शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
7
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
8
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
9
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
10
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
11
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
12
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
13
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
14
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
15
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
16
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
17
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
18
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
19
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
20
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

मोदी सरकारचे अखेरचे बजेट अंतरिम असणार की लोकप्रिय?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2019 06:28 IST

परंपरा मोडीत काढणार : अनेक सवलतींची घोषणा होण्याची चर्चा

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सध्याच्या केंद्रातील सरकारचा शेवटचा अर्थसंकल्प १ फेब्रुवारी रोजी सादर होणार आहे. लोकसभा निवडणुकीआधी सादर होणारा हा अर्थसंकल्प आधीच्या परंपरेप्रमाणे अंतरिम असेल की लोकप्रिय, असा प्रश्न लोकांच्या मनात निर्माण झाला आहे.

या सरकारचे शेवटचे काही महिने राहिले आहेत. स्थापित परंपरेनुसार अशा अंतरिम अर्थसंकल्पात सरकार फार मोठ्या घोषणा करीत नाही. या अर्थसंकल्पात चालू वित्त वर्षाच्या उरलेल्या काही महिन्यांच्या खर्चालाच संसदेची मंजुरी घेते. पूर्ण अर्थसंकल्प मांडण्याची जबाबदारी नव्या सरकारवर सोडली जाते. नियमानुसार, कोणत्याही चर्चेविना मांडण्यात आलेल्या या खर्चाच्या आराखड्यास लोकसभेत मंजुरी घेता येते.

गेल्या महिन्यात झालेल्या निवडणुकांत भाजपाने मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगढ ही तीन मोठी राज्ये गमावली आहेत. निवडणुका तोंडावर असताना भाजपाला मोठ्या नामुश्कीला सामोरे जावे लागले. त्यामुळे लोकांना खूश करण्यासाठी हे सरकार परंपरा मोडीत काढून लोकप्रिय घोषणा करू शकते, असे जाणकारांना वाटते. विशेषत: मध्यमवर्गाला आकर्षित करण्यासाठी प्राप्तिकर सवलत वाढविण्याचा निर्णय सरकारकडून घेतला जाऊ शकतो, असा अंदाज आहे. (वृत्तसंस्था)अलीकडील इतिहासात निवडणूक वर्षात काय घडले?

  • २०१४-१५ मध्ये तत्कालीन वित्तमंत्री पी. चिदम्बरम यांनी अशाच पद्धतीने निवडणूकपूर्व अर्थसंकल्प सादर केला होता. अर्थव्यवस्थेला गती देण्यासाठी खर्च वाढीची तरतूद करण्याचा मोह टाळून त्यांनी तुटीची उद्दिष्टे कायम ठेवली होती.
  • २००९-१० च्या निवडणूकपूर्व अर्थसंकल्पात तत्कालीन वित्तमंत्री प्रणव मुखर्जी यांनी मोठ्या घोषणा टाळल्या. त्या वर्षात सरकारने शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली होती. पण ंअर्थसंकल्पाच्या फार आधीच या योजनेची अंमलबजावणी झाली होती.
  • वित्तवर्ष २००४-०५ मध्ये तत्कालीन वित्तमंत्री जसवंतसिंग यांनी त्या वेळच्या काही योजनांचा विस्तार करून लाभार्थ्यांची संख्या वाढविली होती. मात्र, नवीन करसवलती जाहीर करण्याचे त्यांनीही टाळलेच होते.
टॅग्स :Budgetअर्थसंकल्प