शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
3
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
4
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
5
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
6
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
7
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
8
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
9
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
10
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
11
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
12
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
13
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
14
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
15
संजय कपूर यांनी करिश्माला म्हटलं होतं 'गोल्ड डिगर', घटस्फोटानंतर पोटगीमध्ये मिळालेली इतकी रक्कम
16
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
17
मंदिरासमोर फेकले मांस, मुख्यमंत्री संतापले; समाजकंटकास पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश
18
खंडाळ्यात जुन्या वैमनस्यातून दोन गटात हिंसक हाणामारी; एकाचा मृत्यू, दोन जण जखमी
19
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
20
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI

मतदारनोंदणीचा अखेरचा दिवस तोबा गर्दीचा

By admin | Updated: September 18, 2014 13:17 IST

बुधवारी अखेरच्या दिवशी मतदारनोंदणी करण्यास नागरिकांनी शहरातील विविध ठिकाणच्या केंद्रांवर तोबा गर्दी करीत लांबर्पयत रांगा लावल्या होत्या.

पिंपरी : बुधवारी अखेरच्या दिवशी मतदारनोंदणी करण्यास नागरिकांनी शहरातील विविध ठिकाणच्या केंद्रांवर तोबा गर्दी करीत लांबर्पयत रांगा लावल्या होत्या. मात्र, यामुळे कर्मचा:यांची तारांबळ उडाली होती. अपु:या कर्मचा:यांमुळे अर्ज तपासणीत अधिक वेळ जात असल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला. पिंपरी, चिंचवड व भोसरी या तिन्ही मतदार संघांच्या केंद्रावर आज एका दिवशी तब्बल 5 हजार 7 3क् अर्ज जमा झाले.
पुढील महिन्यात 15 तारखेस होणा:या विधानसभा निवडणुकीत मतदानाची संधी मिळावी म्हणून 1 ऑगस्ट ते 17 सप्टेंबर या कालावधीत मतदारनोंदणी मोहीम राबविली गेली. आज बुधवारी त्याचा अखेरचा दिवस होता. ही संधी साधण्यासाठी नागरिकांची धावपळ सुरू होती. सकाळपासूनच नागरिकांनी शहरातील विविध केंद्रांवर गर्दी केली होती. संबंधित कागदपत्रे घेऊन नागरिकांनी लांबर्पयत रांगा लावल्या होत्या. दुपारनंतर गर्दी वाढत गेली. 
केंद्रावर कर्मचारीवर्ग अपुरा असल्याने नागरिकांना अर्ज सादर करण्यास अधिक वेळ जात होता. त्यामुळे अधिक काळ रांगेत उभे राहून प्रतीक्षा करावी लागत होती. त्यामुळे रांग कासवगतीने पुढे सरकत 
होती. त्यात दुपारी जेवणाच्या सुटीसाठी कर्मचा:यांनी कामकाज 
बंद केले. त्यामुळे नागरिकांना ताटकळत उभे राहावे लागले. कामकाज बंद ठेवण्यापेक्षा काही कर्मचा:यांची नेमले असते, तर नागरिकांची गैरसोय टळली असती. 
चिंचवडमधून 2 हजार 29 अर्ज
चिंचवड मतदारसंघाच्या एकूण 4 केंद्रांवर 2 हजार 29 अर्ज प्राप्त झाले. थेरगावच्या महापालिका शाळा केंद्रात 12क्क्, महापालिकेच्या मुख्य कार्यालयात 5क्क्, एका केंद्रावर 3क्क् अर्ज जमा झाले. ‘ड’ प्रभाग कार्यालयात अधिकारीच जागेवर नसल्याचे सुरक्षारक्षक सर्वाना सांगत असल्याने तेथे एकही अर्ज प्राप्त झाला नाही. 1 ऑगस्ट ते 17 सप्टेंबर या कालावधीत 6,2क्4 अर्ज प्राप्त झाले, अशी माहिती निवडणूक अधिकारी भानुदास गायकवाड यांनी दिली. 
भोसरीतून 2 हजार अर्ज
भोसरी मतदारसंघात आज एका दिवसात 2 हजार अर्ज प्राप्त झाले. सर्व अर्ज तपासणी करून स्वीकारण्यात आल्याने ते वैध ठरले आहेत. सायंकाळी साडेपाचर्पयत उपस्थित सर्वाचे अर्ज घेण्यात आले. नेहरुनगर येथील अण्णासाहेब मगर स्टेडिअम केंद्रावर लांबर्पयत रांगा लागल्या होत्या. एकूण 1क् केंद्रांवर एकूण 8 हजार अर्ज जमा झाले आहेत, असे निवडणूक अधिकारी साहेबराव गायकवाड यांनी सांगितले.
पिंपरीत 1 हजार 7क्1 अर्ज
पिंपरी मतदारसंघात शेवटच्या दिवशी 1,7क्1 अर्ज मिळाले. अर्ज सायंकाळी साडेपाचर्पयत घेतले गेले. प्राधिकरणातील केशवराव हेडगेवार भवन व पिंपरीतील नारायण मेघाजी लोखंडे भवन या केंद्रांवर रांगा होत्या. मोहिमेत 2 केंद्रांवर एकूण 5 हजार 455 हजार अर्ज स्वीकारण्यात आले, असे निवडणूक अधिकारी यशवंत माने यांनी सांगितले.(प्रतिनिधी)
 
अखेरच्या दिवशी मतदारांना जाग  
नोंदणीच्या अखेरच्या दिवशी नागरिकांना जाग आली. त्यामुळे गेल्या दोन दिवसांपासून अर्ज देण्यासाठी नागरिकांची संख्या वाढत होती. आज गर्दीने विक्रमच केला. या गर्दीचा फायदा उठवीत काही कार्यकर्ते बोगस अर्ज सादर करून, बोगस मतदारनोंदणी करण्याचा प्रय} करीत होते. काही एजंट मंडळीही परिसरात दिसत होती. त्यामुळे तपासणी करूनच अर्ज घेतले जात होते. 
कागदपत्रंसाठी धावपळ 
रांगेत उभे असलेल्या नागरिकांचे अर्ज कर्मचारी तपासत होते. आवश्यक कागदपत्रे नसल्यास ते जोडण्यास सांगितले जात होते. ऐनवेळी संबंधित कागदपत्रे गोळा करण्यासाठी नागरिकांना कसरत करावी लागली. पुन्हा घरी किंवा कार्यालयात जाऊन कागदपत्रे आणण्याची वेळ अनेकांवर आली. 
काही केंद्रावर वाद
कर्मचारी आवश्यक कागदपत्रंची सक्ती करीत होते. सायंकाळी 5 ची मुदत संपल्यानंतरही अनेक केंद्रावर आले होते. ते अर्ज घेण्यासाठी मागणी करीत होते. यावरून कर्मचा:यांशी हुज्जत घातली. अखेर केंद्रातील सर्वाचे अर्ज सायंकाळी 6.3क् र्पयत घेतले गेले. हा प्रकार थेरगाव मनपा शाळा केंद्रात घडला. 
 
लोकसभा निवडणुकीनंतर  त्वरित विशेष मोहीम 
राबवून 31 जुलैर्पयत मतदारनोंदणी करण्यात आली. या मोहिमेत अर्ज जमा करून नावनोंदणी केलेल्या मतदारांना 2क् सप्टेंबरपासून त्यांच्या संबंधित शाळेतील केंद्रावर ओळखपत्रचे वाटप केले जाणार आहे. संबंधित केंद्र वा मतदान सहायता केंद्रावरून मतदारांनी ओळखपत्र घेऊन जावीत, असे आवाहन तिन्ही मतदारसंघाच्या निवडणूक अधिका:यांनी केले आहे.
 
विधानसभेपूर्वी बुधवारी संपलेल्या मोहिमेत तिन्ही मतदारसंघांत एकूण 19 हजार 659 अर्ज प्राप्त झाले. सर्वाधिक 8 हजार अर्ज भोसरी मतदारसंघातून आले आहेत. पाठोपाठ चिंचवडमधून 6 हजार 2क्4 आणि पिंपरीतून 5 हजार 455 अर्ज जमा करण्यात आले. या अर्जामध्ये मतदारनोंदणीचे सर्वाधिक अर्ज आहेत. तसेच, नाव व पत्त्यामध्ये दुरुस्ती, मतदारसंघात बदल आदी अर्जही दाखल झाले आहेत.