शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

काश्मीरमधील हल्ल्यात लष्कर-ए-तय्यबाचा हात, TRFच्या माध्यमातून करतोय कारवाया

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2021 18:50 IST

TRF लष्कर-ए-तैयबाच्या सहयोगी संघटनांपैकी एक आहे.

नवी दिल्ली:जम्मू-काश्मीरमध्ये सातत्याने होणाऱ्या नागरिकांच्या हत्यांमुळे 'द रेझिस्टन्स ग्रुप'(TRF) ही दहशतवादी संघटना प्रकाशझोतात आली आहे. काश्मिरी व्यापारी माखनलाल बिंद्रू आणि अन्य दोन नागरिकांच्या हत्येची जबाबदारी या संघटनेनं स्विकारली आहे.

68 वर्षीय बिंद्रू यांची मंगळवारी संध्याकाळी 7 वाजता दहशतवाद्यांनी गोळ्या घालून हत्या केली होती. बिंद्रूंची त्याच्या फार्मसीमध्येच हत्या झाली. बिंद्रूंच्या हत्येच्या काही मिनिटांपूर्वी बिहारमधील स्थलांतरित वीरेंद्र पासवानचीही हत्या करण्यात आली. गरीब कुटुंबातील वीरेंद्र पाणीपुरी विकायचे. त्याचवेळी स्थानिक टॅक्सी स्टँडचे अध्यक्ष मोहम्मद सफी लोन यांचीही बांदीपोरा जिल्ह्यात हत्या झाली.

यानंतर गुरुवारी दहशतवाद्यांनी शाळेत घुसून दोन शिक्षकांची हत्या केली. ते दोघे शीख आणि हिंदू समाजाचे होते. दरम्यान, गेल्या आठवड्यातच काश्मीरमध्ये 7 नागरिकांचा बळी गेला आहे. यापैकी तीन हिंदू-शीख समाजातील होते. या वर्षी आतापर्यंत राजकीय कार्यकर्त्यांसह 25 नागरिक मारले गेले आहेत.

लष्कर-ए-तय्यबाची संघटना

दहशतवादी संघटना टीआरएफ ही पाकिस्तानची दहशतवादी संघटना लष्कर-ए-तय्यबाची एक आघाडी मानली जाते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार काही दिवसांपूर्वीच टीआरएफचे ओव्हरग्राउंड कामगार पूर्णपणे मुख्य कॅडरमध्ये बदलले आहेत आणि लोकांना लक्ष्य करत आहेत. 

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरterroristदहशतवादीLashkar-e-taibaलष्कर-ए-तोयबा