शहरं
Join us  
Trending Stories
1
कबड्डीपटू राणा बालचौरियाची गोळ्या घालून हत्या; सिद्धू मुसेवाला हत्येचा बदला घेतल्याची चर्चा
2
IND vs SA T20I: अक्षर पटेल OUT! फक्त ३ वनडे खेळलेला खेळाडू ३ वर्षांनंतर टीम इंडियात
3
भाजपचा विजयी चौकार की काँग्रेस ठरणार ‘गेमचेंजर’? शिवसेना, राष्ट्रवादीसाठी अस्तित्वाची लढाई
4
IPL 2026 Auction Live Streaming : क्रिकेटर्सवर होणार पैशांची 'बरसात'! कधी अन् कुठे पाहता येईल लिलाव?
5
कुख्यात गँगस्टर सुभाषसिंह ठाकूरचा ताबा मिरा भाईंदर पोलिसांकडे; मंगळवारी कोर्टात हजर करणार
6
कोंबड्यांचा व्यवसायाआड चालणारा अमली पदार्थांचा कारखाना पोलिसांकडून उद्ध्वस्त, ११ अटकेत
7
पार्थ पवारांचा भागीदार दिग्विजय पाटील अखेर पोलिसांसमोर; सव्वा महिन्याने बावधन पोलीस ठाण्यात
8
मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला रस्ता वळवताना नियोजनाचा अभाव; शिक्षिकेचा उपचाराअभावी मृत्यू
9
बालविवाह थांबवला..! नवरदेव लग्न मंडपात जाणार होता, पण त्यापूर्वीच दामिनी पथकाची धडक अन्...
10
डोंबिवलीत ४० वार करून खून करणारे आरोपी १२ तासात गजाआड, पाच दिवसांची पोलिस कोठडी
11
लष्कर-ए-तोयबाचा कमांडर साजिद जट्टने रचला पहलगाम हल्ल्याचा कट; NIA चा खुलासा
12
फुटबॉल जगतातील दिग्गजाला जय शाह यांनी दिलं खास निमंत्रण; मेस्सी म्हणाला, "मी नक्कीच पुन्हा येईन!"
13
रणजित गायकवाड यांची हल्ल्यानंतर १० दिवसांनी मृत्यूशी झुंज अपयशी, त्याच दिवशी आरोपी गजाआड
14
उधमपूरमध्ये जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांसोबत चकमक; सुरक्षा दलाने संपूर्ण परिसराला घेरले
15
IPL 2026 Auction : खर्चासाठी MI च्या पर्समध्ये फक्त पावणे तीन कोटी; तरीही ते निवांत कारण...
16
शाब्बास पोरा! ४० लाखांचं पॅकेज सोडून वडिलांचं स्वप्न केलं साकार; आधी IPS, मग झाला IAS
17
"बांग्लादेशींना महाराष्ट्रात आणून सत्ताधाऱ्यांच्या जवळचे लोक ड्रग्स कारखाने चालवत आहेत..."
18
उद्धव-राज ठाकरे एकत्र आले अन् काँग्रेसही सोबत गेली तर..? देवेंद्र फडणवीसांचे स्पष्ट उत्तर
19
सुट्टी नाही! रोहित-विराटसाठीच नव्हे तर BCCI नं गिल आणि सूर्यासाठीही केली 'या' गोष्टीची सक्ती
Daily Top 2Weekly Top 5

काश्मीरमधील हल्ल्यात लष्कर-ए-तय्यबाचा हात, TRFच्या माध्यमातून करतोय कारवाया

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2021 18:50 IST

TRF लष्कर-ए-तैयबाच्या सहयोगी संघटनांपैकी एक आहे.

नवी दिल्ली:जम्मू-काश्मीरमध्ये सातत्याने होणाऱ्या नागरिकांच्या हत्यांमुळे 'द रेझिस्टन्स ग्रुप'(TRF) ही दहशतवादी संघटना प्रकाशझोतात आली आहे. काश्मिरी व्यापारी माखनलाल बिंद्रू आणि अन्य दोन नागरिकांच्या हत्येची जबाबदारी या संघटनेनं स्विकारली आहे.

68 वर्षीय बिंद्रू यांची मंगळवारी संध्याकाळी 7 वाजता दहशतवाद्यांनी गोळ्या घालून हत्या केली होती. बिंद्रूंची त्याच्या फार्मसीमध्येच हत्या झाली. बिंद्रूंच्या हत्येच्या काही मिनिटांपूर्वी बिहारमधील स्थलांतरित वीरेंद्र पासवानचीही हत्या करण्यात आली. गरीब कुटुंबातील वीरेंद्र पाणीपुरी विकायचे. त्याचवेळी स्थानिक टॅक्सी स्टँडचे अध्यक्ष मोहम्मद सफी लोन यांचीही बांदीपोरा जिल्ह्यात हत्या झाली.

यानंतर गुरुवारी दहशतवाद्यांनी शाळेत घुसून दोन शिक्षकांची हत्या केली. ते दोघे शीख आणि हिंदू समाजाचे होते. दरम्यान, गेल्या आठवड्यातच काश्मीरमध्ये 7 नागरिकांचा बळी गेला आहे. यापैकी तीन हिंदू-शीख समाजातील होते. या वर्षी आतापर्यंत राजकीय कार्यकर्त्यांसह 25 नागरिक मारले गेले आहेत.

लष्कर-ए-तय्यबाची संघटना

दहशतवादी संघटना टीआरएफ ही पाकिस्तानची दहशतवादी संघटना लष्कर-ए-तय्यबाची एक आघाडी मानली जाते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार काही दिवसांपूर्वीच टीआरएफचे ओव्हरग्राउंड कामगार पूर्णपणे मुख्य कॅडरमध्ये बदलले आहेत आणि लोकांना लक्ष्य करत आहेत. 

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरterroristदहशतवादीLashkar-e-taibaलष्कर-ए-तोयबा