमद यांनी माहिती विचारली होती. ​​​​​​​

जम्मू- गेल्या तीन वर्षांच्या कालावधीमध्ये 8 लाख लोकांनी अमरनाथाचे दर्शन घेतल्याची माहिती जम्मू आणि काश्मीर राज्याच्या विधानसभेत आज गेण्यात आली. यासंदर्भात नॅशनल कॉन्फरन्सचे सदस्य मियाँ अल्ताफ अहमद यांनी माहिती विचारली होती.आरोग्यमंत्री बली भगत यांनी अल्ताफ यांच्या प्रश्नावर सादर केलेल्या लिखित उत्तरात 2015मध्ये सर्वोच्च म्हणजे 3 लाख 52 हजार 771 भाविकांनी दर्शन घेतल्याचे स्पष्ट केले. हिजबुल मुजाहिदिनचा कमांडर बुरहान वानीला मारल्यानंतर काश्मीर खोऱ्यात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. त्यामुळे 2016 मध्ये भक्तांची संख्या कमी झाली होती. यावर्षात 2 लाख 20 हजार 490 लोकांनी अमरनाथ यात्रा केली होती.मागच्यावर्षी या संख्येत वाढ होऊन भक्तांची संख्या 2 लाख 60 हजार 3वर जाऊन पोहोचल्याचे त्यांनी उत्तरात म्हटले आहेयगेल्या वर्षी अमरनाथाचे दर्शन घेण्यासाठी आलेल्या प्रवाशांच्या बसवर झालेल्या हल्ल्यामध्ये 15 जणांचे प्राण गेले होते. जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात सुरू होणारी ही यात्रा पहलगाम आणि बाल्ताल अशा दोन मार्गांनी केली जाते. पहलगाममार्गे अमरनाथ गुहेपर्यंत पोहोचण्यासाठी 45 किमी अंतर पार करावे लागते तर बाल्ताल मार्ग 16 किमीचा आहे.

2017मध्ये 1 कोटी परदेशी पर्यटकांनी दिली भारताला भेट

2017 हे वर्ष भारतीय पर्यटन क्षेत्राला नवी ऊर्जा देणारे ठरले आहे. या वर्षभरात भारताला 1 कोटी पर्यटकांनी भेट दिली आहे. त्यामुळे भारताला 27 अब्ज डॉलर्स इतके उत्पन्नही मिळाले आहे. परदेशी पर्यटकांनी भारतात येण्याचा हा नवा उच्चांक प्रस्थापित झाल्यामुळे या क्षेत्रात उत्साहाचे वातावरण आहे. 2018मध्येही अशाच प्रकारे मोठ्या संख्येने पर्यटक भारतात येतील अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.याबाबत कोची येथे बोलताना केंद्रीय पर्यटन मंत्री के. जे. अल्फोन्सम्हणाले, "पर्यटन क्षेत्राची वाढ चांगल्या प्रकारे होत आहे. भारतामध्ये प्रत्येक व्यक्तीला देण्यासारखं सर्वकाही उपलब्ध असल्यामुळे पर्यटकांची संख्या अजूनही भरपूर वाढेल अशी मला आशा आहे. लोकांना सेवादेण्यासाठी आम्ही आणखी प्रयत्न करत आहोत."देशाच्या जीडीपीमध्ये पर्यटनक्षेत्राचा वाटा 6.88 टक्के इतका असून 2017मधील एकूण रोजगारांमध्ये 12 टक्के रोजगार या क्षेत्रात होते. असेही अल्फोन्स म्हणाले. यामुळे टुरिझम कॉम्पिटिटिव्ह इंडेक्समध्ये भारताची क्रमवारी सुधारली आहे.  2013 साली भारताचा क्रमांक 65 होता तो आता 2017 साली 25 वर गेला आहे. केंद्र सरकारने सुरु केलेल्या नव्या स्वदेश दर्शन योजनेमुळे पायाभूत सुविधांचा विकास झाला आहे आणि त्यामुळे पर्यटन क्षेत्राचा विकास होत असल्याचे मत मांडले जात आहे. त्याचप्रमाणे ईशान्य भारतातील राज्यांमध्येही पर्यटन  क्षेत्र वृद्धींगत होण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत त्यामुळेही पर्यटकांची संख्या वाढत आहे.

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरSrinagarश्रीनगर