शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

मोदी सरकारचे अखेरचे बजेट अंतरिम असणार की लोकप्रिय?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2019 06:28 IST

परंपरा मोडीत काढणार : अनेक सवलतींची घोषणा होण्याची चर्चा

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सध्याच्या केंद्रातील सरकारचा शेवटचा अर्थसंकल्प १ फेब्रुवारी रोजी सादर होणार आहे. लोकसभा निवडणुकीआधी सादर होणारा हा अर्थसंकल्प आधीच्या परंपरेप्रमाणे अंतरिम असेल की लोकप्रिय, असा प्रश्न लोकांच्या मनात निर्माण झाला आहे.

या सरकारचे शेवटचे काही महिने राहिले आहेत. स्थापित परंपरेनुसार अशा अंतरिम अर्थसंकल्पात सरकार फार मोठ्या घोषणा करीत नाही. या अर्थसंकल्पात चालू वित्त वर्षाच्या उरलेल्या काही महिन्यांच्या खर्चालाच संसदेची मंजुरी घेते. पूर्ण अर्थसंकल्प मांडण्याची जबाबदारी नव्या सरकारवर सोडली जाते. नियमानुसार, कोणत्याही चर्चेविना मांडण्यात आलेल्या या खर्चाच्या आराखड्यास लोकसभेत मंजुरी घेता येते.

गेल्या महिन्यात झालेल्या निवडणुकांत भाजपाने मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगढ ही तीन मोठी राज्ये गमावली आहेत. निवडणुका तोंडावर असताना भाजपाला मोठ्या नामुश्कीला सामोरे जावे लागले. त्यामुळे लोकांना खूश करण्यासाठी हे सरकार परंपरा मोडीत काढून लोकप्रिय घोषणा करू शकते, असे जाणकारांना वाटते. विशेषत: मध्यमवर्गाला आकर्षित करण्यासाठी प्राप्तिकर सवलत वाढविण्याचा निर्णय सरकारकडून घेतला जाऊ शकतो, असा अंदाज आहे. (वृत्तसंस्था)अलीकडील इतिहासात निवडणूक वर्षात काय घडले?

  • २०१४-१५ मध्ये तत्कालीन वित्तमंत्री पी. चिदम्बरम यांनी अशाच पद्धतीने निवडणूकपूर्व अर्थसंकल्प सादर केला होता. अर्थव्यवस्थेला गती देण्यासाठी खर्च वाढीची तरतूद करण्याचा मोह टाळून त्यांनी तुटीची उद्दिष्टे कायम ठेवली होती.
  • २००९-१० च्या निवडणूकपूर्व अर्थसंकल्पात तत्कालीन वित्तमंत्री प्रणव मुखर्जी यांनी मोठ्या घोषणा टाळल्या. त्या वर्षात सरकारने शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली होती. पण ंअर्थसंकल्पाच्या फार आधीच या योजनेची अंमलबजावणी झाली होती.
  • वित्तवर्ष २००४-०५ मध्ये तत्कालीन वित्तमंत्री जसवंतसिंग यांनी त्या वेळच्या काही योजनांचा विस्तार करून लाभार्थ्यांची संख्या वाढविली होती. मात्र, नवीन करसवलती जाहीर करण्याचे त्यांनीही टाळलेच होते.
टॅग्स :Budgetअर्थसंकल्प